शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 18:07 IST

प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आई, वडील व आजीच्या पाठिंब्यावर तनया रवींद्र दळवीने दहावीच्या परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर सर केले. पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करून तिला पुढे आयएएस अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे.

ठळक मुद्देमोबाईल वापरतच नाही, खासगी शिकवण्यांना न जाता शाळेसह घरातच अभ्यासआई, वडील, आजीच्या परिश्रमाची जाणीव राखली

प्रकाश वराडकररत्नागिरी : कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची. लहानपणी आंब्याचा किरकोळ व्यवसाय व वडापाव विक्रीच्या दुकानावर तिच्या परिवाराचा चरितार्थ व्हायचा. आई, वडील व आजी जीवतोड मेहनत करायचे. गेल्या चार वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या साळवी स्टॉप येथे भाड्याच्या जागेत वडिलांनी छोटेसे भोजनालय सुरू केलेय. त्यावरच तिचे कुटुंब चाललेय. अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आई, वडील व आजीच्या पाठिंब्यावर तिने दहावीच्या परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर सर केले. पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करून तिला पुढे आयएएस अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे.रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावातील श्रीनगर येथे राहणाऱ्या या गुणवंत मुलीचे नाव तनया रवींद्र दळवी असे आहे. सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल, रवींद्रनगर, कारवांचीवाडी येथे तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. या शिक्षणाच्या कालावधीत तिने खासगी शिकवण्यांना कधीच जवळ केले नाही. सर्व अभ्यास शाळेत आणि घरी व्हायचा. घरी आल्यानंतर ती सातत्याने पुस्तकांचे वाचन, गणिताचा सराव करायची. दहावीचा अभ्यास करताना ती टी. व्ही. क्वचितच पाहायची. संपर्कासाठी साधा मोबाईल तिच्याजवळ होता.त्याव्यतिरिक्त अभ्यासासाठी गुगलवरून काही माहिती हवी असेल तेव्हाच फक्त ती आईच्या मोबाईलचा वापर करायची. दहावीचा अभ्यास करताना तिचा दिनक्रम ठरलेला होता. पहाटे ५ ते सकाळी ६ वाजेपर्यंत दररोज वाचन, अभ्यास, सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत शाळा, दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अभ्यास, सायंकाळी ७ ते ८.३० वाजेपर्यंत पुन्हा अभ्यास असे तिचे दिवसाचे वेळापत्रक होते.त्यात कधीतरी परिस्थितीनुसार बदलही व्हायचा. तनयाचे बाबा रवींद्र तिला गणिताच्या अभ्यासात मदत करायचे तर आई नेहा मराठी विषयाच्या अभ्यासात मदत करायची. शिक्षकांचे तर तिला सदैव सहकार्य असायचे. तिचा भाऊ साहील हा यावर्षी दहावी इयत्तेत आहे. तनयाने दहावीच्या परीक्षेत गणित व विज्ञान विषयांमध्ये प्रत्येकी ९६, समाजशास्त्रमध्ये ९७, मराठीमध्ये ८७, इंग्रजीमध्ये ८४ तर हिंदीमध्ये ९३ गुण मिळवले आहेत.इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी आई, वडील व आजी किती परिश्रम घ्यायचे, याची जाणीव तनयाला आहे. अभ्यासाबरोबरच तनया स्वयंपाक कलेतही तरबेज आहे. सातवी इयत्तेत असताना तिला शिष्यवृत्तीही मिळाली होती. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतही ती गुणवत्ता यादीत आली होती. दहावीनंतर गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेऊन तिला विज्ञान शाखेतून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तसेच आयएएससाठीही अभ्यास करायचा आहे.भोजनालयात चपात्या बनवण्यातही मास्टरनववीपर्यंत आणि पुढे दहावीचे शिक्षण सुरू असतानाही तनया आपल्या अभ्यासाबरोबरच घरच्या कामातही मदत करायची. आई, वडील भोजनालयात गेलेले असताना घरातील स्वयंपाक ती करायची व आजही करते. कधी भोजनालयात जावे लागले तर जात असे व तेथे चपात्या लाटून त्या भाजण्याचेही काम करायची तर कधी कॅश काऊंटर सांभाळायची. आईची प्रकृती ठीक नसताना सातत्याने दोन महिने तिला भोजनालयात जावे लागले. तरीही तिचे आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष होते. 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थी