शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

‎Sindhudurg: संततधारेने कुडाळच्या भंगसाळ नदीला पूर, नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:03 IST

अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

कुडाळ : कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंगसाळ नदीला पूर आला असून, कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर तसेच इतर काही भागांमध्ये बुधवारी रात्री पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथील ५० ते ६० ग्रामस्थांना रात्रीच दुसरीकडे स्थलांतरीत व्हावे लागले. काही घरांमध्ये पाणी घुसले असून, असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचे पाणी अनेक घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.‎मागील दोन दिवस पावसाने पुन्हा एकदा कुडाळ तालुक्यात मुसळधार बरसण्यास सुरुवात केली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे बुधवारी रात्री भंगसाळ नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. यामुळे कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. काही घरांच्या पायरीपर्यंत पाणी आले होते. पाऊस मोठ्या प्रमाणात बरसत राहिल्यास ही पूरस्थिती अधिक तीव्र होऊ शकते.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ‎तसेच तालुक्यातील कर्ली, निर्मला, बेल या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद‎भंगसाळ नदीला आलेल्या पुरामुळे कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेलसमोरील शहरात येणारा मुख्य रस्ता तसेच रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता यावरही पाणी आले होते. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ बंद होती. बराच वेळ पाणी ओसरत नसल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती.

नागरिकांचे स्थलांतर

५० ते ६० नागरिकांना बुधवारी रात्री स्थलांतरीत करावे लागले. कारण बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी रात्री पावसाने जोर पकडल्याने भंगसाळ नदीला पूरस्थिती प्राप्त झाली होती. परिणामी कुडाळ आंबेडकरनगरमधील वस्तीला फटका बसण्याची शक्यता असल्याने काही नागरिकांचे रात्रीच स्थलांतर करण्यात आले.

नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारादरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला होता. बुधवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी दुपारपर्यंत पाऊस कोसळत होता. परिणामी बहुतांश नद्यांना पूरस्थिती होती. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.