शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

दोन्ही मार्ग टोलमुक्त करा : उपरकर

By admin | Updated: August 20, 2015 23:07 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्याही हवेत घोषणा

कणकवली : शासनाने गणेशभक्तांसाठी म्हणून मुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. जर शासनाला खरोखर गणेशभक्तांना टोल मुक्त सेवा द्यायची असेल तर पुणे-कोल्हापूर मार्गही टोलमुक्त करावेत, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. उपरकर म्हणाले की, गणेशभक्तांसाठी मुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्त करण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर मनसेचे शिष्टमंडळ मुंबई-पुणे-कोल्हापूर हा मार्गही टोलमुक्त करण्याची मागणी करणार आहे. कारण मुंबई-गोवा महामार्ग निकृष्ट झाला आहे. पनवेल ते वडखळ या दरम्यान अनेक ठिकाणी खोदकाम झाले आहे. गेल्या वर्षी मुंबई ते सिंधुदुर्ग हा दहा तासांचा प्रवासासाठी १८ ते २४ तास लागले. या मार्गावर गणेशोत्सवात वाढणारी वर्दळ, होणारे अपघात यामुळे चाकरमानी पुणे-कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गात येण्यासाठी प्राधान्य देतात. शासनाला खरोखर गणेशभक्तांना दिलासा द्यायचा असेल तर पुणे-कोल्हापूर मार्गावरही टोल मुक्ती करावी, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांच्याही हवेत घोषणापालकमंत्री दीपक केसरकर यांच्याप्रमाणे जिल्हाधिकारीही हवेत घोषणा करू लागले आहेत. पालकमंत्र्यांनी दिलेला निधीचा हिशेब फक्त माध्यमांना सांगण्यासाठी असून कागदोपत्री त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्याप्रमाणे मागील जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी ४ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ३०० कोटी रूपये मंजूर झाले असून त्यापैकी १०० कोटी रूपये पहिल्या टप्प्यात प्राप्त होणार असल्याचे सांगितले होते. त्याबद्दल माहिती मागवली असता पर्यटनस्थळांच्या विकासासाठी जाहीर केलेल्या निधीचा शासन निर्णय अथवा पर्यटन विकासविषयक होणाऱ्या कामांच्या याद्या उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आल्याचे उपरकर यांनी सांगितले. कॉफीटेबल बुक कुठे आहे?पर्यटन महोत्सवादरम्यान जिल्हा प्रशासनातर्फे कॉफीटेबल बुक प्रकाशित करण्यात आले. त्याच्या किती प्रती छापण्यात आल्या, ते कोणाला वाटण्यात आले, किती विक्री झाली याबाबत विचारले असता कॉफीटेबल बुकसाठीचा ३२ लाखांचा निधी पर्यटन विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आल्याचे उत्तर जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात आल्याचे उपरकर यांनी सांगितले. आराखड्यांवर खर्च वायफळपर्यटन विकास आराखड्यासाठी नागपूर येथील क्रिएटिव्ह सर्कल या आस्थापनेला ८.११ लाख रूपयांपैकी ५ लाख रूपये देण्यात आले. वारंवार पर्यटन आराखडे करण्यात येतात. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. आराखड्यांवर वायफळ खर्च जिल्हा प्रशासन करत असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.