शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

महामार्गाच्या वस्तुस्थिती बाबतचे चित्रिकरण उच्च न्यायालयात सादर करणार -उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:46 IST

highway, mns, parsaramuparkar, sindhudurg मनसेच्यावतीने जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा व वस्तुस्थितीबाबत ३ व ४ डिसेंबर रोजी चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी वकिलामार्फत ते उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहामार्गाच्या वस्तुस्थिती बाबतचे चित्रिकरण उच्च न्यायालयात सादर करणार !महामार्ग लवकर हस्तांतरण करण्यासाठी सत्ताधारी घालताहेत ठेकेदाराला पाठिशी

कणकवली: सिंधुदुर्गातील जनतेचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांनी जनतेच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. मात्र, ते महामार्ग ठेकेदाराच्या पाठीशी राहत आहेत. मनसेच्यावतीने जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा व वस्तुस्थितीबाबत ३ व ४ डिसेंबर रोजी चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी वकिलामार्फत ते उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.कणकवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क कार्यालय येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.परशुराम उपरकर म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झालेले आहे . महामार्गासाठी जमिनी गेलेल्या लोकांचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत . मात्र , अशी स्थिती असताना पालकमंत्री , खासदार , सत्ताधारीमंडळी काम ९५ टक्के पुर्ण झाल्याचे दाखवून ते लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या राज्यकर्त्यांची कीव करावीशी वाटते . वास्तविक प्रश्न न सुटलेल्या जनतेच्या पाठीशी त्यांनी उभे राहण्याची गरज असता ते ठेकेदाराच्या पाठीशी उभे राहत आहेत. असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आढावा बैठकीत पालकमंत्री , खासदार महामार्गाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशिल आहेत, असे दिसते . आम्ही न्यायालयात याचीका दाखल केल्याने ही घाई आहे . जुलै महिन्यात बॉक्सेल पुलाचा भाग कोसळल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्टक्चरल ऑडीट करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर सायंकाळच्यावेळी मुख्य अभियंता कणकवलीत येऊन गेले . मात्र , अद्यापही याबाबतचा अहवाल आलेला नाही.जर मोठा पूल बांधताना एकदा नव्हे , तर दोन महिन्यात पाच वेळा कोसळला. असे असेल तर मग हे काम निकृष्ट नव्हे काय ? निकृष्ट काम , वनसंज्ञेतील तोडलेली झाडे व इतर विषयांबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यामुळेच आता सत्ताधारी मंडळी , काम पुर्णत्वास गेल्याचे सांगत महामार्ग हस्तांतरीत करण्यासाठीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

महामार्गाबाबत अनेक प्रश्न सुटलेले नाहीत . ते जाणून न घेता , ठेकेदाराच्या पाठीशी राहण्याचे काम सत्ताधारी मंडळी करत आहेत . काम पुर्ण झाल्यानंतर १५ वर्षे मेंटनन्स करावयाचा आहे . मात्र , ठेकेदार काम पुर्ण होण्याच्या अगोदरपासूनच मेंटनन्स करत आहे . आजही अनेकांना झाडांचे , जमिनींचे पैसे मिळालेले नाहीत . जमिनीं प्रत्यक्षात किती गेल्या याबाबत कमीजास्त पत्रक न झाल्याने काहीच माहिती लोकांना मिळत नाही . या सर्व माहितीबाबत नागरीक अनभिज्ञ आहेत ,असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :highwayमहामार्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग