शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जीआय मानांकनाने सिंधुदुर्गातील काजूला विशेष दर्जा : मुंबरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:01 IST

सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रियाधारक यांनी हे जीआय मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कोकण काजू समुहाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती करावी. असे आवाहन कोकण काजू समुहाचे अध्यक्ष सुरेश नेरूरकर व उपाध्यक्ष प्रा. डॉ.राजेंद्र्र मुंबरकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील काजूला विशेष दर्जा प्राप्त : राजेंद्र मुंबरकरजीआय मानांकनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जा

कणकवली : देशात पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील काजूला भारत सरकारकडून (जिओग्राफीकल इंडिकेशन- जी. आय.) अर्थात भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन प्राप्त झाल्याने सिंधुदुगार्तील काजूला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रियाधारक यांनी हे जीआय मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कोकण काजू समुहाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती करावी. असे आवाहन कोकण काजू समुहाचे अध्यक्ष सुरेश नेरूरकर व उपाध्यक्ष प्रा. डॉ.राजेंद्र्र मुंबरकर यांनी केले आहे.कोकण काजू समुहाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सिंधुदुर्गच्या काजूला भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. याविषयी माहिती देण्यासाठी कोकण काजू समूह, सिंधुदुर्ग व रत्नागिरी- सिंधुदुर्ग महा कोकम संस्था, विरण यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी काजू उद्योजक प्रमोद भोगटे, प्रकाश पावसकर, सुहास पालव , अंकुश सावंत, मंगेश नेवगे, कमलाकर घोगळे आदी उपस्थित होते.यावेळी सुरेश नेरुरकर म्हणाले, जी. आय. मानांकन म्हणजे सिंधुदुर्गातील काजूला खास दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये सिंधुदुगार्तील काजूला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.त्याचबरोबर येथील काजूला वेगळा दर्जा प्राप्त होवून त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने पयार्याने सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रती किलो सुमारे १८० ते २०० रुपये दर मिळण्यास मदत होणार आहे.जी. आय. म्हणजे भौगोलिक मानांकन असते. एखाद्या ठिकाणच्या वातावरण, माती, हवामान अशा भौगोलिक परिस्थितीमुळे विशिष्ट वस्तू इतर भागापेक्षा वेगळी असते. आपल्या सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थिती व लाल माती मधील काजूची चव देशातील इतर कोणत्याही काजू पेक्षा वेगळी आहे. हे शासनाच्या संबधित विभागा समोर सिद्ध करावे लागते. यासाठी जी.एम. जी. सी. पुणे येथील प्रोफेसर हिंगमीरे यांनी योग्य पध्द्तीत आपल्या काजूची मांडणी शासनासमोर केली आहे. त्यामुळे काजूला जी.आय. मानांकन मिळणे सोपे झाले आहे.

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग