शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; ६३ नागरिकांचे स्थलांतर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 20, 2024 19:05 IST

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गिरीश परबसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवड्याभराच्या कालावधीनंतरही मुसळधार पावसाचे सत्र कायम आहे. ग्रामीण भागातील पुलांवर पाणी आल्याने विविध रस्ते बंद झाले होते. परिणामी, अनेक राज्ये, तसेच जिल्हा मार्गावरील वाहतूक अधूनमधून ठप्प होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि खचत असलेल्या डोंगर भागापासून सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ कुटुंबांतील ६३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ५२.७ च्या सरासरीने पाऊस झाला असून, सर्वाधिक ८२.२ मिलीमीटर पाऊस दोडामार्ग तालुक्यात झाला आहे.गेल्या आठवड्याभरापासून हवामान खात्याच्या अलर्टनुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून तो अद्यापही कायम आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्यांना पूरस्थितीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर अधून मधून पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती.

२४ तासांत झालेला पाऊसशनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ५२.७ च्या सरासरीने पाऊस झाला. यामध्ये देवगड तालुक्यात ५३ मिलीमीटर पाऊस, मालवणमध्ये ३४.४ सावंतवाडीमध्ये ६६.८, वेंगुर्ला मध्ये ५४.१ मिलीमीटर, कणकवलीमध्ये सर्वाधिक ४६.८ मिलिमीटर पाऊस झाला, कुडाळमध्ये ५३.३ मिलीमीटर पाऊस, वैभववाडीमध्ये ५०.८, तर दोडामार्गमध्ये ८२.२ मिलीमीटर पाऊस झाला.

आजपर्यंत झालेले नुकसानसिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्येकी ३ सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पक्की घरे १७, कच्ची घरे ३ पूर्णतः नुकसान झाले असून, ४०८ पक्क्या घरांचे, २०० कच्चा घरांचे, गोठा ११, पोल्ट्री १, २८ मांगरांचे अंशतः नुकसान झाले आहे. १४ दुधाळ जनावरे, १ ओढकाम करणारे जनावर आणि ३,१९५ कोंबड्या पुराच्या पाण्यामुळे मृत झाल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस