शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार भाजप विचाराचा हवा - मंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: April 20, 2023 14:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने चालना दिली

सावंतवाडी : देशाला महासत्ता बनवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला चारशे खासदार निवडून आणावे लागतील. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार हा भाजपच्या विचाराचा निवडून आणावा लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार घराघरात पोचवावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी  केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गांधी चौकात भाजपच्या महाविजय रॅलीची समारोप सभेत ते बोलत होते.यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शैलेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब आदी. उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने कुणी चालना दिली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळेच 14 वित्त आयोगाचा पैसा प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळू लागला. देश आज वेगळ्या दिशेने चालला आहे. हे फक्त मोदींमुळेच शक्य झाले. दोन खासदारापासून सुरू झालेली भाजप आज देशात एक नंबर वर आहे. त्याग आणि समर्पण मधून निर्माण झालेली भाजपा आहे. कधी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पक्षाचा विचार घेऊन अनेक कार्यकर्ते पुढे जात आहे. कोलगाव ग्रामपंचायत चे कौतुक करतो त्यानी पारदर्शकता दाखवून दिली सर्वाना आता डिजिटलमधून गेल पाहिजे असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.जिल्हा नियोजनचे पैसे शंभर टक्के खर्च करण्यात आले त्याचे श्रेय घ्यायला शिका. अधिकारी चुकीच्या पध्दतीने वागत असतील तर कार्यकर्त्यांनी शांत राहून चालणार नाही. सर्व सामान्य जनतेचा पैसा त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे. मागील अडीच वर्षांत निधी आला नाही, पण मागील नऊ महिन्यात मोठ्या प्रमाणात निधी आला. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचे ठराव ग्रामपंचायतीत घेतले गेले पाहिजे असे आवाहनही मंत्री चव्हाण यांनी केले.निलेश राणे म्हणाले, मागील काही वर्षात जिल्ह्यात निधी येण्याचे प्रमाण कमी झाले होते. मागच्या अडीच वर्षांत कोविडचे कारण देत नियोजनचा निधी कमी केला. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामपंचायती सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या निवडून आल्या त्यामुळे आम्हाला जास्ती जास्त निधी मिळावा असे आवाहन राणे यांनी केले.तेली म्हणाले, कोण कुठे जाणार मला माहित नाही. मला भाजपने एवढे प्रेम दिल ते मी कधीही विसरू शकणार नाही. शतप्रतिशत भाजप म्हणून काम करूया येथील जनतेने एवढे भरभरून प्रेम दिले, मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायती भाजपकडे आहेत. त्यामुळे भविष्यात ही भाजपला येथील जनता साथ देईल असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा