शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पिण्याच्या पाण्यासाठी फोंडावासीयांनी केला निर्धार,ग्रामस्थांची नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:37 IST

लोरे तलावातील पाण्याच्या साठवणीची दैनावस्था याबाबतची खरी वस्तुस्थिती लोकमतमधून प्रसिद्ध होताच याची फोंडा येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ यांनी त्वरित दखल घेतली. एक दिवस गावासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी या घोषणेसह सर्व ग्रामस्थांनी तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्दे पिण्याच्या पाण्यासाठी फोंडावासीयांनी केला निर्धार,ग्रामस्थांची नियोजन बैठकलोकमतच्या वृत्ताने घेतली दखल; तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्णय

फोंडाघाट : लोरे तलावातील पाण्याच्या साठवणीची दैनावस्था याबाबतची खरी वस्तुस्थिती लोकमतमधून प्रसिद्ध होताच याची फोंडा येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ यांनी त्वरित दखल घेतली. एक दिवस गावासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी या घोषणेसह सर्व ग्रामस्थांनी तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्धार केला.यासाठी नियोजनाची बैठक श्री देव राधाकृष्ण मंदिरात मोठ्या उपस्थितीत पार पडली. बुधवार ५ जून रोजी सर्व ग्रामस्थ व बंधूभगिनींच्या उपस्थितीत संपूर्ण दिवसभर गाळ उपशाचा शुभारंभ करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.यावेळी कणकवली तालुका सभापती सुजाता हळदिवे, जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, सरपंच संतोष आंग्रे, हेल्थ अ‍ॅकॅडमीचे महेश सावत, राजू पटेल, संदेश पटेल, कुमार नाडकर्णी, भालचंद्र राणे, सुंदर पारकर, संजय नेरूरकर, सचिन नाकाडी, सचिन भोगले, विशाल रेवडेकर, बाळा पारकर, पप्या सावंत, समीर मांगले, प्रथमेश रेवडेकर, अजित नाडकर्णी, एकनाथ कातरूड, विश्वनाथ जाधव, हर्षल तेंडुलकर, भाई गुरव, संतोष पारकर, संजय पटेल, मोहन पारकर, राजेश शिरोडकर, अवी चाचुर्डे, सुभाष मर्ये, महेश पेडणेकर उपस्थित होते.यावेळी उपस्थित ठेकेदारांनी आपले जेसीबी, सुमारे दहा डंपर-ट्रॅक्टर तसेच उपस्थितांसाठी नाश्ता, जेवणाची सोय, सरपंच, गावातील टपरीवाले, हॉटेलवाले यांनी स्वखर्चाने उत्स्फूर्तपणे देण्याचे कबूल करून मानवतेसाठी एक पाऊल पुढे टाकले. आरोग्य विभागाने प्रथमोपचार टीम उपस्थित ठेवण्याचे मान्य केले.यावेळी सर्वांनीच हे काम एक दिवसांत पूर्ण होणार नाही याची कल्पना आहे. मात्र, त्या निमित्ताने जनजागृतीतून गाव एकत्र येईल आणि एका रात्रीत काही वर्षांपूर्वी वाघोबाच्या मंदिर बांधणीची पुनरावृत्ती होईल. चांगले कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र पुढील वर्षी नाम फाऊंडेशन अथवा केंद्राची गाळमुक्त तलाव-शिवार योजनेच्या प्रस्तावाद्वारे संपूर्ण तलाव गाळमुक्त करण्याचे अभिवचन जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे यांनी ग्रामस्थांना दिले.घोणसरी-देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ३, ४ ग्रामस्थांनी त्यांच्या योग्य तक्रारीसाठी दावा दाखल करून अडविल्याने सोडलेले पाणी मध्यंतरी अडविले जाते. तो पेच प्रशासनाने सोडविल्यास धरणाचे पाणी थेट गांगोवाडीपर्यंत आणि उगवाई नदीमधून, कोंडयेपर्यंत पोहोचू शकेल.

पर्यायाने कधी पाणी टंचाई उद्भवणार नाही. त्यासाठी तक्रारदारांना ग्रामस्थांचे शिष्टमंडळ भेटले. तुमच्या दाव्यासाठी गाव तुमच्याबरोबर आहे. मात्र, काम अडवून गावाला वेठीस धरू नका अशी विनंती समस्त ग्रामस्थांनी केली. शेवटी ग्राम सहभागातून होणारे हे गाळ उपशाचे काम संपूर्ण जिल्ह्याला मार्गदर्शन ठरेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. सर्वांच्या सहभागातून काम करण्याचा निर्धार केला.एक दिवस गावासाठी ग्रामस्थांनी दिली हाकतलावातील अपुरा पाणीसाठा, गावच्या नळयोजनेपुढील संकट लक्षात घेता संपूर्ण गावातील अबालवृद्ध, बचतगटांतील महिला भगिनी, शेतकरी, कामगार, कर्मचारी यांनी एकमुखाने बुधवार ५ जून लोरे येथील तलाव परिसरात उपस्थित राहण्याचे ठरविले आहे. या दिवशी एक दिवस गावासाठी देताना ह्यसाथी हाथ बढाना... या प्रकारे तलावातील गाळ उपसा करण्याची ग्वाही दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग