शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

जीआय मानांकनाने सिंधुदुर्गातील काजूला विशेष दर्जा : मुंबरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:01 IST

सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रियाधारक यांनी हे जीआय मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कोकण काजू समुहाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती करावी. असे आवाहन कोकण काजू समुहाचे अध्यक्ष सुरेश नेरूरकर व उपाध्यक्ष प्रा. डॉ.राजेंद्र्र मुंबरकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील काजूला विशेष दर्जा प्राप्त : राजेंद्र मुंबरकरजीआय मानांकनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जा

कणकवली : देशात पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील काजूला भारत सरकारकडून (जिओग्राफीकल इंडिकेशन- जी. आय.) अर्थात भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन प्राप्त झाल्याने सिंधुदुगार्तील काजूला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रियाधारक यांनी हे जीआय मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कोकण काजू समुहाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती करावी. असे आवाहन कोकण काजू समुहाचे अध्यक्ष सुरेश नेरूरकर व उपाध्यक्ष प्रा. डॉ.राजेंद्र्र मुंबरकर यांनी केले आहे.कोकण काजू समुहाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सिंधुदुर्गच्या काजूला भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. याविषयी माहिती देण्यासाठी कोकण काजू समूह, सिंधुदुर्ग व रत्नागिरी- सिंधुदुर्ग महा कोकम संस्था, विरण यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी काजू उद्योजक प्रमोद भोगटे, प्रकाश पावसकर, सुहास पालव , अंकुश सावंत, मंगेश नेवगे, कमलाकर घोगळे आदी उपस्थित होते.यावेळी सुरेश नेरुरकर म्हणाले, जी. आय. मानांकन म्हणजे सिंधुदुर्गातील काजूला खास दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये सिंधुदुगार्तील काजूला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.त्याचबरोबर येथील काजूला वेगळा दर्जा प्राप्त होवून त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने पयार्याने सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रती किलो सुमारे १८० ते २०० रुपये दर मिळण्यास मदत होणार आहे.जी. आय. म्हणजे भौगोलिक मानांकन असते. एखाद्या ठिकाणच्या वातावरण, माती, हवामान अशा भौगोलिक परिस्थितीमुळे विशिष्ट वस्तू इतर भागापेक्षा वेगळी असते. आपल्या सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थिती व लाल माती मधील काजूची चव देशातील इतर कोणत्याही काजू पेक्षा वेगळी आहे. हे शासनाच्या संबधित विभागा समोर सिद्ध करावे लागते. यासाठी जी.एम. जी. सी. पुणे येथील प्रोफेसर हिंगमीरे यांनी योग्य पध्द्तीत आपल्या काजूची मांडणी शासनासमोर केली आहे. त्यामुळे काजूला जी.आय. मानांकन मिळणे सोपे झाले आहे.

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग