शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

हे धनदांडग्यांचे सरकार : जयंद्रथ खताते

By admin | Published: December 01, 2015 10:39 PM

राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत.

चिपळूण : राज्य शासनाने घरपट्टीवरील स्थगिती उठवताना नवीन धोरणानुसार जी घरपट्टी आकारणी सुचविली आहे ती सर्वसामान्य माणसावर अन्याय करणारी आहे. ही घरपट्टी भांडवली मूल्यांवर आधारित होणार आहे, पण आता दर कमी केले आहेत. टोलमाफी करुन श्रीमंतांचे चोचले पुरवणारे हे सरकार सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडत आहे. हे सरकार धनदांडग्यांचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकारने घरपट्टी आकारणीवर स्थगिती आणली होती. ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, घरपट्टीवादावर अधिसूचनेचा तोडगा काढण्यात आला आहे. भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत खताते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार १ हजार रुपयांवर ३० पैसे किमान व कमाल २ रुपयापर्यंत कर आकारणी केली जाणार आहे. जुन्या अधिसूचनेत १०० रुपयांवर कर आकारण्यात येणार होता. त्याला ग्रामपंचायतीकडून विरोध झाल्याने नवीन अधिसूचना काढून भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी पद्धतीत बदल केला आहे. यामुळे कराची रक्कम कमी होईल. तरीही वार्षिक घरपट्टी किमान ४०० रुपयांनी वाढणार आहे. राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत. याचा विचार सर्व ग्रामपंचायतींनी करुन आपल्या हरकती नोंदवायला हव्यात, असेही खताते यांनी स्पष्ट केले. या सरकारला शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे व सामान्य माणसांशी काही देणेघेणे नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता पाग महिला विद्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम व जिल्हाध्यक्ष शेखर निकम मार्गदर्शन करणार आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)