शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

सरकार पाच वर्षे टिकेल : राजू मसुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:31 IST

वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

ठळक मुद्देफोडाफोडीच्या राजकारणाला नियतीनेच धडा शिकविल्याची टीका

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून जनतेला अभिप्रेत असलेले काम करून दाखवील, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने देशात व महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन केली. परंतु नियतीनेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या युतीत फूट पाडून त्यांना धडा शिकवला, अशी टीकाही मसुरकर यांनी केली आहे.

देशात मोदी, शहा यांच्या भाजप सरकारने विविध पक्षातील आमदारांना आमिष दाखवून पक्ष फोडण्याचे काम केले. कुठल्याही मार्गाने सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. परंतु महाराष्ट्रामध्ये नियतीनेच युती तोडण्याचे काम चाणाक्षपणे केले आहे. भाजपच्या गलिच्छ राजकारणाला जागा दाखविण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना त्या काळात किडनीचा आजार असताना त्यांची भेट घेऊन त्यांना मोफत सरकारी खर्चात उपचारांकरिता अमेरिकेत पाठविले होते. त्यांच्या प्रकृतीला धक्का लागू नये म्हणून त्यांची काळजी राजीव गांधी यांनी घेतली होती. हा आदर त्या काळात पक्षभिन्नता असूनही राजीव गांधी यांच्यामध्ये दिसला. परंतु सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेली सुरक्षा नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने काढून घेतली. हा फरक भाजपच्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे.

मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने काँग्रेसमुक्त भारत करण्याचा विडा उचलला होता. त्यांना नियतीनेच धडा शिकविला. राजीव गांधी पंतप्रधान असताना ४२५ खासदार काँग्रेस सरकारचे एकहाती निवडून आले होते. परंतु त्या काळात भाजपचे दोन खासदार असताना कधी चेष्टा व अनुद्गार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी काढले नव्हते.

वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व्यक्त केले. 

सरकार वैचारिक मतभेद बाजूला ठेवेलपुन्हा निवडणुका लागू नयेत म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण व आरोग्य, उद्योगधंदे, महागाई आदी प्रश्न सोडविण्यासाठी येणारे महाविकास आघाडीचे सरकार आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी याचा विचार करून सरकारला पूर्ण पाच वर्षांसाठी पाठिंबा देतील, अशी प्रतिक्रिया मसुरकर यांनी व्यक्त केली.सिंधुफोटो-राजू मसुरकरराजू मसुरकर

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणcongressकाँग्रेस