शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

हस्तकला वास्तूला वाळवीने घेरले

By admin | Updated: April 1, 2015 00:09 IST

रघुनाथ मार्केटची अवस्था बिकट : बाहेरच्या काचा फुटल्या, एसी गंजले--लोकमत विशेष

प्रसन्न राणे - सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक व पारंपरिक हस्तकलेची जोपासना व्हावी, त्यातून तयार होणाऱ्या वस्तंूची विक्री परप्रांतात व्हावी, यासाठी येथील उभाबाजारात रघुनाथ मार्केटची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला उभारून दहा वर्षे झाली, तरी या प्रकल्पात ना वस्तू विक्री ना प्रदर्शन तसेच आतील सामानालाही वाळवी लागली असून, एसीही गंजले आहेत. तर बाहेरील काचाही फुटल्या आहेत. लाकडी खेळणी हा सावंतवाडी पॅटर्न आहे. लाकडी खेळणी देशविदेशात प्रसिद्ध आहेत. जगाच्या नकाशावरही सावंतवाडी लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक खास लाकडी खेळण्यांच्या खरेदीसाठी सावंतवाडी शहरात येतात. यासारख्या अनेक कला सावंतवाडी शहरात उदयास आल्या आहेत. या कलेतूनच शहराची ओळख निर्माण झाली आहे. सावंतवाडी शहरात निर्माण झालेल्या पारंपरिक कला, हस्तकलेच्या वस्तू एकत्रित करून जगभरात विकल्या जाव्यात व सावंतवाडी शहराचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी येथील उभाबाजार येथील रघुनाथ मार्केट इमारत अद्ययावत करण्यात आली होती. यासाठी कोकण विकास पॅकेज अंतर्गत २००४ साली ३५ लाख रुपये खर्ची घालण्यात आले होते. पण गेल्या दहा वर्षात ही वास्तू बंद अवस्थेत आहे. कोणत्याही प्रकारच्या हस्तकलेची निर्मिती यातून होताना दिसून येत नाही. सावंतवाडी शहरातील पारंपरिक कलेला प्रोत्साहन देत स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेला हा रघुनाथ मार्केट प्रक ल्प बंदावस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. हा प्रकल्प सुरू केल्यास सावंतवाडी शहरासोबत जिल्हाभरातील कलाकारांकडून या प्रकल्पास प्रतिसाद मिळू शकतो. ३५ लाख रुपये खर्ची घालून शासनाचा पैसा वाया घालविण्यापेक्षा यातून आर्थिक नफा मिळविण्याचा विचार संंबंधित प्रशासनाने करून याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. रघुनाथ मार्केटमध्ये लाखो रुपये खर्च करून एसी बसवण्यात आले होते. ते एसी आता दिसत नाहीत. तर बाहेरून मार्केटला लावण्यात आलेल्या काचा फुटून गेल्या आहेत. आतील लाकडी फर्निचरला वाळवीने ग्रासले असून हे मार्केट काही वर्षांनी अस्तित्वहीन होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाचे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेली ही आलिशान इमारत आता धूळखात पडली आहे.रघुनाथ मार्केटसारखे सावंतवाडीतील अनेक बंद प्रकल्प फलकांवर दाखवून पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. जनतेच्या निधीतून उभारलेले हे प्रकल्प बंदावस्थेत ठेवून जनतेचा पैसा वाया घालविण्याचे काम संबंधित प्रशासन करीत आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या अशा प्रकल्पांचा पर्यटनासाठी कोणताही फायदा नाही. रघुनाथ मार्केट प्रकल्प पंधरा वर्षे बंदावस्थेत असून यामुळे सावंतवाडीतील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.- राजू पनवेलकर व्यावसायिक, सावंतवाडीसमस्या सावंतवाडीच्याउपासमारीची वेळसावंतवाडीमध्ये स्थानिक नागरिकांनी तयार झालेली शिल्पे, हस्तकौशल्याने बनविलेल्या वस्तू मार्केटच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना दाखविण्यासाठी रघुनाथ मार्केटचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, रघुनाथ मार्केट बंद असल्याने स्थानिक कलाकारांना आपली कला मांडणे अशक्य झाले आहे. यातून काही कलाकारांना रोजगाराची संधी निर्माण करता आली असती. मात्र, प्रकल्पच बंद असल्याने युवकांसमवेत कलाकारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. सावंतवाडी शहरातील पर्यटनस्थळांमध्ये रघुनाथ मार्केटची ओळख करून दिली जाते. मात्र, वास्तवात याठिकाणी कोणताही प्रकल्प नसल्याने पर्यटकांची संख्या कमी होत आहे. यामुळे शहरातील बंद प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे. यातून शहरात पर्यटक संख्या वाढून लघुउद्योजकांद्वारे शहरातील आर्थिक सुलभता वाढविणे शक्य होणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.