शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शासनाने काजू आयात शुल्क १० टक्के करावे, काजू, आंबा बागायतदारांच्या बैठकीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 17:40 IST

काजू प्रक्रिया उद्योगाला शंभर वर्षे झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आयात काजू बीवरील आयात शुल्क ५ टक्क्यावरुन अडीच टक्के केल्याने परदेशातील काजू बीची आयात वाढली आहे. त्यामुळे येथील काजू बीचे दर घसरले आहेत. शासनाने काजू आयात शुल्क १० टक्के करावे, असा ठराव सिंधुदुर्ग काजू आंबा बागायतदार, शास्त्रज्ञ विचार मंचच्या सभेत करण्यात आला.

ठळक मुद्देशासनाने काजू आयात शुल्क १० टक्के करावेकाजू, आंबा बागायतदारांच्या बैठकीत ठराव

वेंगुर्ले : काजू प्रक्रिया उद्योगाला शंभर वर्षे झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आयात काजू बीवरील आयात शुल्क ५ टक्क्यावरुन अडीच टक्के केल्याने परदेशातील काजू बीची आयात वाढली आहे. त्यामुळे येथील काजू बीचे दर घसरले आहेत. शासनाने काजू आयात शुल्क १० टक्के करावे, असा ठराव सिंधुदुर्ग काजू आंबा बागायतदार, शास्त्रज्ञ विचार मंचच्या सभेत करण्यात आला.सिंधुदुर्ग काजू, आंबा बागायतदार शास्त्रज्ञ विचार मंचची सभा येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राच्या सभागृहात मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शिवराम आरोलकर, दाजी धुरी, प्रकाश गावडे, सदाशिव आळवे, विलास ठाकूर, हनुमंत आंगचेकर, समाधान बांदवलकर, रामचंद्र मांजरेकर, प्रताप गावस्कर, प्रकाश बोवलेकर, संतोष लुडबे, श्रीकांत नाईक, निखील धरणे आदी उपस्थित होते.काजू धोरण निश्चित करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली काजू फळबाग विकास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या. मात्र, या समितीमध्ये काजू बागायतदार शेतकऱ्यांपेक्षा कारखानदारांचाच जास्त भरणा असल्याने त्यांनी काजू कारखानदारीसाठी अनुकूल धोरण आखले.

त्यात शेतकऱ्यांचा फायदा न होता त्याचा कारखानदारांना फायदा झाला. त्यामुळे ही समिती शासनाने रद्द करुन समितीमध्ये काजू बागायतदारांचे प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे प्रतिनिधी नेमावा, असा ठराव करण्यात आला. डॉ. बी. एन. सावंत, डॉ. मोहन दळवी, डॉ. संजय देसाई यांनी मार्गदर्शन केले.११ फेब्रुवारीला वेंगुर्लेत मेळावाकाजू मानांकनासंदर्भात चर्चा करण्यासाठी ११ फेब्रुवारीला वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र्रात मेळावा आयोजित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी वेंगुर्ले भेटीत येथील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषिमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांची बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कृषिमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग