शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

काजूपिकावर पानगळीचा प्रादुर्भाव, दापोली कृषी विद्यापीठाने सूचविल्या उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:55 IST

आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू पिकावर पानगळ तसेच पाने-फांद्या वाळण्याची समस्या निर्माण झाली आहे. गत काही वर्षापासून अशाप्रकारची समस्या तुरळक स्वरुपात आढळून येत होती, परंतु यावर्षी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. यावर प्रतिबंधक म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीतर्फे उपाययोजना सूचविल्या आहेत.

ठळक मुद्देकाजूपिकावर पानगळीचा प्रादुर्भाव, कोकणातील समस्या दापोली कृषी विद्यापीठाने सूचविल्या उपाययोजना

वेंगुर्ला : आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू पिकावर पानगळ तसेच पाने-फांद्या वाळण्याची समस्या निर्माण झाली आहे. गत काही वर्षापासून अशाप्रकारची समस्या तुरळक स्वरुपात आढळून येत होती, परंतु यावर्षी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. यावर प्रतिबंधक म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीतर्फे उपाययोजना सूचविल्या आहेत.संपूर्ण जुलै महिना आणि आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण जवळपास १०० टक्के एवढे राहिले. सततच्या पावसामुळे काजू पिकाच्या फांद्या आणि पाने दीर्घकाळ ओली राहिली. हे सर्व घटक फायटोप्थोरा रोगकारक बुरशीच्या वाढीसाठी आणि प्रचारासाठी कारणीभूत ठरले आहेत. विद्यापीठाच्या वाकवली येथील प्रक्षेत्रावर केलेल्या सर्वेक्षणात या रोगाचा प्रादुर्भाव वेंगुर्ला-४ या जातीवरच जास्त प्रमाणात आढळून आला. वेंगुर्ला-१,३,५,७ या जातीवर या रोगाचा प्रादुर्भाव नगण्य स्वरुपाचा होता.रोगग्रस्त बागेतील रोगामुळे गळून पडलेली पाने जमवून बागेपासून दूर अंतरावर खोल खड्ड्या गाडून टाकावीत. रोगाने बाधीत झालेल्या फांद्या कापून काढाव्यात. रोगाचा प्रादुर्भाव फांदीच्या किती अंतरापर्यंत पसरला आहे याचा विचार करुन फांदी कापताना संपूर्ण रोगग्रस्त वाळलेला भाग आणि त्यामुळे सुमारे १० सेंटीमीटर जिवंत भाग असेल अशा ठिकाणी फांदी गोलाकार पद्धतीने कापावी. जिवंत फांदीच्या कापलेल्या भागावर त्वरित बोडोर्पेस्टचा लेप द्यावा. रोगग्रस्त फांद्या बागेपासून दूर अंतरावर जमा करुन नष्ट कराव्यात. अशाप्रकारे बागेची आणि झाडाची स्वच्छता केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी द्यावी.फवारणीसाठी मेटॉलेक्झील ८ टक्के आणि मॅन्कोझेब ६४ टक्के हे घटक असणारे संयुक्त बुरशीनाशक परिणामकारक असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. हे बुरशीनाशक १० लिटर पाण्यात २० ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. फवारणी पावसाची उघडीप बघून करावी. पुढील वर्षी पावसाला सुरुवात झाल्यानंतर ८ ते १५ दिवसानंतर पावसाची उघडीप बघून १ टक्के बोर्डो मिश्रणाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी, असे आवाहन कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.उत्पादन क्षमतेत घट होण्याची शक्यतारोगग्रस्त झाडांवरील पाने सुरुवातीस पिवळी पडतात. त्यानंतर त्यांचे देठ, मध्यशिर आणि उपशिर तपकिरी होतात आणि अशी पाने पुढील ४ ते ५ दिवसात पूर्णपणे वाळून जातात. रोगग्रस्त पानांवरील प्रादुर्भावानंतर फांदीच्या टोकावरील असलेल्या कोंबावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कोंब कुजतो. तसेच त्याखालील फांदीच्या तुलनेने कोवळा असलेला भाग काळा पडून त्यावर सुरकुत्या पडतात आणि फांदी शेंड्याकडून मागे वाळत जाते. पूर्ण प्रादुर्भाव झालेली झाडे निष्पर्ण होऊन झाडावरील शेंड्याच्या फांद्या, उपफांद्या, मुख्यफांद्या क्रमाक्रमाने वाळतात. झाडांची उत्पादन क्षमता घटल्याने पुढील वर्षीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट संभवते.

टॅग्स :agricultureशेतीkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग