शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 6, 2022 16:16 IST

भात कापणीवेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त

सिंधुदुर्ग : राज्याच्या काही भागात यावर्षी पावसाने सरासरी गाठली असली तरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पावसाची सरासरी गाठून बरसणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र, यावर्षी ७० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाचे मोसमी चार महिने जरी कागदोपत्री संपले असले तरी जिल्ह्यात पाऊस आपली सरासरी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पडून पूर्ण करणार असल्याचे आताच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे.ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवसापासून पावसाने अधूनमधून बरसण्यास सुरूवात केली असताना. काल, दसऱ्या दिवशी सायंकाळी जिल्ह्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार बरसण्यासही सुरूवात केली होती. सकाळच्या सत्रात काही प्रमाणात सुर्यदर्शन झाल्यानंतर दुपारी १२ नंतर पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावल्याने आता शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.भातकापणीच्या हंगामातच पाऊसपावसाने संततधार बरसायला सुरूवात केल्याने शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे टाकले आहे. आता भातकापणीचा हंगाम सुरू होणार आहे. दसऱ्यानंतर जिल्ह्यात भातकापणीला सुरूवात होते. मात्र, आता दसर्याच्या पूर्वसंध्येलाच पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे भातकापणीच्यावेळी शेतकऱ्यांची तारांबळ उडणार आहे.वार्षिक सरासरी पेक्षा कमी पाऊसपावसाच्या जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन महिन्यात सरासरीच्या तुलनेने जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाला होता. जुलै महिन्यात काही प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीदेखील होती. त्यामुळे या अतिवृष्टीत घरांसह नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पावसात सातत्य नसल्याने वार्षीक सरासरी पूर्ण झाली नाही.डिसेंबरपर्यंत राहणार पाऊसआता पावसाचे महिने जरी संपले असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असतोच. गेल्या आठ ते दहा वर्षात असा प्रकार सातत्याने सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.भात कापणी करायची कशी ?भात लावणीच्यावेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. त्यानंतर भात लावणी झाल्यानंतर पुन्हा भरडी भाताला पावसाची गरज होती. त्यावेळी काही प्रमाणात पाऊस नव्हता. आता भात तयार होवून कापणीला आले असताना मात्र, परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून भातकापणी करायची कशी ? असा प्रश्न त्याला सतावत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस