शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हस्तकला वास्तूला वाळवीने घेरले

By admin | Updated: April 1, 2015 00:09 IST

रघुनाथ मार्केटची अवस्था बिकट : बाहेरच्या काचा फुटल्या, एसी गंजले--लोकमत विशेष

प्रसन्न राणे - सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक व पारंपरिक हस्तकलेची जोपासना व्हावी, त्यातून तयार होणाऱ्या वस्तंूची विक्री परप्रांतात व्हावी, यासाठी येथील उभाबाजारात रघुनाथ मार्केटची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला उभारून दहा वर्षे झाली, तरी या प्रकल्पात ना वस्तू विक्री ना प्रदर्शन तसेच आतील सामानालाही वाळवी लागली असून, एसीही गंजले आहेत. तर बाहेरील काचाही फुटल्या आहेत. लाकडी खेळणी हा सावंतवाडी पॅटर्न आहे. लाकडी खेळणी देशविदेशात प्रसिद्ध आहेत. जगाच्या नकाशावरही सावंतवाडी लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक खास लाकडी खेळण्यांच्या खरेदीसाठी सावंतवाडी शहरात येतात. यासारख्या अनेक कला सावंतवाडी शहरात उदयास आल्या आहेत. या कलेतूनच शहराची ओळख निर्माण झाली आहे. सावंतवाडी शहरात निर्माण झालेल्या पारंपरिक कला, हस्तकलेच्या वस्तू एकत्रित करून जगभरात विकल्या जाव्यात व सावंतवाडी शहराचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी येथील उभाबाजार येथील रघुनाथ मार्केट इमारत अद्ययावत करण्यात आली होती. यासाठी कोकण विकास पॅकेज अंतर्गत २००४ साली ३५ लाख रुपये खर्ची घालण्यात आले होते. पण गेल्या दहा वर्षात ही वास्तू बंद अवस्थेत आहे. कोणत्याही प्रकारच्या हस्तकलेची निर्मिती यातून होताना दिसून येत नाही. सावंतवाडी शहरातील पारंपरिक कलेला प्रोत्साहन देत स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेला हा रघुनाथ मार्केट प्रक ल्प बंदावस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. हा प्रकल्प सुरू केल्यास सावंतवाडी शहरासोबत जिल्हाभरातील कलाकारांकडून या प्रकल्पास प्रतिसाद मिळू शकतो. ३५ लाख रुपये खर्ची घालून शासनाचा पैसा वाया घालविण्यापेक्षा यातून आर्थिक नफा मिळविण्याचा विचार संंबंधित प्रशासनाने करून याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. रघुनाथ मार्केटमध्ये लाखो रुपये खर्च करून एसी बसवण्यात आले होते. ते एसी आता दिसत नाहीत. तर बाहेरून मार्केटला लावण्यात आलेल्या काचा फुटून गेल्या आहेत. आतील लाकडी फर्निचरला वाळवीने ग्रासले असून हे मार्केट काही वर्षांनी अस्तित्वहीन होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाचे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेली ही आलिशान इमारत आता धूळखात पडली आहे.रघुनाथ मार्केटसारखे सावंतवाडीतील अनेक बंद प्रकल्प फलकांवर दाखवून पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. जनतेच्या निधीतून उभारलेले हे प्रकल्प बंदावस्थेत ठेवून जनतेचा पैसा वाया घालविण्याचे काम संबंधित प्रशासन करीत आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या अशा प्रकल्पांचा पर्यटनासाठी कोणताही फायदा नाही. रघुनाथ मार्केट प्रकल्प पंधरा वर्षे बंदावस्थेत असून यामुळे सावंतवाडीतील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.- राजू पनवेलकर व्यावसायिक, सावंतवाडीसमस्या सावंतवाडीच्याउपासमारीची वेळसावंतवाडीमध्ये स्थानिक नागरिकांनी तयार झालेली शिल्पे, हस्तकौशल्याने बनविलेल्या वस्तू मार्केटच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना दाखविण्यासाठी रघुनाथ मार्केटचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, रघुनाथ मार्केट बंद असल्याने स्थानिक कलाकारांना आपली कला मांडणे अशक्य झाले आहे. यातून काही कलाकारांना रोजगाराची संधी निर्माण करता आली असती. मात्र, प्रकल्पच बंद असल्याने युवकांसमवेत कलाकारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. सावंतवाडी शहरातील पर्यटनस्थळांमध्ये रघुनाथ मार्केटची ओळख करून दिली जाते. मात्र, वास्तवात याठिकाणी कोणताही प्रकल्प नसल्याने पर्यटकांची संख्या कमी होत आहे. यामुळे शहरातील बंद प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे. यातून शहरात पर्यटक संख्या वाढून लघुउद्योजकांद्वारे शहरातील आर्थिक सुलभता वाढविणे शक्य होणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.