शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

आठ दिवसात योग्य तोडगा न काढल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:36 IST

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देआठ दिवसात योग्य तोडगा न काढल्यास जनआंदोलन !संदेश पारकर यांचा इशारा ; महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवल्या समस्या

कणकवली: मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार कंपनीची मनमानी सुरू असून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात माती तसेच पाणी भरणार आहे. वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना संदेश पारकर म्हणाले, मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाला आमचा विरोध नाही. पण, गेली चार वर्षे या कामामुळे कणकवली शहर तसेच खारेपाटण ते झाराप पर्यंतच्या महामार्ग चौपदरीकरण बाधित जनतेला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही जनता त्रस्त झाली आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणाकडे न्याय मागायचा हेच या जनतेला समजत नाही . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच इतर प्रशासकीय यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत.कणकवली शहरात महामार्गाचे काम करताना प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. तरीही प्रकल्प बाधित प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करीत आहेत. मात्र, त्यांच्या त्रासात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विचार या महामार्गाचे काम करताना तसेच आराखडा तयार करताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तर शहरातील अंतर्गत नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणार आहे. सर्व शहरच चिखलमय होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीधर नाईक उद्यान, एस.टी . वर्कशॉप , शासकीय विश्राम गृह ,गांगोमंदिर अशा ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विचार न केल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. शहरातील पथदीप बंद आहेत. तसेच भूमिगत वीज वाहिन्या यांचे पुढे काय झाले? याचे उत्तर कुठलीच यंत्रणा द्यायला तयार नाही. त्यामुळे जनतेचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.सर्व्हिस रोडची रुंदी कमी असल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. भविष्यात ही समस्या कायम राहणार आहे. या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल यंत्रणा , पोलीस प्रशासन , नगरपंचायत प्रशासन , वीज वितरण यासर्वच यंत्रणा जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे लोकप्रतिनिधींसह बैठक घेऊन लवकरात लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात गँभिर समस्या निर्माण होणार असून त्याची सर्व जबाबदारी प्रशासणावरच असेल. त्यामुळे येत्या आठ दिवसात याबाबतीत ठोस निर्णय न झाल्यास प्रकल्प बाधितांना घेऊन जनआंदोलन करण्यात येईल.असा इशाराही संदेश पारकर यांनी यावेळी दिला.प्रकल्प बाधितांनी संपर्क साधावा !खारेपाटण ते झाराप या परिसरातील ज्या महामार्ग प्रकल्प बाधितांवर अन्याय झाला असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा.तसेच या जनांदोलनात सहभागी व्हावे .असे आवाहनही संदेश पारकर यांनी यावेळी केले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग