शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक

By सुधीर राणे | Updated: August 16, 2024 16:51 IST

लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील

कणकवली: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात झालेल्या जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान उद्धवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे राजकीय नाही तर जमिनीच्या वादामुळे सुरू आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.कणकवली विजय भवन येथे आज, शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, जनता दरबारातून सर्वसामान्यांचे किती प्रश्न मार्गी लागले हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. अन्यथा जनता दरबार हा केवळ निवडणुकीचा फार्स होता हे स्पष्ट होईल.गेल्यावर्षी शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ५ कोटींचा खर्च करण्यात आला. परंतु त्यातून सुध्दा प्रश्न सुटले नाहीत. हे वर्षभराने सत्ताधा-यांना समजले आहे. त्यामुळे तो खर्च फुकट गेला आहे. आता जनता दरबारवर जो खर्च झाला किंवा अधिकारी चार दिवस तिथे होते. त्यामाध्यमातून किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला? हे स्पष्ट करावे. ..कोणत्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल पालकमंत्री चव्हाण हे प्रत्येक गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होणार असल्याचे जाहीर करतात. प्रत्यक्षात चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होत नाही. त्यामुळे कुठल्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल हे देखील पालकमंत्र्यांनी जाहीर करायला हवे.जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांच्याच कुडाळ विधानसभा मतदारसंघातून जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी आल्याचे भाजपचे काही स्वयंघोषित पुढारी सांगत आहेत. परंतु त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री अडीच वर्षे कार्यरत आहेत. त्याच्या आधी पालकमंत्री असलेले आता महायुतीत आहेत. त्यांच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री पण होते. एवढे सत्ताधारी मंत्री असून सुध्दा प्रश्न का सुटले नाहीत ? याचा जाब सत्ताधा-यांना विचारावा. त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. जनता दरबारातील सर्वाधिक तक्रारी या भाजप कार्यकर्त्यांच्याच होत्या. भाजप कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी ऐकत नाहीत. त्यांची कामे करत नाहीत अशा तक्रारी नोंदविण्यात आल्या. जर जिल्हा प्रशासन भाजप कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असेल तर सामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडविणार? लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतीलपालकमंत्र्यांनी एका भाषणात सांगितले होते की , जनता आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. ही दरी निर्माण करण्यामध्ये ते स्वतः काहीअंशी कारणीभूत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक, पदवीधर निवडणूक, लोकसभा निवडणूक , ग्रामपंचायत निवडणूक यांमध्ये पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता जनतेची किंमत राहिलेली नाही. कणकवलीचे आमदार जाहिरपणे सांगतात की, निवडणूक आल्या की भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदार शोधत येतील. असा उन्मतपणा वाढल्यामुळेच कार्यकर्ते आणि जनतेतील दरी वाढलेली आहे. परंतु, मला निश्चित खात्री आहे की , सिंधुदुर्ग हा वेगळा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये यापुर्वी ज्या काही  गोष्टी झाल्या आहेत. त्यातून लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील असेही वैभव नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणVaibhav Naikवैभव नाईक BJPभाजपाhighwayमहामार्ग