शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक

By सुधीर राणे | Updated: August 16, 2024 16:51 IST

लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील

कणकवली: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात झालेल्या जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान उद्धवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे राजकीय नाही तर जमिनीच्या वादामुळे सुरू आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.कणकवली विजय भवन येथे आज, शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, जनता दरबारातून सर्वसामान्यांचे किती प्रश्न मार्गी लागले हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. अन्यथा जनता दरबार हा केवळ निवडणुकीचा फार्स होता हे स्पष्ट होईल.गेल्यावर्षी शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ५ कोटींचा खर्च करण्यात आला. परंतु त्यातून सुध्दा प्रश्न सुटले नाहीत. हे वर्षभराने सत्ताधा-यांना समजले आहे. त्यामुळे तो खर्च फुकट गेला आहे. आता जनता दरबारवर जो खर्च झाला किंवा अधिकारी चार दिवस तिथे होते. त्यामाध्यमातून किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला? हे स्पष्ट करावे. ..कोणत्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल पालकमंत्री चव्हाण हे प्रत्येक गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होणार असल्याचे जाहीर करतात. प्रत्यक्षात चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होत नाही. त्यामुळे कुठल्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल हे देखील पालकमंत्र्यांनी जाहीर करायला हवे.जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांच्याच कुडाळ विधानसभा मतदारसंघातून जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी आल्याचे भाजपचे काही स्वयंघोषित पुढारी सांगत आहेत. परंतु त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री अडीच वर्षे कार्यरत आहेत. त्याच्या आधी पालकमंत्री असलेले आता महायुतीत आहेत. त्यांच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री पण होते. एवढे सत्ताधारी मंत्री असून सुध्दा प्रश्न का सुटले नाहीत ? याचा जाब सत्ताधा-यांना विचारावा. त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. जनता दरबारातील सर्वाधिक तक्रारी या भाजप कार्यकर्त्यांच्याच होत्या. भाजप कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी ऐकत नाहीत. त्यांची कामे करत नाहीत अशा तक्रारी नोंदविण्यात आल्या. जर जिल्हा प्रशासन भाजप कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असेल तर सामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडविणार? लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतीलपालकमंत्र्यांनी एका भाषणात सांगितले होते की , जनता आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. ही दरी निर्माण करण्यामध्ये ते स्वतः काहीअंशी कारणीभूत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक, पदवीधर निवडणूक, लोकसभा निवडणूक , ग्रामपंचायत निवडणूक यांमध्ये पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता जनतेची किंमत राहिलेली नाही. कणकवलीचे आमदार जाहिरपणे सांगतात की, निवडणूक आल्या की भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदार शोधत येतील. असा उन्मतपणा वाढल्यामुळेच कार्यकर्ते आणि जनतेतील दरी वाढलेली आहे. परंतु, मला निश्चित खात्री आहे की , सिंधुदुर्ग हा वेगळा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये यापुर्वी ज्या काही  गोष्टी झाल्या आहेत. त्यातून लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील असेही वैभव नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणVaibhav Naikवैभव नाईक BJPभाजपाhighwayमहामार्ग