शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक

By सुधीर राणे | Updated: August 16, 2024 16:51 IST

लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील

कणकवली: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात झालेल्या जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान उद्धवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे राजकीय नाही तर जमिनीच्या वादामुळे सुरू आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.कणकवली विजय भवन येथे आज, शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, जनता दरबारातून सर्वसामान्यांचे किती प्रश्न मार्गी लागले हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. अन्यथा जनता दरबार हा केवळ निवडणुकीचा फार्स होता हे स्पष्ट होईल.गेल्यावर्षी शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ५ कोटींचा खर्च करण्यात आला. परंतु त्यातून सुध्दा प्रश्न सुटले नाहीत. हे वर्षभराने सत्ताधा-यांना समजले आहे. त्यामुळे तो खर्च फुकट गेला आहे. आता जनता दरबारवर जो खर्च झाला किंवा अधिकारी चार दिवस तिथे होते. त्यामाध्यमातून किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला? हे स्पष्ट करावे. ..कोणत्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल पालकमंत्री चव्हाण हे प्रत्येक गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होणार असल्याचे जाहीर करतात. प्रत्यक्षात चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होत नाही. त्यामुळे कुठल्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल हे देखील पालकमंत्र्यांनी जाहीर करायला हवे.जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांच्याच कुडाळ विधानसभा मतदारसंघातून जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी आल्याचे भाजपचे काही स्वयंघोषित पुढारी सांगत आहेत. परंतु त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री अडीच वर्षे कार्यरत आहेत. त्याच्या आधी पालकमंत्री असलेले आता महायुतीत आहेत. त्यांच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री पण होते. एवढे सत्ताधारी मंत्री असून सुध्दा प्रश्न का सुटले नाहीत ? याचा जाब सत्ताधा-यांना विचारावा. त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. जनता दरबारातील सर्वाधिक तक्रारी या भाजप कार्यकर्त्यांच्याच होत्या. भाजप कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी ऐकत नाहीत. त्यांची कामे करत नाहीत अशा तक्रारी नोंदविण्यात आल्या. जर जिल्हा प्रशासन भाजप कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असेल तर सामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडविणार? लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतीलपालकमंत्र्यांनी एका भाषणात सांगितले होते की , जनता आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. ही दरी निर्माण करण्यामध्ये ते स्वतः काहीअंशी कारणीभूत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक, पदवीधर निवडणूक, लोकसभा निवडणूक , ग्रामपंचायत निवडणूक यांमध्ये पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता जनतेची किंमत राहिलेली नाही. कणकवलीचे आमदार जाहिरपणे सांगतात की, निवडणूक आल्या की भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदार शोधत येतील. असा उन्मतपणा वाढल्यामुळेच कार्यकर्ते आणि जनतेतील दरी वाढलेली आहे. परंतु, मला निश्चित खात्री आहे की , सिंधुदुर्ग हा वेगळा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये यापुर्वी ज्या काही  गोष्टी झाल्या आहेत. त्यातून लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील असेही वैभव नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणVaibhav Naikवैभव नाईक BJPभाजपाhighwayमहामार्ग