शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

महामार्ग चिखलमय, पावशी येथे टेम्पो चिखलात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:40 AM

पावशी ग्रामपंचायतजवळील चिखलमय महामार्गावर आयशर टेम्पो रुतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. पावशी येथील ग्रामस्थांनी सदरची ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कंपनीचे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

ठळक मुद्देमहामार्ग चिखलमय, पावशी येथे टेम्पो चिखलात अडकला दोन तास वाहतूक ठप्प; कंपनीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक

कुडाळ : पावशी ग्रामपंचायतजवळील चिखलमय महामार्गावर आयशर टेम्पो रुतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. पावशी येथील ग्रामस्थांनी सदरची ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कंपनीचे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

चिखलमय महामार्गामुळे वाहने रूतण्याच्या घटना वाढत असून महामार्ग सुस्थितीत करण्याकडे महामार्ग प्रशासन व दिलीप बिल्डकॉन कंपनी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.बुधवारी सकाळी कुडाळ येथील काळप नाका येथील बॉक्स वेलवर ही लक्झरी बस रुतली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावशी ग्रामपंचायत जवळील महामार्गावर गोव्याहून मुंबईकडे जाणारा टेम्पो चिखलमय रस्त्यात रुतून बसला. हा टेम्पो काही केल्या निघेना परिणामी काही क्षणातच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.ही घटना पावशी येथील ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच टेम्पो बाहेर काढण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला मात्र अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. एका अधिकाऱ्यांने फोन उचलला मात्र त्याने आता येऊ शकत नाही, असे कारण दिल्याचे त्यांनी सांगितले. तर कुडाळ पोलीस ठाण्याला फोन लावून याबाबत माहिती दिली.

मग त्यांनीही याबाबत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कळवितो, असे सांगितले. मात्र काही वेळ झाला तरी कोणीच त्याठिकाणी आले नाही. त्यामुळे काही वेळातच महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या व महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला.दिलीप बिल्डकॉन कंपनीचे कोणीही सदरचा टेम्पो काढण्यासाठी येत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी वाहतूक सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन वाहतूक सोडवण्यास सुरू केली

यावेळी नादुरुस्त असलेल्या व बंद ठेवण्यात आलेल्या मार्गावरून त्यांनी हळूहळू वाहतूक सोडविण्यास सुरू केली. व सुमारे दोन तासानंतर ही वाहतूक पूर्वपदावर आणली. त्यानंतर सकाळी साडेसात वाजण्याच्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा दिलीप बिल्डकॉन रवी कुमार यांना फोन लावला. यावेळी कंपनीने त्यांना जेसीबी पाठवतो, असे सांगितले व काही वेळेत तेथे जेसीबी आला व या जेसीबीच्या सहाय्याने सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो बाहेर काढण्यात आला.या ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे वाहनचालक, प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत वाहन चालक, प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून काही ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे वारंवार गाड्या रूतण्याचे तसेच लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.मात्र याकडे महामार्ग प्रशासन तसेच ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉन पूर्णपणे दुर्लक्ष करत असून सदरचे हे रस्ते सुधारून ते सुस्थितीत आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग