शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सरकार पाच वर्षे टिकेल : राजू मसुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:31 IST

वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

ठळक मुद्देफोडाफोडीच्या राजकारणाला नियतीनेच धडा शिकविल्याची टीका

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून जनतेला अभिप्रेत असलेले काम करून दाखवील, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने देशात व महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन केली. परंतु नियतीनेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या युतीत फूट पाडून त्यांना धडा शिकवला, अशी टीकाही मसुरकर यांनी केली आहे.

देशात मोदी, शहा यांच्या भाजप सरकारने विविध पक्षातील आमदारांना आमिष दाखवून पक्ष फोडण्याचे काम केले. कुठल्याही मार्गाने सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. परंतु महाराष्ट्रामध्ये नियतीनेच युती तोडण्याचे काम चाणाक्षपणे केले आहे. भाजपच्या गलिच्छ राजकारणाला जागा दाखविण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना त्या काळात किडनीचा आजार असताना त्यांची भेट घेऊन त्यांना मोफत सरकारी खर्चात उपचारांकरिता अमेरिकेत पाठविले होते. त्यांच्या प्रकृतीला धक्का लागू नये म्हणून त्यांची काळजी राजीव गांधी यांनी घेतली होती. हा आदर त्या काळात पक्षभिन्नता असूनही राजीव गांधी यांच्यामध्ये दिसला. परंतु सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेली सुरक्षा नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने काढून घेतली. हा फरक भाजपच्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे.

मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने काँग्रेसमुक्त भारत करण्याचा विडा उचलला होता. त्यांना नियतीनेच धडा शिकविला. राजीव गांधी पंतप्रधान असताना ४२५ खासदार काँग्रेस सरकारचे एकहाती निवडून आले होते. परंतु त्या काळात भाजपचे दोन खासदार असताना कधी चेष्टा व अनुद्गार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी काढले नव्हते.

वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व्यक्त केले. 

सरकार वैचारिक मतभेद बाजूला ठेवेलपुन्हा निवडणुका लागू नयेत म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण व आरोग्य, उद्योगधंदे, महागाई आदी प्रश्न सोडविण्यासाठी येणारे महाविकास आघाडीचे सरकार आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी याचा विचार करून सरकारला पूर्ण पाच वर्षांसाठी पाठिंबा देतील, अशी प्रतिक्रिया मसुरकर यांनी व्यक्त केली.सिंधुफोटो-राजू मसुरकरराजू मसुरकर

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणcongressकाँग्रेस