शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

टँकरमुक्त सिंधुदुर्गची ओळख पुसली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:24 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असल्याची ओरड गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची एकमेव मागणी देवगड तालुक्यातील चाफेड गावाने केली आहे. त्याला प्रांताधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. यामुळे टँकरमुक्तअशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची असणारी ओळख पुसली गेली आहे.

ठळक मुद्देचाफेड गावासाठी टँकरची मान्यता, प्रशासनाचा हिरवा कंदील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची माहिती

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असल्याची ओरड गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची एकमेव मागणी देवगड तालुक्यातील चाफेड गावाने केली आहे. त्याला प्रांताधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. यामुळे टँकरमुक्तअशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची असणारी ओळख पुसली गेली आहे.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समिती सभापती संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरेश जगताप, उपाध्यक्ष रणजीत देसाई, विषय सभापती जेरॉन फर्नांडिस, डॉ. अनिशा दळवी, पल्लवी राऊळ, अंकुश जाधव, उत्तम पांढरे, सावी लोके, प्रमोद कामत यांच्यासह अन्य अधिकारी खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.टँकरमुक्त असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाण्याची पातळी जास्त खालावल्याने तसेच प्रशासनाने आचारसंहिता असल्याने पाणीटंचाई कामांना विलंबाने मंजूरी दिल्याने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.मात्र, अशा परिस्थितीत चाफेड या एका गावानेच टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. शासन आदेशानुसार याला मंजूरी देण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चाफेडमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजूरी दिली आहे. यावेळी सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी दोडामार्ग तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव करण्यात आला असल्याचे सांगितले. मात्र, आपल्या विभागाकडे अद्याप तसा प्रस्ताव आलेला नसल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी सांगितले.मिठबाव, हिंदळे, दहीबाव, नारिंग्रे परिसरात तीव्र पाणीटंचाईदेवगड तालुक्यातील चाफेड बरोबरच मिठबाव, हिंदळे, दहिबाव व नारिंग्रे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे असा प्रश्न सदस्य सावी लोके यांनी उपस्थित करत जिल्हा पाणीपुरवठा विभाग सहकार्य करत नसल्याचे सांगितले. तर पाणीपुरवठा विभागाने संबंधित ग्रामपंचायती कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले.ग्रामपंचायतींकडून कागदपत्रे अपूर्णपाणी टंचाई आराखड्यातील २८० कामांना मान्यता मिळाली आहे. यापैकी ९९ कामांना कायार्रंभ आदेश देण्यात आले आहेत. ८७ कामे सुरू असून १२ काम पूर्ण झाली आहेत. तर ६४ ग्रामपंचायतीकडून कागदपत्रांची पुर्तता झालेली नाही. हातपंप नादुरूस्तीच्या ३४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीचे निरसन करण्यात आले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग