शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महामार्गाच्या वस्तुस्थिती बाबतचे चित्रिकरण उच्च न्यायालयात सादर करणार -उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:46 IST

highway, mns, parsaramuparkar, sindhudurg मनसेच्यावतीने जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा व वस्तुस्थितीबाबत ३ व ४ डिसेंबर रोजी चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी वकिलामार्फत ते उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहामार्गाच्या वस्तुस्थिती बाबतचे चित्रिकरण उच्च न्यायालयात सादर करणार !महामार्ग लवकर हस्तांतरण करण्यासाठी सत्ताधारी घालताहेत ठेकेदाराला पाठिशी

कणकवली: सिंधुदुर्गातील जनतेचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांनी जनतेच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. मात्र, ते महामार्ग ठेकेदाराच्या पाठीशी राहत आहेत. मनसेच्यावतीने जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा व वस्तुस्थितीबाबत ३ व ४ डिसेंबर रोजी चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी वकिलामार्फत ते उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.कणकवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क कार्यालय येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.परशुराम उपरकर म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झालेले आहे . महामार्गासाठी जमिनी गेलेल्या लोकांचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत . मात्र , अशी स्थिती असताना पालकमंत्री , खासदार , सत्ताधारीमंडळी काम ९५ टक्के पुर्ण झाल्याचे दाखवून ते लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या राज्यकर्त्यांची कीव करावीशी वाटते . वास्तविक प्रश्न न सुटलेल्या जनतेच्या पाठीशी त्यांनी उभे राहण्याची गरज असता ते ठेकेदाराच्या पाठीशी उभे राहत आहेत. असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आढावा बैठकीत पालकमंत्री , खासदार महामार्गाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशिल आहेत, असे दिसते . आम्ही न्यायालयात याचीका दाखल केल्याने ही घाई आहे . जुलै महिन्यात बॉक्सेल पुलाचा भाग कोसळल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्टक्चरल ऑडीट करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर सायंकाळच्यावेळी मुख्य अभियंता कणकवलीत येऊन गेले . मात्र , अद्यापही याबाबतचा अहवाल आलेला नाही.जर मोठा पूल बांधताना एकदा नव्हे , तर दोन महिन्यात पाच वेळा कोसळला. असे असेल तर मग हे काम निकृष्ट नव्हे काय ? निकृष्ट काम , वनसंज्ञेतील तोडलेली झाडे व इतर विषयांबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यामुळेच आता सत्ताधारी मंडळी , काम पुर्णत्वास गेल्याचे सांगत महामार्ग हस्तांतरीत करण्यासाठीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

महामार्गाबाबत अनेक प्रश्न सुटलेले नाहीत . ते जाणून न घेता , ठेकेदाराच्या पाठीशी राहण्याचे काम सत्ताधारी मंडळी करत आहेत . काम पुर्ण झाल्यानंतर १५ वर्षे मेंटनन्स करावयाचा आहे . मात्र , ठेकेदार काम पुर्ण होण्याच्या अगोदरपासूनच मेंटनन्स करत आहे . आजही अनेकांना झाडांचे , जमिनींचे पैसे मिळालेले नाहीत . जमिनीं प्रत्यक्षात किती गेल्या याबाबत कमीजास्त पत्रक न झाल्याने काहीच माहिती लोकांना मिळत नाही . या सर्व माहितीबाबत नागरीक अनभिज्ञ आहेत ,असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :highwayमहामार्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग