शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

नांदगाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:40 IST

water sindhudurg- नांदगाव येथील अनियमित पाणीपुरवठा होत असलेल्या आठ वाड्यांमधील नळ ग्राहकांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे सव्वाशे ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन तासांच्या चर्चेनंतर दहा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा समाप्त झाला.

ठळक मुद्देनांदगाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोशकोणी पाणी देता का पाणी? घोषणांनी परिसर दणाणला

तळेरे : नांदगाव येथील अनियमित पाणीपुरवठा होत असलेल्या आठ वाड्यांमधील नळ ग्राहकांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे सव्वाशे ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन तासांच्या चर्चेनंतर दहा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा समाप्त झाला.नांदगाव येथील वाशिनवाडी, नांदगाव तिठा, खालची मुस्लीमवाडी, सिसयेवाडी, बिडयेवाडी, मोरयेवाडी, पाटीलवाडी, पावाचीवाडी अशा आठ वाड्यांसाठी असलेल्या नळपाणी योजनेतून गेले अनेक दिवस अनियमित पाणीपुरवठा होत आहे. या वाड्यांना नियमित पाणीपुरवठा करावा अन्यथा घागर मोर्चा काढू, असे लेखी निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने काढण्यात आलेल्या मोर्चात बहुसंख्येने नळ ग्राहक सहभागी झाले होते.ह्यकोणी पाणी देता का पाणी, पाणी नाही नळाला, ग्रामपंचायत हवी कशाला, पाणी सुरळीत करा, नांदगावातील नळ ग्राहकांचा विजय असो अशा घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला होता. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हंडे, घागरी वाजवत कोणी पाणी देता का हो पाणी अशी घोषणा देत नळपाणी ग्राहकांचा मोर्चा ग्रामपंचायतवर धडकला.दोन तास चर्चा झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार १० दिवसांची मुदत देण्यात आली. या कालावधीत पाणी सुरळीत न झाल्यास १२ फेब्रुवारीला पुन्हा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आला. याबाबत सरपंच व उपसरपंच यांनी मोर्चात सहभागी ग्राहकांना माहिती देताना सांगितले की, केसीसी कंपनीमुळे आपली नळ पाईप लाईनची कामे बाकी आहेत. त्यांना सूचना देऊनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे तुमची आम्हांला साथ हवी आहे.यावेळी तोसिम नावलेकर, बाळा सातोसे, दीपक मोरजकर, सोसायटी चेअरमन रवींद्र तेली, बाळा मोरये, बाळा बिडये, विटू बिडये, समीर नावलेकर, हसन नाचरे, संतोष बिडये, कमलेश मोदी तसेच घागर मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर उपस्थित होते. ग्रामपंचायतीकडून या चर्चेत नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच नीरज मोरये, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, भाई मोरजकर तसेच सदस्य, केसीसी कंपनी तसेच जीवन प्राधिकरण अधिकारीही उपस्थित होते.पोलीस बंदोबस्त तैनातसोमवारी सकाळी १० वाजल्यापासून नळ ग्राहक नांदगाव, ओटव फाट्यावरील बॉक्स पुलाखाली जमा झाल्यानंतर ११ वाजता घागर मोर्चाला सुरूवात झाली. नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव ग्रामपंचायतपर्यंत पायी चालत घागर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :water shortageपाणीकपातsindhudurgसिंधुदुर्ग