शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जीआय मानांकनाने सिंधुदुर्गातील काजूला विशेष दर्जा : मुंबरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:01 IST

सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रियाधारक यांनी हे जीआय मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कोकण काजू समुहाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती करावी. असे आवाहन कोकण काजू समुहाचे अध्यक्ष सुरेश नेरूरकर व उपाध्यक्ष प्रा. डॉ.राजेंद्र्र मुंबरकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील काजूला विशेष दर्जा प्राप्त : राजेंद्र मुंबरकरजीआय मानांकनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जा

कणकवली : देशात पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील काजूला भारत सरकारकडून (जिओग्राफीकल इंडिकेशन- जी. आय.) अर्थात भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन प्राप्त झाल्याने सिंधुदुगार्तील काजूला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रियाधारक यांनी हे जीआय मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कोकण काजू समुहाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती करावी. असे आवाहन कोकण काजू समुहाचे अध्यक्ष सुरेश नेरूरकर व उपाध्यक्ष प्रा. डॉ.राजेंद्र्र मुंबरकर यांनी केले आहे.कोकण काजू समुहाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सिंधुदुर्गच्या काजूला भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. याविषयी माहिती देण्यासाठी कोकण काजू समूह, सिंधुदुर्ग व रत्नागिरी- सिंधुदुर्ग महा कोकम संस्था, विरण यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी काजू उद्योजक प्रमोद भोगटे, प्रकाश पावसकर, सुहास पालव , अंकुश सावंत, मंगेश नेवगे, कमलाकर घोगळे आदी उपस्थित होते.यावेळी सुरेश नेरुरकर म्हणाले, जी. आय. मानांकन म्हणजे सिंधुदुर्गातील काजूला खास दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये सिंधुदुगार्तील काजूला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.त्याचबरोबर येथील काजूला वेगळा दर्जा प्राप्त होवून त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने पयार्याने सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रती किलो सुमारे १८० ते २०० रुपये दर मिळण्यास मदत होणार आहे.जी. आय. म्हणजे भौगोलिक मानांकन असते. एखाद्या ठिकाणच्या वातावरण, माती, हवामान अशा भौगोलिक परिस्थितीमुळे विशिष्ट वस्तू इतर भागापेक्षा वेगळी असते. आपल्या सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थिती व लाल माती मधील काजूची चव देशातील इतर कोणत्याही काजू पेक्षा वेगळी आहे. हे शासनाच्या संबधित विभागा समोर सिद्ध करावे लागते. यासाठी जी.एम. जी. सी. पुणे येथील प्रोफेसर हिंगमीरे यांनी योग्य पध्द्तीत आपल्या काजूची मांडणी शासनासमोर केली आहे. त्यामुळे काजूला जी.आय. मानांकन मिळणे सोपे झाले आहे.

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग