शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

अतिवृष्टीने करुळ घाटात रस्ता खचला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:39 IST

Rain In Konkan Sindhudurg : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.

ठळक मुद्देपोलीस, बांधकामकडून तात्पुरती डागडुजी एकेरी वाहतूक सुरु

वैभववाडी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.रविवारी रात्रभर संततधार सुरु होती.. घाट परिसरात अतिवृष्टी सुरु आहे. याचा फटका करुळ घाटरस्त्याला बसला आहे. करुळ घाटाच्या मध्यावर रस्त्याची मोरी खचली असून लगतचा रस्ताही खचण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचलाय तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे.दरम्यान, रस्त्यालगत भगदाड पडल्याचे समजताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार राजू जामसंडेकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तेथून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना खचलेल्या ठिकाणी तातडीने बोलावून घेतले. बांधकामचे कर्मचारी घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात गुतले आहेत. मात्र तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्या पावसामुळे घाटरस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती धोकादायक ठरणार आहे. खचलेल्या रस्त्याचा काही भाग खचण्याची शक्यता असल्यामुळे पावसात काम करणे शक्य होणार नाही. पाऊस जर असाच आणखी तीन चार दिवस कायम राहील्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षिपणाचा परिणामकरुळ घाटरस्त्याच्या दरडींच्या बाजूला पक्की गटारे बांधण्यात आलेली आहेत. परंतु, पावसाळा सुरु होण्यापूर्वी या गटारात पडलेली दगडमातीचा गाळ काढणे आवश्यक होते. तो न काढल्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. ते पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे रस्त्याला भगदाड पडणे, रस्ता खचणे असे प्रकार घडत असतात. ही बाब पावसाळ्याच्या प्रारंभीच ह्यलोकमतह्णने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.करुळ घाटमार्गाची देखभाल करणार कोण?तळेरे-कोल्हापूर हा आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी झाला आहे. पूर्वी हा राज्यमार्ग होता. त्यावेळी त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडे गेल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महामार्ग प्रधिकरणकडे आहे. परंतु, या महामार्ग प्रधिकरणाचे कार्यालयात करुळ घाटापासून ५८ किलोमीटरवर कोल्हापूरात आहे. त्यामुळे रस्त्यासह घाटमार्गाची आपत्कालीन देखभाल कोण करणार हा प्रश्नच आहे. 

टॅग्स :konkanकोकणRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग