शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

गडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:00 IST

भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !कणकवली, तेलीआळी येथे डबलबारी भजनाचा कार्यक्रम

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजन प्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षि अर्जुन तावड़े बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजन प्रेमीना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला . तसेच तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावस्येच्या काळरात्री भजन प्रेमिवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील करती सवरती माणसे मृत झाली होती.

या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधितच पोहचली. या संकटसमयी अनेक व्यक्ति मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमीना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमीना सावंतवाड़ी तर वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५१ वर्षे त्यांचे कुटुंबिय तसेच कणकवली वासीय सुदर्शन मित्र मंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तेलीआळी येथे एकत्र येत भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिना आदरांजली वाहत आहेत. या अपघाताला या वर्षी ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे.यावेळी आमने सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कुडाळ , भरणी येथील बुवा विनोद चव्हाण व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलिआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग