शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आठ दिवसात योग्य तोडगा न काढल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:36 IST

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देआठ दिवसात योग्य तोडगा न काढल्यास जनआंदोलन !संदेश पारकर यांचा इशारा ; महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवल्या समस्या

कणकवली: मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार कंपनीची मनमानी सुरू असून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात माती तसेच पाणी भरणार आहे. वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना संदेश पारकर म्हणाले, मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाला आमचा विरोध नाही. पण, गेली चार वर्षे या कामामुळे कणकवली शहर तसेच खारेपाटण ते झाराप पर्यंतच्या महामार्ग चौपदरीकरण बाधित जनतेला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही जनता त्रस्त झाली आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणाकडे न्याय मागायचा हेच या जनतेला समजत नाही . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच इतर प्रशासकीय यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत.कणकवली शहरात महामार्गाचे काम करताना प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. तरीही प्रकल्प बाधित प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करीत आहेत. मात्र, त्यांच्या त्रासात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विचार या महामार्गाचे काम करताना तसेच आराखडा तयार करताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तर शहरातील अंतर्गत नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणार आहे. सर्व शहरच चिखलमय होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीधर नाईक उद्यान, एस.टी . वर्कशॉप , शासकीय विश्राम गृह ,गांगोमंदिर अशा ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विचार न केल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. शहरातील पथदीप बंद आहेत. तसेच भूमिगत वीज वाहिन्या यांचे पुढे काय झाले? याचे उत्तर कुठलीच यंत्रणा द्यायला तयार नाही. त्यामुळे जनतेचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.सर्व्हिस रोडची रुंदी कमी असल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. भविष्यात ही समस्या कायम राहणार आहे. या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल यंत्रणा , पोलीस प्रशासन , नगरपंचायत प्रशासन , वीज वितरण यासर्वच यंत्रणा जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे लोकप्रतिनिधींसह बैठक घेऊन लवकरात लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात गँभिर समस्या निर्माण होणार असून त्याची सर्व जबाबदारी प्रशासणावरच असेल. त्यामुळे येत्या आठ दिवसात याबाबतीत ठोस निर्णय न झाल्यास प्रकल्प बाधितांना घेऊन जनआंदोलन करण्यात येईल.असा इशाराही संदेश पारकर यांनी यावेळी दिला.प्रकल्प बाधितांनी संपर्क साधावा !खारेपाटण ते झाराप या परिसरातील ज्या महामार्ग प्रकल्प बाधितांवर अन्याय झाला असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा.तसेच या जनांदोलनात सहभागी व्हावे .असे आवाहनही संदेश पारकर यांनी यावेळी केले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग