शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

हिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:54 IST

Politics, Rajan Teli, Vaibhav Naik, sindhudurg गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकासकामे केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्यांच्यात हिंमत असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुक स्वबळावर लढवावी. असे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे.

ठळक मुद्देहिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान राज्य सरकारने घोषणा केलेल्या कर्जमाफीचे काय झाले ? ते वैभव नाईक यांनी जाहीर करावे

कणकवली: गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकासकामे केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्यांच्यात हिंमत असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुक स्वबळावर लढवावी. असे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे.कणकवली येथील भाजपा कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, निवडणुका जाहीर होण्याअगोदरच महाविकास आघाडीच्यावतीने एकत्रित निवडणुका लढवणार ही भूमिका शिवसेना खासदार व आमदार घेत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात भाजपची ताकद वाढली आहे हे स्पष्ट होत आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ घोषणा करुन जनतेची दिशाभूल सत्ताधारी करत आहेत.ठाकरे सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भाजपाच्यावतीने सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्यात पत्रकार परिषदा घेण्यात आल्या . पक्ष आदेशाप्रमाणे प्रदेश सरचिटणीस असलेल्या आमदार रविंद्र चव्हाण यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही त्यादिवशी पत्रकार परिषद घेतली.सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण करताना जनतेची कशी दिशाभूल केली ? याबाबत त्यात माहिती देण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे वरीष्ठ नेते आहेत. राज्यात जी जबाबदारी त्यांना दिली त्यांनी ती पार पाडली. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी चुकीचे मुद्दे चर्चेत आणून कोणताही फरक पडणार नाही.एसटीचे ३०० चालक - वाहक मुबंईला गेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे .ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. एका आठवड्यात एसटीच्या सर्व फेऱ्या सुरु न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.आमदारांकडे आलिशान गाडया आहेत.पण एसटीने गोरगरीब नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. शाळा,विद्यालयात विद्यार्थी व अन्य लोक एसटीने येत आहेत. सातत्याने एसटीचे प्रश्न का निर्माण होत आहेत ? शिवसेनेचे मंत्री त्यासाठी सक्षम नाहीत का ? कर्मचाऱ्यांना पगार दिले जात नाहीत याला जबाबदार कोण ? हे आमदार नाईक यांनी सांगावे.निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील नवीन बसस्थानकांची भूमिपूजने करण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहेत का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. माजी पालकमंत्री यांनी निवडणूकीच्या तोंडावर काही भूमिपूजने केली होती ,त्यांचे काय झाले ? या प्रश्नांची उत्तरे आधी शिवसेनेने द्यावीत. शिवसेना जिल्ह्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सत्ता असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळत नाही. आरोग्य सेवा कोलमडली आहे. शेकडो पदे रिक्त असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असून देखील जनतेला न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे.नुकसान भरपाईचे ६५ कोटी फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेले होते. जिल्हा नियोजन आराखडा अडीचशे कोटीचा होता तो १४० कोटींवर आणला आहे. त्याबाबत शिवसेनेने बोलावे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चालू केल्यास आम्ही भाजपच्यावतीने शिवसेना नेत्यांचा जाहीर सत्कार करु. मात्र, त्या केवळ घोषणा ठरु नयेत .जिल्हा आरोग्य विभागात ५३६ रिक्त पदे आहेत ती अगोदर भरा.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले? ते पैसे अजून मिळाले नाहीत .सरकारवर ५ .२ लाख हजार कोटीचे कर्ज आहे .महसुली तूट ३५ हजार कोटी झाली आहे.भात नुकसानभरपाई पैसे आलेले नाहीत. त्यामुळे केवळ हवेत गोळीबार करू नये . असेही राजन तेली यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRajan Teliराजन तेली Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग