शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मनोरूग्ण महिलांना हक्काचे घर!

By admin | Updated: October 16, 2015 00:08 IST

न्यायालयाचे आदेश : पंधरा वर्षांनंतर ओलांडणार घराचा उंबरठा

रत्नागिरी : प्रादेशिक मनोरूग्णालयात गेली १५ वर्षे दाखल असलेल्या दोन भगिनीना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. या दोन भगिनींना घरी नेण्यासाठी न्यायालयाने आदेश बजावल्यामुळे त्यांचे नातेवाईक बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दोघीही घरी जाण्यासाठी अधीर झाल्या होत्या.मनोरूग्णालयात दाखल केल्यावर त्यांना पुन्हा घरी नेण्याची मानसिकता असतेच असे नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे या दोन भगिनींना आपल्या घरी जाण्याची संधी मिळणार आहे. पुष्पलता गायकवाड (कोल्हापूर) या २०११ साली प्रादेशिक मनोरूग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र उपचाराअंती त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे नाव, गावाचे नाव विचारण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. गायकवाड यांचे वडील त्यांना घरी नेण्यासाठी मनोरूग्णालयात बुधवारी दाखल झाले होते.राणी दबडे (बत्तीसशिराळा) नामक मनोरूग्ण महिला २००० साली मनोरूग्णालयात दाखल झाली होती. ही महिलाही बरी झाल्यानंतर तिच्या गावी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी घर बंद असून, भाऊ मुंबईला राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तलाठ्याशी संपर्क साधून तिच्या घराचा सातबारा व माहिती मिळवण्यात आली. त्यावेळी दोन्ही भाऊ जवळच राहत असल्याची माहिती मिळाली. कायद्यानुसार राणीचे हक्क अबाधित असून, तिला घरी घेऊन जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार तिचा भाऊ घरी नेण्यासाठी मनोरूग्णालयात दाखल झाला होता.प्रादेशिक मनोरूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पराग पाथरे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारीवर्ग मनोरूग्णांवर उपचार करीत असतात. बऱ्या झालेल्या मनोरूग्णांना त्यांच्या हक्काच्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी नितीन शिवदे, वीणा गणवीर यांचेही सहकार्य लाभते. पोलिसांमार्फत या मंडळींच्या घरी संपर्क साधला जातो. सध्या मनोरूग्णालयात ११४ पुरूष व ७९ महिला मनोरूग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये वयस्करांची संख्या लक्षणीय आहे. संबंधित मंडळी बरी झाली तरी नातेवाईक स्वीकारण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना मनोरूणालयाचाच आधार घ्यावा लागतो. (प्रतिनिधी)पुष्पा गायकवाड, राणी दबडे यांचे नातेवाईक न्यायालयीन आदेशानुसार दोघींना नेण्यासाठी आले होते. मात्र, घरी नेण्यासाठी ते फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले. वास्तविक या महिला बऱ्या झाल्या असून, स्वत:चे काम स्वत: करतात. त्यांना घर आठवते, नातेवाईक आठवतात. मात्र, प्रतिष्ठेपायी नातेवाईक त्यांना नाकारतात, ही शोकांतिका म्हणावी लागेल.