शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

टँकरमुक्त सिंधुदुर्गची ओळख पुसली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:24 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असल्याची ओरड गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची एकमेव मागणी देवगड तालुक्यातील चाफेड गावाने केली आहे. त्याला प्रांताधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. यामुळे टँकरमुक्तअशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची असणारी ओळख पुसली गेली आहे.

ठळक मुद्देचाफेड गावासाठी टँकरची मान्यता, प्रशासनाचा हिरवा कंदील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची माहिती

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असल्याची ओरड गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची एकमेव मागणी देवगड तालुक्यातील चाफेड गावाने केली आहे. त्याला प्रांताधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. यामुळे टँकरमुक्तअशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची असणारी ओळख पुसली गेली आहे.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समिती सभापती संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरेश जगताप, उपाध्यक्ष रणजीत देसाई, विषय सभापती जेरॉन फर्नांडिस, डॉ. अनिशा दळवी, पल्लवी राऊळ, अंकुश जाधव, उत्तम पांढरे, सावी लोके, प्रमोद कामत यांच्यासह अन्य अधिकारी खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.टँकरमुक्त असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाण्याची पातळी जास्त खालावल्याने तसेच प्रशासनाने आचारसंहिता असल्याने पाणीटंचाई कामांना विलंबाने मंजूरी दिल्याने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.मात्र, अशा परिस्थितीत चाफेड या एका गावानेच टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. शासन आदेशानुसार याला मंजूरी देण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चाफेडमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजूरी दिली आहे. यावेळी सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी दोडामार्ग तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव करण्यात आला असल्याचे सांगितले. मात्र, आपल्या विभागाकडे अद्याप तसा प्रस्ताव आलेला नसल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी सांगितले.मिठबाव, हिंदळे, दहीबाव, नारिंग्रे परिसरात तीव्र पाणीटंचाईदेवगड तालुक्यातील चाफेड बरोबरच मिठबाव, हिंदळे, दहिबाव व नारिंग्रे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे असा प्रश्न सदस्य सावी लोके यांनी उपस्थित करत जिल्हा पाणीपुरवठा विभाग सहकार्य करत नसल्याचे सांगितले. तर पाणीपुरवठा विभागाने संबंधित ग्रामपंचायती कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले.ग्रामपंचायतींकडून कागदपत्रे अपूर्णपाणी टंचाई आराखड्यातील २८० कामांना मान्यता मिळाली आहे. यापैकी ९९ कामांना कायार्रंभ आदेश देण्यात आले आहेत. ८७ कामे सुरू असून १२ काम पूर्ण झाली आहेत. तर ६४ ग्रामपंचायतीकडून कागदपत्रांची पुर्तता झालेली नाही. हातपंप नादुरूस्तीच्या ३४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीचे निरसन करण्यात आले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग