शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाच हजार हेक्टरवरील भात, नाचणीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:04 IST

क्यार वादळामुळे देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात व नाचणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आदेश देऊनही कृषी व महसूल विभागामार्फत संथगतीने पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याबाबतची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपाच हजार हेक्टरवरील भात, नाचणीचे नुकसान५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली

देवगड : क्यार वादळामुळे देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात व नाचणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आदेश देऊनही कृषी व महसूल विभागामार्फत संथगतीने पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याबाबतची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.देवगड तालुक्यामध्ये शेतकरी उदरनिवार्हासाठी भात व नाचणी शेती करतात. क्यार वादळामुळे भातशेती कापणीच्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने भातशेती व नाचणी शेतीचे नुकसान झाले. ऐन कापणीच्यावेळीच पावसाने थैमान घातल्याने हातातोंडाशी आलेल्या पिक पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले.

शासनस्तरवरून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले. मात्र दिवाळीच्या सुटीत बहुतांश कर्मचारी हे रजेवर गेल्याने देवगड तालुक्यातील पंचनाम्याची प्रक्रिया रखडली होती.

मात्र दिवाळी संपल्यानंतर कर्मचारी हजर झाले तरीही ज्या गतीने पंचनामे करणे गरजेचे होते तशा पध्दतीने ते होत नसून संथगतीने ही प्रक्रिया सुरू असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आतापर्यंत तालुक्यामध्ये सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले गेले आहेत. अद्याप सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नुकतेच देवगड तालुक्यामध्ये भातशेती व मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी शिक्षणमंत्री आशिष शेलार व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमारांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी व मच्छिमारांनी आपल्या समस्या मांडून नुकसानीची माहिती दिली.तत्काळ पंचनामे करामच्छिमार व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानी देण्याचे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिले. मात्र किती क्षेत्राचे नुकसान झाले, पंचनामा प्रक्रिया कशा पद्धतीने झाली याची माहिती मात्र त्यांनी घेतली नाही. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनामे होणे गरजेचे आहेत. मात्र संथगतीने सुरू असलेल्या पंचनाम्याबाबत संबंधित विभागांना सूचना देऊन तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस