शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वीस वर्षांतील उच्चांकी पाऊस मे महिन्यात बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:50 IST

शेतकऱ्यांकडून भात पेरणी सुरू, अवकाळीमुळे मोठे नुकसान

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : पावसाळी हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला. मे महिन्यात तब्बल ५४१ मिमीच्या सरासरी जिल्ह्यात पाऊस झाला. पावसासोबतच जोरदार वादळवारे झाल्याने शंभरपेक्षा जास्त घरे, गोठ्यांची पडझड होऊन ३७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोघांचा यादरम्यान मृत्यू झाला आहे.

गत २० वर्षांत असा अवकाळी पाऊस झाला नसल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. दरम्यान जून महिन्यात अधूनमधून एखाद दुसरी पावसाची सर सोडली तर ठिकठिकाणी कडकडीत ऊन पडल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे.

दरवर्षी मे महिन्यात एक ते दोन दिवस किंवा महिन्याअखेर अवकाळी पाऊस पडतो. परंतु या वर्षी मात्र १२ मेपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. १९ मेपर्यंत पावसाला तितकासा जोर नव्हता. २० ते २९ मी या कालावधीत पावसाने राखले व मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शेतीची मशागतपूर्व कामेसुद्धा करता आली नाही.

३० मेनंतर ते आतापर्यंत पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली आहे. एखाद दुसरी पावसाची सर सोडली तर दिवसभर कडकडीत ऊन पडलेले पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्याने अवकाळी पडलेल्या पावसाच्या जोरावर भारतीय केले आहेत. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पेरलेल्या भाताला अंकुर आले आहेत.

पावसाच्या आगमनाचा खरा हर्ष उल्हास हा मुघल नक्षत्रपासून सर्वत्र साजरा केला जातो. साधारण ७ जून मृग नक्षत्राला सुरुवात होते. याला मिरग देखील म्हटले जाते. परंतु मान्सूनचा अद्याप पत्ता नाहीये. मृग कोरडा जातोय की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.

१९ दिवसांत ३५ लाखांचे नुकसान; २ मृत्यू, १०० घरांची पडझडमे महिन्यात गेल्या दहा वर्षांत कधी नव्हे एवढा पाऊस या १९ दिवसांत झाला आहे. १०२ गावे यामुळे बाधित झाली आहेत. कणकवली व कुडाळ येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. १०० घरे व १० गोठ्यांची पडझड होऊन ३५ लाखांचे नुकसान आहे. २ जनावरे दगावून त्यांचे १ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

गेल्या २० वर्षांत झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)२००५ - ३५.५२००६ - ३४४.१२००७ - ५२.१२००८ - २२.२२००९ - १५.८२०१० - १३.८२०११ - ०२०१२ - ०२०१३ - ०२०१४ - ३.८२०१५ - २३२०१६ - ४२०१७ - ७२.६२०१८ - ३०.७२०१९ - ०२०२० - ७२०२१ - ३११२०२२ - ३१.३२०२३ - ३.१२०२४ - ५१.८२०२५- ५४१

७४ गावातील शेतकऱ्यांचे ४० हेक्टरचे नुकसानकाजू, आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले. ७४ गावातील १७५ शेतकऱ्यांचे ४० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्याचे पंचनामाच्या माध्यमातून समोर आले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय पंचनामाच्या सूचना केल्यानंतर तालुका कृषी कर्मचाऱ्यांकडून ही कार्यवाही करण्यात आली होती.

मे महिन्यात झालेला पाऊसदेवगड ५७९.५ मिमी, मालवण ४५२.९ मिमी, सावंतवाडी ६६४.६ मिमी, वेंगुर्ला ६६८.४ मिमी, कणकवली ५८६.५ मिमी, कुडाळ ५६२.१ मिमी, वैभववाडी ५२९ मिमी, दोडामार्ग ४९४ मिमी

पाण्याच्या पातळीत मोठी वाढयंदा मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवली नाही. त्याला कारण म्हणजे अवकाळी झालेला पाऊस. सध्या धरणातील, ओढा, तलाव व नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दोन धरणांमधील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती