शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार भाजप विचाराचा हवा - मंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: April 20, 2023 14:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने चालना दिली

सावंतवाडी : देशाला महासत्ता बनवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला चारशे खासदार निवडून आणावे लागतील. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार हा भाजपच्या विचाराचा निवडून आणावा लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार घराघरात पोचवावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी  केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गांधी चौकात भाजपच्या महाविजय रॅलीची समारोप सभेत ते बोलत होते.यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शैलेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब आदी. उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने कुणी चालना दिली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळेच 14 वित्त आयोगाचा पैसा प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळू लागला. देश आज वेगळ्या दिशेने चालला आहे. हे फक्त मोदींमुळेच शक्य झाले. दोन खासदारापासून सुरू झालेली भाजप आज देशात एक नंबर वर आहे. त्याग आणि समर्पण मधून निर्माण झालेली भाजपा आहे. कधी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पक्षाचा विचार घेऊन अनेक कार्यकर्ते पुढे जात आहे. कोलगाव ग्रामपंचायत चे कौतुक करतो त्यानी पारदर्शकता दाखवून दिली सर्वाना आता डिजिटलमधून गेल पाहिजे असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.जिल्हा नियोजनचे पैसे शंभर टक्के खर्च करण्यात आले त्याचे श्रेय घ्यायला शिका. अधिकारी चुकीच्या पध्दतीने वागत असतील तर कार्यकर्त्यांनी शांत राहून चालणार नाही. सर्व सामान्य जनतेचा पैसा त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे. मागील अडीच वर्षांत निधी आला नाही, पण मागील नऊ महिन्यात मोठ्या प्रमाणात निधी आला. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचे ठराव ग्रामपंचायतीत घेतले गेले पाहिजे असे आवाहनही मंत्री चव्हाण यांनी केले.निलेश राणे म्हणाले, मागील काही वर्षात जिल्ह्यात निधी येण्याचे प्रमाण कमी झाले होते. मागच्या अडीच वर्षांत कोविडचे कारण देत नियोजनचा निधी कमी केला. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामपंचायती सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या निवडून आल्या त्यामुळे आम्हाला जास्ती जास्त निधी मिळावा असे आवाहन राणे यांनी केले.तेली म्हणाले, कोण कुठे जाणार मला माहित नाही. मला भाजपने एवढे प्रेम दिल ते मी कधीही विसरू शकणार नाही. शतप्रतिशत भाजप म्हणून काम करूया येथील जनतेने एवढे भरभरून प्रेम दिले, मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायती भाजपकडे आहेत. त्यामुळे भविष्यात ही भाजपला येथील जनता साथ देईल असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा