शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

गडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:00 IST

भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !कणकवली, तेलीआळी येथे डबलबारी भजनाचा कार्यक्रम

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजन प्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षि अर्जुन तावड़े बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजन प्रेमीना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला . तसेच तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावस्येच्या काळरात्री भजन प्रेमिवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील करती सवरती माणसे मृत झाली होती.

या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधितच पोहचली. या संकटसमयी अनेक व्यक्ति मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमीना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमीना सावंतवाड़ी तर वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५१ वर्षे त्यांचे कुटुंबिय तसेच कणकवली वासीय सुदर्शन मित्र मंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तेलीआळी येथे एकत्र येत भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिना आदरांजली वाहत आहेत. या अपघाताला या वर्षी ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे.यावेळी आमने सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कुडाळ , भरणी येथील बुवा विनोद चव्हाण व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलिआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग