शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याने कांदळवन क्षेत्रे बुजविली, मालवणमधील पर्यावरणप्रेमी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:47 IST

सागरी महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जमिनीत मातीचे भराव टाकून आणि कचºयाचे ढीगच्या ढीग टाकून कांदळवनाचा परिसरच बुजविण्यात आल्याची गंभीर बाब मालवणातील पर्यावरणप्रेमींनी उजेडात आणली.

ठळक मुद्देकचऱ्याने कांदळवन क्षेत्रे बुजविली, मालवणमधील पर्यावरणप्रेमी आक्रमकमातीचा टाकला भराव, पर्यावरण विभागाचे कारवाईचे आदेश

मालवण : सागरी महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जमिनीत मातीचे भराव टाकून आणि कचºयाचे ढीगच्या ढीग टाकून कांदळवनाचा परिसरच बुजविण्यात आल्याची गंभीर बाब मालवणातील पर्यावरणप्रेमींनी उजेडात आणली.

याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी संबंधितांवर कारवाई करून सात दिवसांच्या आत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल, असे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी या महामार्गावर रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी पर्यावरण प्रेमींकडून निवेदन स्वीकारले.दरम्यान, ही कांदळवने बेकायदेशीर बुजविल्याप्रकरणाची दखल महाराष्ट्र सागरी क्षेत्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणच्या पर्यावरण विभागाने घेतली आहे. मालवणच्या सागरी महामार्गावरील भागात सीआरझेड कायद्याचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.मालवण शहरातील देऊळवाडा येथील सागरी महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या कांदळवनांचा भाग हा बेकायदेशीरपणे माती, कचऱ्याचा भराव टाकून बुजविण्यात आल्याचे समजताच मालवणातील पर्यावरणप्रेमी व सजग नागरिक एकत्र आले आहेत.

कोकण कांदळवन समितीसह तहसीलदार, कांदळवनकक्ष, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, मालवण पोलीस निरीक्षक, अधीक्षक उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगराध्यक्ष, मालवण नगरपालिका यांना निवेदन देऊन या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.याबाबत पर्यावरणप्रेमी अ‍ॅड. ओंकार केणी, भूगर्भ अभ्यासक प्रा. हसन खान, पर्यावरण अभ्यासक चंद्रवदन कुडाळकर, इको टुरिझमचे प्रसाद गावडे, लक्ष्मीकांत खोबरेकर, स्वाती पारकर यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.करू निसर्गाचे संवर्धन, वाचवू पर्यावरणसागरी महामार्गाच्या सभोवतालच्या कांदळवनामध्ये कचरा साठत गेल्यास पाणी पुनर्भरण प्रक्रिया कमी होऊन विहिरींचे पाणी कमी होईल. तसेच कचऱ्यातील विषारी घटक विहिरीचे पाणी प्रदूषित करतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी व्यक्त केली.सागरी महामार्गावर पूर्वी दिसणारे पक्षी, कोल्हे, कासव आता दिसत नाहीत, अशी खंत स्वाती पारकर यांनी व्यक्त केली.कांदळवन क्षेत्रात खारफुटीच्या झाडांमध्ये कार्बन डायआॅक्साईड शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे आणि आॅक्सिजन सोडण्याची क्षमताही जास्त आहे, त्यामुळे पर्यावरणीय परिसंस्थेचे संवर्धन आणि संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे चंद्रवदन कुडाळकर यांनी सांगितले. मालवणच्या निसर्गाचे संवर्धन करणे आणि कचरामुक्त ठेवणे ही मालवणी माणूस म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे, असे प्रसाद गावडे यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्ग