शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला, बहुतांश धरणे ओव्हर फ्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:19 IST

महत्त्वाच्या नद्यांच्या पाणी पातळीत आता हळूहळू घट होत असल्याने पूरस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पावसाचा जोर आता पूर्णपणे ओसरला आहे. गेल्या २४ तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ६७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४४ मिमी पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी १६७४.४ मिमी पाऊस झाला आहे.जून महिन्यात सरासरीने पिछाडलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पंधरवड्यात गतवर्षीची सरासरी मागे टाकून पुढे वाटचाल सुरू केली आहे. गेले आठवडाभर पडत असलेल्या संततधार पावसाने आता काही विश्रांती घेतली असली तरी असा पडणारा पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरणारा असल्याने बळीराजांमधून समाधान व्यक्त होत आहे.तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून, सर्व आकडे मिलिमीटर परिमाणात आहेत. देवगड- २१.४ (१३९१.८), मालवण- ४७.६ (१५८७.२), सावंतवाडी- ४९.९ (१९९९.४), वेंगुर्ला- ६७.८ (१७३५.५), कणकवली- ४२.४ (१५२८.४), कुडाळ- ४०.२ (१८०१.२), वैभववाडी- ४६.९ (१७०६.६), दोडामार्ग- ४९.(१९०९.८) असा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर महत्त्वाच्या नद्यांच्या पाणी पातळीत आता हळूहळू घट होत असल्याने पूरस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली आहे. सध्या कुठल्या नदीतील पाणी पातळी धोक्याच्या इशाऱ्यावर नाही.

तिलारी धरणात ६ हजार ४० क्युसेक पाण्याचा विसर्गतिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत ६५.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ३७७.२४६ दलघमी पाणीसाठा असून, धरण ८४.३३ टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण ६ हजार ४० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस