शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाच वर्षे टिकेल : राजू मसुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:31 IST

वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

ठळक मुद्देफोडाफोडीच्या राजकारणाला नियतीनेच धडा शिकविल्याची टीका

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून जनतेला अभिप्रेत असलेले काम करून दाखवील, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने देशात व महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन केली. परंतु नियतीनेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या युतीत फूट पाडून त्यांना धडा शिकवला, अशी टीकाही मसुरकर यांनी केली आहे.

देशात मोदी, शहा यांच्या भाजप सरकारने विविध पक्षातील आमदारांना आमिष दाखवून पक्ष फोडण्याचे काम केले. कुठल्याही मार्गाने सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. परंतु महाराष्ट्रामध्ये नियतीनेच युती तोडण्याचे काम चाणाक्षपणे केले आहे. भाजपच्या गलिच्छ राजकारणाला जागा दाखविण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना त्या काळात किडनीचा आजार असताना त्यांची भेट घेऊन त्यांना मोफत सरकारी खर्चात उपचारांकरिता अमेरिकेत पाठविले होते. त्यांच्या प्रकृतीला धक्का लागू नये म्हणून त्यांची काळजी राजीव गांधी यांनी घेतली होती. हा आदर त्या काळात पक्षभिन्नता असूनही राजीव गांधी यांच्यामध्ये दिसला. परंतु सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेली सुरक्षा नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने काढून घेतली. हा फरक भाजपच्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे.

मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने काँग्रेसमुक्त भारत करण्याचा विडा उचलला होता. त्यांना नियतीनेच धडा शिकविला. राजीव गांधी पंतप्रधान असताना ४२५ खासदार काँग्रेस सरकारचे एकहाती निवडून आले होते. परंतु त्या काळात भाजपचे दोन खासदार असताना कधी चेष्टा व अनुद्गार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी काढले नव्हते.

वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व्यक्त केले. 

सरकार वैचारिक मतभेद बाजूला ठेवेलपुन्हा निवडणुका लागू नयेत म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण व आरोग्य, उद्योगधंदे, महागाई आदी प्रश्न सोडविण्यासाठी येणारे महाविकास आघाडीचे सरकार आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी याचा विचार करून सरकारला पूर्ण पाच वर्षांसाठी पाठिंबा देतील, अशी प्रतिक्रिया मसुरकर यांनी व्यक्त केली.सिंधुफोटो-राजू मसुरकरराजू मसुरकर

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणcongressकाँग्रेस