शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

निधी खर्चावरून पालकमंत्री टार्गेट

By admin | Updated: June 6, 2017 00:00 IST

जिल्हा नियोजन समिती सभा; विकासनिधी १०० टक्के खर्च नाही : नारायण राणेंनी केला प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनाचा गतवर्षीचा सन २०१६-१७ या वार्षिक आराखड्याचा विकास निधी १०० टक्के खर्च झाला नसून, प्रशासनाने आकडेवारीची अ‍ॅडजेस्टमेंट केली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर स्वत:च्या हाताने स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत, असा आरोप करत माजी मुख्यमंंत्री नारायण राणे यांनी केसरकरांना टार्गेट केले.जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, समिती सदस्य, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांनी पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. गतवर्षीच्या जिल्हा नियोजनाच्या निधी खर्चावर संशय व्यक्त केला. आराखड्यातील १३० कोटींपैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत ६३ कोटी खर्च होतो, तर उर्वरित सुमारे ६६ कोटी रुपये हे एका मार्च महिन्यात कसे काय खर्च होऊ शकतात. त्यामुळे १०० टक्के निधी खर्च म्हणजे आकडेवारीची अ‍ॅडजेस्टमेंट आहे. याकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. स्वत:च्या हाताने स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार असल्याचे राणे यांनी सांगितले. या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा नियोजनमधून विकासकामांसाठी निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची मुदत दोन वर्षे आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनकडील गतवर्षीचा निधी १०० टक्के खर्च झाल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुक्कुटपालनाची चांगली योजना चांदा ते बांदा योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप सदस्य अतुल काळसेकर यांनी केला. येथील शेतकरी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढविणारी ही एक चांगली योजना थांबविण्यात आल्याने याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ४५०० आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झाला असताना सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहत नाही. सरकारने याकडे लक्ष द्यावे व शेतीमालाला हमीभाव द्यावा, असा ठराव यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडला. खासदार विनायक राऊत यांनी या चर्चेत सकारात्मकदृष्टीने सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील रखडलेल्या वीज जोडण्या, सौरशेती, पंप, डिजिटल शाळा, दूरसंचार विभागाचे विविध प्रश्न, वन्यप्राणी आणि त्यांच्याकडून होणारा उपद्रव व त्यावर उपाययोजना, आदी प्रश्नांवर या सभागृहात चर्चा झाली.जिल्हा रुग्णालयात सुधारणा नाही : राऊत किरकोळ आजाराच्या रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयातून गोवा व कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले जाते. रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. २०११ पासून सी.टी. स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळे या रुग्णालयात सुधारणा नाही. त्यामुळे या सर्व सुविधा जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत पुढील किमान तीन महिने रुग्णालय बंद ठेवावे, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी सभागृहात मांडत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांना धारेवर धरले. याला कारणीभूत एकटे जिल्हा शल्यचिकित्सक नसून आपण सगळेजण आहोत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याचा सल्ला अतुल काळसेकर यांनी दिला. तर डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याच्यादृष्टीने येत्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांची एक सभा बोलवा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले.जिल्ह्यात एक लाख ६० हजार वृक्षलागवड होणारपर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यापैकी सिंधुदुर्गात एक लाख ६० हजार रोपे लावली जाणार आहेत. गतवर्षी वृक्षलागवडीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम आला होता, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली. केवळ झाडे लावून जमणार नाही, तर त्यांचे संगोपन होणे गरजेचे असल्याचे मत अतुल काळसेकर यांनी सभागृहात व्यक्त केले. सदस्य काका कुडाळकर, सुशांत नाईक, अभय शिरसाट, प्रकाश परब यांनी विविध विकासकामांच्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा घडवून आणली. भविष्यात आमचाही पालकमंत्री असेल : नीतेश राणेपालकमंत्री आपापल्या मतदारसंघातील विकासकामांची नावे सुचवा असे सांगतात. कामांची नावे सुचविली की स्वत:च्या अधिकारात कामे मंजूर करतात. कामे मंजूर करताना पक्षपातीपणा केला जातो. भविष्यात आमचाही पालकमंत्री असेल याचे भान ठेवून विकासकामे मंजूर करा, असा सल्ला आमदार नीतेश राणे यांनी दिला.