शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 27, 2023 18:07 IST

रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील लाखो युवकांना रोजगार मिळेल

कुडाळ (सिंधुदुर्ग): रिफायनरी प्रकल्प किती चांगला आहे. तो बारसुला व्हावा असे लेखी पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान यांना लिहीले होते. तेच ठाकरे आता या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे यांना लगावला. रिफायनरीला जेवढे विरोधक आहेत त्याही पेक्षा जास्त समर्थक आहेत असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक मुख्यमंत्री पाय उतार झालेत, पण मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर तळतळाट व थयथयाट करणारे देशाच्या राजकारणात ठाकरे हे पहीलेच आहेत.  मुख्यमंत्री पद गेल्याचे त्यांना खुप दु:ख झाले आहे, त्यांना नैराश्य आले असल्याचा टोला लगावला.कुडाळ विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज, गुरुवारी झाली. यावेळी रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत यांनी सांगितले की,  रिफायनरी प्रकल्पाला नाणार येथे विरोध झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  हा प्रकल्प बारसु येथे व्हावा असे लेखी पत्र दि. १२ जानेवारी २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीले. या पत्रात त्यांनी, बारसु येथे कातळ जमीन आहे. हा प्रकल्प कोकणाच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी प्रदुषण होणार नाही, अशा प्रकारचे अनेक चांगले मुद्दे मांडले होते. आणि आता तेच विरोधात बोलत आहेत. स्थानिक आमदार साळवीचें समर्थनरिफायनरीला खासदार  विनायक राऊत विरोध करतात. आमदार वैभव नाईक बारसुला जावुन आले ते ही विरोध करतात. मात्र तेथील स्थानिक आमदार राजन साळवी समर्थन करतात. हे काही मला समजले नाही असा ही टोला सामंत यांनी लगावला.रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील लाखो युवकांना रोजगार मिळेल. विकासात्मक क्रांती होईल. रिफायनरी विरोधक आहेत त्यापेक्षा समर्थक आहेत. सध्या त्या ठिकाणी केवळ माती परिक्षण सुरू आहे. माती परिक्षणाला नंतरच त्या ठिकाणी प्रकल्प होईल. पण काहींनी तर आता लगेचच प्रकल्प सुरु होईल असा समज केला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे