शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:40 IST

water sindhudurg- नांदगाव येथील अनियमित पाणीपुरवठा होत असलेल्या आठ वाड्यांमधील नळ ग्राहकांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे सव्वाशे ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन तासांच्या चर्चेनंतर दहा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा समाप्त झाला.

ठळक मुद्देनांदगाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोशकोणी पाणी देता का पाणी? घोषणांनी परिसर दणाणला

तळेरे : नांदगाव येथील अनियमित पाणीपुरवठा होत असलेल्या आठ वाड्यांमधील नळ ग्राहकांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे सव्वाशे ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन तासांच्या चर्चेनंतर दहा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा समाप्त झाला.नांदगाव येथील वाशिनवाडी, नांदगाव तिठा, खालची मुस्लीमवाडी, सिसयेवाडी, बिडयेवाडी, मोरयेवाडी, पाटीलवाडी, पावाचीवाडी अशा आठ वाड्यांसाठी असलेल्या नळपाणी योजनेतून गेले अनेक दिवस अनियमित पाणीपुरवठा होत आहे. या वाड्यांना नियमित पाणीपुरवठा करावा अन्यथा घागर मोर्चा काढू, असे लेखी निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने काढण्यात आलेल्या मोर्चात बहुसंख्येने नळ ग्राहक सहभागी झाले होते.ह्यकोणी पाणी देता का पाणी, पाणी नाही नळाला, ग्रामपंचायत हवी कशाला, पाणी सुरळीत करा, नांदगावातील नळ ग्राहकांचा विजय असो अशा घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला होता. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हंडे, घागरी वाजवत कोणी पाणी देता का हो पाणी अशी घोषणा देत नळपाणी ग्राहकांचा मोर्चा ग्रामपंचायतवर धडकला.दोन तास चर्चा झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार १० दिवसांची मुदत देण्यात आली. या कालावधीत पाणी सुरळीत न झाल्यास १२ फेब्रुवारीला पुन्हा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आला. याबाबत सरपंच व उपसरपंच यांनी मोर्चात सहभागी ग्राहकांना माहिती देताना सांगितले की, केसीसी कंपनीमुळे आपली नळ पाईप लाईनची कामे बाकी आहेत. त्यांना सूचना देऊनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे तुमची आम्हांला साथ हवी आहे.यावेळी तोसिम नावलेकर, बाळा सातोसे, दीपक मोरजकर, सोसायटी चेअरमन रवींद्र तेली, बाळा मोरये, बाळा बिडये, विटू बिडये, समीर नावलेकर, हसन नाचरे, संतोष बिडये, कमलेश मोदी तसेच घागर मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर उपस्थित होते. ग्रामपंचायतीकडून या चर्चेत नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच नीरज मोरये, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, भाई मोरजकर तसेच सदस्य, केसीसी कंपनी तसेच जीवन प्राधिकरण अधिकारीही उपस्थित होते.पोलीस बंदोबस्त तैनातसोमवारी सकाळी १० वाजल्यापासून नळ ग्राहक नांदगाव, ओटव फाट्यावरील बॉक्स पुलाखाली जमा झाल्यानंतर ११ वाजता घागर मोर्चाला सुरूवात झाली. नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव ग्रामपंचायतपर्यंत पायी चालत घागर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :water shortageपाणीकपातsindhudurgसिंधुदुर्ग