शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, खरेदीची रक्कम अन् बोनस  मिळणार 

By सुधीर राणे | Updated: March 31, 2023 16:58 IST

५ हजार ६२१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाने १ लाख ६२२ क्विंटल भात खरेदी केली होती. भात खरेदीची रक्कम आणि बोनस  संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. ही रक्कम २६ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केला असल्याचेही ते म्हणाले.यावेळी काळसेकर म्हणाले, गेल्या काही वर्षंपासून शेतकऱ्यांकडून  भात खरेदी केली जाते. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीची  ई- पीक पाहणी करत भात खरेदी केंद्रांवर नोंद केली आहे. त्या शेतकऱ्यांना बोनस स्वरुपात ५ कोटी ७३ लाख २० हजार ६१० रुपये आणि भात विक्रीचे २० कोटी ५२ लाख ६९ हजार ३९० रुपये असे एकूण २६ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये प्राप्त होणार आहेत. ५ हजार ६२१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास जिल्हा बँक अध्यक्ष अथवा आपल्याला संपर्क साधावा. यापूर्वीच्या  काळात भात खरेदी दर अत्यल्प होता. व्यापारी कवडीमोल दराने भात खरेदी करीत होते. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १७ रुपये दराने भात खरेदी करत बोनस देतो असे सांगितले होते. मात्र,त्यांना तो देता आलेला नाही. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले नाहीत असा टोलाही अतुल काळसेकर यांनी यावेळी लगावला.भात उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस स्वरूपात मिळणार आहेत. तर सध्याच्या शिंदे-फडणवीस युती सरकारने निधीची विशेष तरतूद अर्थसंकल्पात केल्याने काजू बागायतदारांना दिलासा मिळणार आहे. जीआय मानांकन करण्यासाठीही  तरतूद करण्यात आली आहे. येत्या  काळात काजू बोंडू पासून इथेलॉन निर्मिती करणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल. काजूला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही अतुल काळसेकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकFarmerशेतकरी