शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

वैभववाडीत राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:30 IST

Ncp, Vaibhawadi, Sindhudurgnews जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कुणीही कमी लेखण्याची चूक करू नये. जिल्ह्यात आमची ताकद वाढत असून येत्या निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपासह गरज भासल्यास मित्रपक्षांनाही पक्षाची ताकद दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे दिला.

ठळक मुद्देवैभववाडीत राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटनविरोधक, मित्रपक्षांनाही राष्ट्रवादीची ताकद निवडणुकीत दाखवून देऊ : अमित सामंत

वैभववाडी : जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कुणीही कमी लेखण्याची चूक करू नये. जिल्ह्यात आमची ताकद वाढत असून येत्या निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपासह गरज भासल्यास मित्रपक्षांनाही पक्षाची ताकद दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे दिला.तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी काका कुडाळकर, विधानसभाप्रमुख अनंत पिळणकर, अशोक पवार, समीर आचरेकर, रुपेश जाधव, डॉ. अभिनंदन मालंडकर, भास्कर परब, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.सामंत म्हणाले, गेले वर्ष-दीड वर्ष जिल्ह्यात आम्ही संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी ते काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्याचा चांगला परिणाम आता दिसून येत आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत आमचा पक्ष ताकदीने उतरणार आहे.आमचा पहिला शत्रू भाजप असून त्या पक्षाविरोधात आम्ही ताकदीने काम करणार आहोत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जावी असा आमचा आग्रह असणार आहे. परंतु पक्षाला सन्मानाचा वाटा मिळणे आवश्यक आहे.

जर मित्रपक्षांनी सन्मान राखला नाही तर मात्र आमचा मार्ग आमच्यासाठी मोकळा असणार आहे. दरम्यान, भविष्यात गाव तिथे राष्ट्रवादी अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर किमान पाच तरी कार्यकर्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविणारवाभवे वैभववाडी नगरपंचायतीत काम करणाऱ्या कारभाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. नगरपंचायतीचा वापर निव्वळ स्वत:च्या राजकारणासाठी काहींनी केला. शहरातील जनतेचा पाण्यासारखा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावरच लढविणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडी