शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:20 IST

कुडाळ : मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला ...

ठळक मुद्देशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा जिल्ह्यातील ग्रामस्थांची मागणी

कुडाळ : मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांतून होत आहे.सिंधुदुर्गातील प्रमुख पीक म्हणून भातशेती केली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर ही भातशेती केली जाते. अनेक शेतकरी या भातशेतीवर अवलंबून आहेत. आता भातशेती जवळपास पूर्ण परिपक्व असून त्याची कापणी होणे गरजेचे असतानाच गेले काही दिवस मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात १० टक्केही भातकापणी झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खरेतर कोकणातील शेतकरी हा कणखर मानला जातो. कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या किंवा काही होऊ द्या, मात्र येथील शेतकरी पुन्हा उभा राहून असलेल्या संकटावर मात करतो अशी येथील शेतकऱ्यांची ओळख आहे.मात्र, यावर्षी पाऊसच नव्हे तर वादळाबरोबर आलेल्या पावसामुळे कापणीसाठी तयार असलेले भातपीक जमीनदोस्त झाले.

सतत पडणाऱ्या पावसामुळे भातपीक कुजून जात आहे. काही ठिकाणी भातपिकाला आता कोंब आले आहेत. त्यामुळे आता या भातपिकापासून कोणताही फायदा येथील शेतकऱ्यांना होणार नसल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जून महिन्यापासून मेहनत घेऊन भातशेती केली. आता ती पूर्ण होत असताना या पावसाने घास हिरावून घेतला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आता रडू कोसळत आहे. या शेतकऱ्यांचे अश्रू आता सरकार पुसणार का? या शेतकऱ्यासाठी सरकार तातडीने आर्थिक मदत जाहीर करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील भातशेतीची कापणी आतापर्यंत १० टक्केही झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच अतिवृष्टीची नोंद झाली तरच येथील शेतकऱ्यांना मदत मिळू शकते असेही कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली तरच त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार का? असा सवाल केला जात आहे.लवकरात लवकर प्रशासनाने येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून त्याचा पंचनामा करून अहवाल तयार करून तातडीने श्सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींकडून तातडीने ओला दुष्काळाची तक्रार देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे व या मागणीला सरकार आता सकारात्मक प्रतिसाद देतो का हे लवकरच कळणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग