शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:00 IST

भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !कणकवली, तेलीआळी येथे डबलबारी भजनाचा कार्यक्रम

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजन प्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षि अर्जुन तावड़े बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजन प्रेमीना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला . तसेच तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावस्येच्या काळरात्री भजन प्रेमिवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील करती सवरती माणसे मृत झाली होती.

या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधितच पोहचली. या संकटसमयी अनेक व्यक्ति मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमीना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमीना सावंतवाड़ी तर वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५१ वर्षे त्यांचे कुटुंबिय तसेच कणकवली वासीय सुदर्शन मित्र मंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तेलीआळी येथे एकत्र येत भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिना आदरांजली वाहत आहेत. या अपघाताला या वर्षी ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे.यावेळी आमने सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कुडाळ , भरणी येथील बुवा विनोद चव्हाण व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलिआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग