शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ते मॅन ऑफ दी मॅचचे मानकरी, एकटे केसरकर नाहीत - राजन तेली 

By अनंत खं.जाधव | Updated: June 8, 2024 16:29 IST

राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून मताधिक्य, आमदार नितेश राणे यांनी विजयाचे श्रेय केसरकर यांना दिले होते

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून भरघोस मताधिक्य मिळाले त्याचे खरे श्रेय कार्यकर्त्यांना दिले पाहिजे तेच खरे मॅन ऑफ दी मॅचचे मानकरी आहेत. एकट्या दीपक केसरकर यांना यांचे खरे श्रेय कसे? असा सवाल आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यावर माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित केला.तसेच कुणाला उमेदवारी हवी असल्यास पक्षाकडे मागा पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मिळत नाही असा सल्ला ही तेली यांनी संजू परब यांना दिला. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार नितेश राणे यांनी या विजयाचे श्रेय दीपक केसरकर यांना दिले होते. त्यावर शनिवारी तेली यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तेली म्हणाले, खरे म्हणजे शिंदे सेना व भाजप एकत्र आल्याने सावंतवाडी मतदारसंघात एक लाख मताचा टप्पा गाठणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. याची कारणमिमांसा केली जाईल पण जी मते पडली त्यामागे तळागाळातील विकास हेच मुख्य कारण आहे. त्याच बरोबर कार्यकर्त्यांची मेहनत ही म्हणावी लागेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठ्याप्रमाणात निधी गावागावात दिला. त्यामुळे लोकांची कामे झाली. पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना निधीसाठी झगडावे लागत होते. पण आता तसे होत नाही असे म्हणत त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.2014 पूर्वी सावंतवाडी तालुक्यात भाजपची एकमेव ग्रामपंचायत निवडून यायची पण आता येथे शतप्रतिशत भाजप असून हे सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभे करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीतील यश हे एकट्या दीपक केसरकर यांचे नसून शिंदे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांचे असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले.दरम्यान, राणे निवडून आल्याने आता विकास कामे जलद गतीने होतील रोजगार येतील आम्ही खास करुन आडाळी येथील एमआयडीसीत वेगवेगळे प्रकल्प आले पाहिजेत. लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी आग्रही असणार असून लवकरच या विषयासाठी खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचे तेली यांनी सांगितले.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात चांगले मताधिक्य लोकसभा निवडणुकीत झाले पण शहरी भागात आम्ही कामी पडले यांचे मुख्य कारण अप्रचार आहे. तो आम्ही थांबविण्यात कमी पडलो या व्यतिरिक्त आणखी काही कारणे असतील त्याचा  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेऊ असे ही तेली यांनी सांगितले.सावंतवाडी मतदारसंघात रोजगार हा विषय मोठा आहे.आडाळी एमआयडीसीत अत्तर तयार करणारी कंपनी आली असून त्यांनी आपला प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून ही कंपनी सुरू झाल्यास रोजगाराचा प्रश्न सुटेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRajan Teliराजन तेली Nitesh Raneनीतेश राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर