शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:54 IST

Politics, Rajan Teli, Vaibhav Naik, sindhudurg गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकासकामे केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्यांच्यात हिंमत असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुक स्वबळावर लढवावी. असे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे.

ठळक मुद्देहिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान राज्य सरकारने घोषणा केलेल्या कर्जमाफीचे काय झाले ? ते वैभव नाईक यांनी जाहीर करावे

कणकवली: गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकासकामे केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्यांच्यात हिंमत असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुक स्वबळावर लढवावी. असे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे.कणकवली येथील भाजपा कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, निवडणुका जाहीर होण्याअगोदरच महाविकास आघाडीच्यावतीने एकत्रित निवडणुका लढवणार ही भूमिका शिवसेना खासदार व आमदार घेत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात भाजपची ताकद वाढली आहे हे स्पष्ट होत आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ घोषणा करुन जनतेची दिशाभूल सत्ताधारी करत आहेत.ठाकरे सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भाजपाच्यावतीने सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्यात पत्रकार परिषदा घेण्यात आल्या . पक्ष आदेशाप्रमाणे प्रदेश सरचिटणीस असलेल्या आमदार रविंद्र चव्हाण यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही त्यादिवशी पत्रकार परिषद घेतली.सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण करताना जनतेची कशी दिशाभूल केली ? याबाबत त्यात माहिती देण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे वरीष्ठ नेते आहेत. राज्यात जी जबाबदारी त्यांना दिली त्यांनी ती पार पाडली. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी चुकीचे मुद्दे चर्चेत आणून कोणताही फरक पडणार नाही.एसटीचे ३०० चालक - वाहक मुबंईला गेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे .ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. एका आठवड्यात एसटीच्या सर्व फेऱ्या सुरु न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.आमदारांकडे आलिशान गाडया आहेत.पण एसटीने गोरगरीब नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. शाळा,विद्यालयात विद्यार्थी व अन्य लोक एसटीने येत आहेत. सातत्याने एसटीचे प्रश्न का निर्माण होत आहेत ? शिवसेनेचे मंत्री त्यासाठी सक्षम नाहीत का ? कर्मचाऱ्यांना पगार दिले जात नाहीत याला जबाबदार कोण ? हे आमदार नाईक यांनी सांगावे.निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील नवीन बसस्थानकांची भूमिपूजने करण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहेत का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. माजी पालकमंत्री यांनी निवडणूकीच्या तोंडावर काही भूमिपूजने केली होती ,त्यांचे काय झाले ? या प्रश्नांची उत्तरे आधी शिवसेनेने द्यावीत. शिवसेना जिल्ह्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सत्ता असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळत नाही. आरोग्य सेवा कोलमडली आहे. शेकडो पदे रिक्त असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असून देखील जनतेला न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे.नुकसान भरपाईचे ६५ कोटी फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेले होते. जिल्हा नियोजन आराखडा अडीचशे कोटीचा होता तो १४० कोटींवर आणला आहे. त्याबाबत शिवसेनेने बोलावे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चालू केल्यास आम्ही भाजपच्यावतीने शिवसेना नेत्यांचा जाहीर सत्कार करु. मात्र, त्या केवळ घोषणा ठरु नयेत .जिल्हा आरोग्य विभागात ५३६ रिक्त पदे आहेत ती अगोदर भरा.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले? ते पैसे अजून मिळाले नाहीत .सरकारवर ५ .२ लाख हजार कोटीचे कर्ज आहे .महसुली तूट ३५ हजार कोटी झाली आहे.भात नुकसानभरपाई पैसे आलेले नाहीत. त्यामुळे केवळ हवेत गोळीबार करू नये . असेही राजन तेली यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRajan Teliराजन तेली Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग