शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 6, 2022 16:16 IST

भात कापणीवेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त

सिंधुदुर्ग : राज्याच्या काही भागात यावर्षी पावसाने सरासरी गाठली असली तरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पावसाची सरासरी गाठून बरसणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र, यावर्षी ७० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाचे मोसमी चार महिने जरी कागदोपत्री संपले असले तरी जिल्ह्यात पाऊस आपली सरासरी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पडून पूर्ण करणार असल्याचे आताच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे.ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवसापासून पावसाने अधूनमधून बरसण्यास सुरूवात केली असताना. काल, दसऱ्या दिवशी सायंकाळी जिल्ह्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार बरसण्यासही सुरूवात केली होती. सकाळच्या सत्रात काही प्रमाणात सुर्यदर्शन झाल्यानंतर दुपारी १२ नंतर पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावल्याने आता शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.भातकापणीच्या हंगामातच पाऊसपावसाने संततधार बरसायला सुरूवात केल्याने शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे टाकले आहे. आता भातकापणीचा हंगाम सुरू होणार आहे. दसऱ्यानंतर जिल्ह्यात भातकापणीला सुरूवात होते. मात्र, आता दसर्याच्या पूर्वसंध्येलाच पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे भातकापणीच्यावेळी शेतकऱ्यांची तारांबळ उडणार आहे.वार्षिक सरासरी पेक्षा कमी पाऊसपावसाच्या जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन महिन्यात सरासरीच्या तुलनेने जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाला होता. जुलै महिन्यात काही प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीदेखील होती. त्यामुळे या अतिवृष्टीत घरांसह नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पावसात सातत्य नसल्याने वार्षीक सरासरी पूर्ण झाली नाही.डिसेंबरपर्यंत राहणार पाऊसआता पावसाचे महिने जरी संपले असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असतोच. गेल्या आठ ते दहा वर्षात असा प्रकार सातत्याने सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.भात कापणी करायची कशी ?भात लावणीच्यावेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. त्यानंतर भात लावणी झाल्यानंतर पुन्हा भरडी भाताला पावसाची गरज होती. त्यावेळी काही प्रमाणात पाऊस नव्हता. आता भात तयार होवून कापणीला आले असताना मात्र, परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून भातकापणी करायची कशी ? असा प्रश्न त्याला सतावत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस