शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

निधी खर्चावरून पालकमंत्री टार्गेट

By admin | Updated: June 6, 2017 00:00 IST

जिल्हा नियोजन समिती सभा; विकासनिधी १०० टक्के खर्च नाही : नारायण राणेंनी केला प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनाचा गतवर्षीचा सन २०१६-१७ या वार्षिक आराखड्याचा विकास निधी १०० टक्के खर्च झाला नसून, प्रशासनाने आकडेवारीची अ‍ॅडजेस्टमेंट केली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर स्वत:च्या हाताने स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत, असा आरोप करत माजी मुख्यमंंत्री नारायण राणे यांनी केसरकरांना टार्गेट केले.जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, समिती सदस्य, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांनी पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. गतवर्षीच्या जिल्हा नियोजनाच्या निधी खर्चावर संशय व्यक्त केला. आराखड्यातील १३० कोटींपैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत ६३ कोटी खर्च होतो, तर उर्वरित सुमारे ६६ कोटी रुपये हे एका मार्च महिन्यात कसे काय खर्च होऊ शकतात. त्यामुळे १०० टक्के निधी खर्च म्हणजे आकडेवारीची अ‍ॅडजेस्टमेंट आहे. याकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. स्वत:च्या हाताने स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार असल्याचे राणे यांनी सांगितले. या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा नियोजनमधून विकासकामांसाठी निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची मुदत दोन वर्षे आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनकडील गतवर्षीचा निधी १०० टक्के खर्च झाल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुक्कुटपालनाची चांगली योजना चांदा ते बांदा योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप सदस्य अतुल काळसेकर यांनी केला. येथील शेतकरी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढविणारी ही एक चांगली योजना थांबविण्यात आल्याने याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ४५०० आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झाला असताना सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहत नाही. सरकारने याकडे लक्ष द्यावे व शेतीमालाला हमीभाव द्यावा, असा ठराव यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडला. खासदार विनायक राऊत यांनी या चर्चेत सकारात्मकदृष्टीने सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील रखडलेल्या वीज जोडण्या, सौरशेती, पंप, डिजिटल शाळा, दूरसंचार विभागाचे विविध प्रश्न, वन्यप्राणी आणि त्यांच्याकडून होणारा उपद्रव व त्यावर उपाययोजना, आदी प्रश्नांवर या सभागृहात चर्चा झाली.जिल्हा रुग्णालयात सुधारणा नाही : राऊत किरकोळ आजाराच्या रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयातून गोवा व कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले जाते. रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. २०११ पासून सी.टी. स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळे या रुग्णालयात सुधारणा नाही. त्यामुळे या सर्व सुविधा जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत पुढील किमान तीन महिने रुग्णालय बंद ठेवावे, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी सभागृहात मांडत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांना धारेवर धरले. याला कारणीभूत एकटे जिल्हा शल्यचिकित्सक नसून आपण सगळेजण आहोत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याचा सल्ला अतुल काळसेकर यांनी दिला. तर डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याच्यादृष्टीने येत्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांची एक सभा बोलवा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले.जिल्ह्यात एक लाख ६० हजार वृक्षलागवड होणारपर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यापैकी सिंधुदुर्गात एक लाख ६० हजार रोपे लावली जाणार आहेत. गतवर्षी वृक्षलागवडीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम आला होता, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली. केवळ झाडे लावून जमणार नाही, तर त्यांचे संगोपन होणे गरजेचे असल्याचे मत अतुल काळसेकर यांनी सभागृहात व्यक्त केले. सदस्य काका कुडाळकर, सुशांत नाईक, अभय शिरसाट, प्रकाश परब यांनी विविध विकासकामांच्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा घडवून आणली. भविष्यात आमचाही पालकमंत्री असेल : नीतेश राणेपालकमंत्री आपापल्या मतदारसंघातील विकासकामांची नावे सुचवा असे सांगतात. कामांची नावे सुचविली की स्वत:च्या अधिकारात कामे मंजूर करतात. कामे मंजूर करताना पक्षपातीपणा केला जातो. भविष्यात आमचाही पालकमंत्री असेल याचे भान ठेवून विकासकामे मंजूर करा, असा सल्ला आमदार नीतेश राणे यांनी दिला.