शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्मा वाढला, बेगमीसाठी नागरिकांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:18 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच यावर्षी उशिराने म्हणजेच १२ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून दोन आठवडे तरी उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत .

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्मा वाढला बेगमीसाठी नागरिकांची लगबग

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच यावर्षी उशिराने म्हणजेच १२ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून दोन आठवडे तरी उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत .सिंधुदुर्गात गतवर्षी २९ मे रोजी मान्सूनने हजेरी लावली होती. आतापर्यंतची स्थिती पाहिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: ७ जूनला मान्सूनचे आगमन होते. यावर्षी मात्र मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. केरळमध्ये मान्सूनने धडक दिल्यानंतर १ ते २ दिवसांत मान्सूनची चाहूल सिंधुदुर्ग व गोवा राज्याला लागते. त्यानंतर पुढे ८ ते १० दिवसांनी तो सक्रिय होतो. यंदाचा मान्सून गतवर्षीपेक्षा उशिराने दाखल होणार असल्याने तेवढेच दिवस उष्णतेच्या झळा जिल्हावासीयांना सहन कराव्या लागणार आहेत.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात आणखी दोन आठवडे उष्णता कायम राहणार आहे. तर पुढील आठवड्यात उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५ ते ३८ अंश सेल्सिअसएवढे कमाल तापमान अनुभवायला मिळत आहे. ते पुढील आठवड्यात पुन्हा ३९ ते ४० अंशपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.मान्सूनचा अंदाज येताच पावसाळी बेगमीच्या कामांची तयारी सर्वत्र सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यात या कामांना वेग आला आहे. वीज महावितरणनेही मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ८ ते १० दिवसांनी मान्सून उशिराने दाखल झाल्यास त्याचा खरीप हंगामावर फारसा परिणाम होणार नसला तरी काही भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत. त्यासोबतच फळझाडे, पशुधन यावरही परिणाम झालेला दिसून येणार आहे. त्याचा फटका शेतकरी, बागायतदार याना बसणार आहे.दरम्यान, उन्हाच्या तीव्र झळांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. टोपी, रुमाल, छत्री अशा वस्तूंचा वापर करून उन्हापासून बचाव केल्यास उन्हाचा थोडातरी त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे आरोग्यावर परिणाम होणार नाही.

टॅग्स :Temperatureतापमानsindhudurgसिंधुदुर्ग