शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार हेक्टरवरील भात, नाचणीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:04 IST

क्यार वादळामुळे देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात व नाचणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आदेश देऊनही कृषी व महसूल विभागामार्फत संथगतीने पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याबाबतची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपाच हजार हेक्टरवरील भात, नाचणीचे नुकसान५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली

देवगड : क्यार वादळामुळे देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात व नाचणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आदेश देऊनही कृषी व महसूल विभागामार्फत संथगतीने पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याबाबतची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.देवगड तालुक्यामध्ये शेतकरी उदरनिवार्हासाठी भात व नाचणी शेती करतात. क्यार वादळामुळे भातशेती कापणीच्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने भातशेती व नाचणी शेतीचे नुकसान झाले. ऐन कापणीच्यावेळीच पावसाने थैमान घातल्याने हातातोंडाशी आलेल्या पिक पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले.

शासनस्तरवरून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले. मात्र दिवाळीच्या सुटीत बहुतांश कर्मचारी हे रजेवर गेल्याने देवगड तालुक्यातील पंचनाम्याची प्रक्रिया रखडली होती.

मात्र दिवाळी संपल्यानंतर कर्मचारी हजर झाले तरीही ज्या गतीने पंचनामे करणे गरजेचे होते तशा पध्दतीने ते होत नसून संथगतीने ही प्रक्रिया सुरू असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आतापर्यंत तालुक्यामध्ये सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले गेले आहेत. अद्याप सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नुकतेच देवगड तालुक्यामध्ये भातशेती व मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी शिक्षणमंत्री आशिष शेलार व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमारांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी व मच्छिमारांनी आपल्या समस्या मांडून नुकसानीची माहिती दिली.तत्काळ पंचनामे करामच्छिमार व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानी देण्याचे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिले. मात्र किती क्षेत्राचे नुकसान झाले, पंचनामा प्रक्रिया कशा पद्धतीने झाली याची माहिती मात्र त्यांनी घेतली नाही. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनामे होणे गरजेचे आहेत. मात्र संथगतीने सुरू असलेल्या पंचनाम्याबाबत संबंधित विभागांना सूचना देऊन तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस