शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

कणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:55 IST

Bjp, pravin darekar, Farmer, sindhudurgnews सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देकणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणीसरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा : प्रवीण दरेकर

कणकवली : सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रवीण दरेकर यांनी ओसरगाव, वागदे आदी भागातील अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पंचनामे झाले काय? याबाबत विचारपूस केली.यावेळी आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषद सदस्या सायली सावंत, कणकवली तहसीलदार रमेश पवार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.शासनावर कडाडून टीका करताना दरेकर म्हणाले, शासनाने निकष शिथिल करून, स्वतंत्र तरतूद करून कोकणाला शेती नुकसानीसाठी वेगळे पॅकेज द्यावे. या सरकारमध्ये योजनाचा अभाव आहे. निसर्ग चक्रीवादळातील ६० टक्के मदत अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे अत्यंत बारकाईने नियोजन करून मदत सरकारला जनतेपर्यंत पोहोचवावी लागेल. तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये कोणाचाही कोणाला मेळ नाही, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले .यावेळी दरेकर यांनी वागदे, ओसरगाव येथील भातशेतीची पाहणी करीत तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळणारयावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, आम्हांला वाटले होते की सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना भरीव मदत करेल. मात्र, सरकारने १० हजार रुपयांची जी मदत केलेली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात ५ एकरच्या वर शेती बागायती आहेत. तिथले शेतकरी बऱ्यापैकी सधन आहेत.कोकणात जास्तीत जास्त ४० गुंठ्यांपर्यंत शेती आहे. १० हजार हेक्टरी पकडले तर येथील शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ १० गुंठे शेती असेल त्याला १ हजार रुपये मिळणार आहेत. ही शेतकऱ्याची थट्टा आहे. कारण त्याला कापणीचा खर्चच तेवढा येणार आहे.पाचशे, हजार रुपये देऊन थट्टा कसली करता?१० हजार कोटींमधले ५ हजार ५०० कोटी फक्त शेतीसाठी आहेत. बाकी ३०० कोटी नगरविकासला आहेत. उर्जा विभागाला २३९ कोटी आहेत. रस्ते, पुलांसाठी २६०० कोटी रुपये आहेत. अशाप्रकारे हिशेब घातला तर गुंठ्याला फक्त ५ हजार ५०० कोटींतून ५५ रुपये येत आहेत. त्यामुळे तुम्ही असे पाचशे, हजार रुपये देऊन कशाला शेतकऱ्याची थट्टा करता? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :BJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी