शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

अतिवृष्टीने करुळ घाटात रस्ता खचला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:39 IST

Rain In Konkan Sindhudurg : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.

ठळक मुद्देपोलीस, बांधकामकडून तात्पुरती डागडुजी एकेरी वाहतूक सुरु

वैभववाडी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.रविवारी रात्रभर संततधार सुरु होती.. घाट परिसरात अतिवृष्टी सुरु आहे. याचा फटका करुळ घाटरस्त्याला बसला आहे. करुळ घाटाच्या मध्यावर रस्त्याची मोरी खचली असून लगतचा रस्ताही खचण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचलाय तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे.दरम्यान, रस्त्यालगत भगदाड पडल्याचे समजताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार राजू जामसंडेकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तेथून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना खचलेल्या ठिकाणी तातडीने बोलावून घेतले. बांधकामचे कर्मचारी घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात गुतले आहेत. मात्र तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्या पावसामुळे घाटरस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती धोकादायक ठरणार आहे. खचलेल्या रस्त्याचा काही भाग खचण्याची शक्यता असल्यामुळे पावसात काम करणे शक्य होणार नाही. पाऊस जर असाच आणखी तीन चार दिवस कायम राहील्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षिपणाचा परिणामकरुळ घाटरस्त्याच्या दरडींच्या बाजूला पक्की गटारे बांधण्यात आलेली आहेत. परंतु, पावसाळा सुरु होण्यापूर्वी या गटारात पडलेली दगडमातीचा गाळ काढणे आवश्यक होते. तो न काढल्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. ते पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे रस्त्याला भगदाड पडणे, रस्ता खचणे असे प्रकार घडत असतात. ही बाब पावसाळ्याच्या प्रारंभीच ह्यलोकमतह्णने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.करुळ घाटमार्गाची देखभाल करणार कोण?तळेरे-कोल्हापूर हा आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी झाला आहे. पूर्वी हा राज्यमार्ग होता. त्यावेळी त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडे गेल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महामार्ग प्रधिकरणकडे आहे. परंतु, या महामार्ग प्रधिकरणाचे कार्यालयात करुळ घाटापासून ५८ किलोमीटरवर कोल्हापूरात आहे. त्यामुळे रस्त्यासह घाटमार्गाची आपत्कालीन देखभाल कोण करणार हा प्रश्नच आहे. 

टॅग्स :konkanकोकणRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग