शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

अतिवृष्टीने करुळ घाटात रस्ता खचला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:39 IST

Rain In Konkan Sindhudurg : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.

ठळक मुद्देपोलीस, बांधकामकडून तात्पुरती डागडुजी एकेरी वाहतूक सुरु

वैभववाडी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.रविवारी रात्रभर संततधार सुरु होती.. घाट परिसरात अतिवृष्टी सुरु आहे. याचा फटका करुळ घाटरस्त्याला बसला आहे. करुळ घाटाच्या मध्यावर रस्त्याची मोरी खचली असून लगतचा रस्ताही खचण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचलाय तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे.दरम्यान, रस्त्यालगत भगदाड पडल्याचे समजताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार राजू जामसंडेकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तेथून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना खचलेल्या ठिकाणी तातडीने बोलावून घेतले. बांधकामचे कर्मचारी घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात गुतले आहेत. मात्र तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्या पावसामुळे घाटरस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती धोकादायक ठरणार आहे. खचलेल्या रस्त्याचा काही भाग खचण्याची शक्यता असल्यामुळे पावसात काम करणे शक्य होणार नाही. पाऊस जर असाच आणखी तीन चार दिवस कायम राहील्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षिपणाचा परिणामकरुळ घाटरस्त्याच्या दरडींच्या बाजूला पक्की गटारे बांधण्यात आलेली आहेत. परंतु, पावसाळा सुरु होण्यापूर्वी या गटारात पडलेली दगडमातीचा गाळ काढणे आवश्यक होते. तो न काढल्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. ते पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे रस्त्याला भगदाड पडणे, रस्ता खचणे असे प्रकार घडत असतात. ही बाब पावसाळ्याच्या प्रारंभीच ह्यलोकमतह्णने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.करुळ घाटमार्गाची देखभाल करणार कोण?तळेरे-कोल्हापूर हा आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी झाला आहे. पूर्वी हा राज्यमार्ग होता. त्यावेळी त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडे गेल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महामार्ग प्रधिकरणकडे आहे. परंतु, या महामार्ग प्रधिकरणाचे कार्यालयात करुळ घाटापासून ५८ किलोमीटरवर कोल्हापूरात आहे. त्यामुळे रस्त्यासह घाटमार्गाची आपत्कालीन देखभाल कोण करणार हा प्रश्नच आहे. 

टॅग्स :konkanकोकणRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग