शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

कणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:55 IST

Bjp, pravin darekar, Farmer, sindhudurgnews सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देकणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणीसरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा : प्रवीण दरेकर

कणकवली : सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रवीण दरेकर यांनी ओसरगाव, वागदे आदी भागातील अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पंचनामे झाले काय? याबाबत विचारपूस केली.यावेळी आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषद सदस्या सायली सावंत, कणकवली तहसीलदार रमेश पवार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.शासनावर कडाडून टीका करताना दरेकर म्हणाले, शासनाने निकष शिथिल करून, स्वतंत्र तरतूद करून कोकणाला शेती नुकसानीसाठी वेगळे पॅकेज द्यावे. या सरकारमध्ये योजनाचा अभाव आहे. निसर्ग चक्रीवादळातील ६० टक्के मदत अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे अत्यंत बारकाईने नियोजन करून मदत सरकारला जनतेपर्यंत पोहोचवावी लागेल. तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये कोणाचाही कोणाला मेळ नाही, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले .यावेळी दरेकर यांनी वागदे, ओसरगाव येथील भातशेतीची पाहणी करीत तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळणारयावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, आम्हांला वाटले होते की सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना भरीव मदत करेल. मात्र, सरकारने १० हजार रुपयांची जी मदत केलेली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात ५ एकरच्या वर शेती बागायती आहेत. तिथले शेतकरी बऱ्यापैकी सधन आहेत.कोकणात जास्तीत जास्त ४० गुंठ्यांपर्यंत शेती आहे. १० हजार हेक्टरी पकडले तर येथील शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ १० गुंठे शेती असेल त्याला १ हजार रुपये मिळणार आहेत. ही शेतकऱ्याची थट्टा आहे. कारण त्याला कापणीचा खर्चच तेवढा येणार आहे.पाचशे, हजार रुपये देऊन थट्टा कसली करता?१० हजार कोटींमधले ५ हजार ५०० कोटी फक्त शेतीसाठी आहेत. बाकी ३०० कोटी नगरविकासला आहेत. उर्जा विभागाला २३९ कोटी आहेत. रस्ते, पुलांसाठी २६०० कोटी रुपये आहेत. अशाप्रकारे हिशेब घातला तर गुंठ्याला फक्त ५ हजार ५०० कोटींतून ५५ रुपये येत आहेत. त्यामुळे तुम्ही असे पाचशे, हजार रुपये देऊन कशाला शेतकऱ्याची थट्टा करता? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :BJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी