शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मच्छीमारांची जाळी रिकामीच

By admin | Updated: August 11, 2015 00:17 IST

यंत्रनौका वाढल्या : दीड दशकांपूर्वीपासूनच मत्स्य दुष्काळ --दुष्काळच्या नौकेवरील मासेमारी भाग-१

राजेश जोष्टे- खेर्डी  यांत्रिक नौकांची वाढती संख्या, खाडी व समुद्र खरवडून काढण्याच्या आधुनिक घातक पद्धती तसेच वाढत्या प्रदूषणामुळे एकेकाळी सागरी मत्स्योत्पादनाची गाठलेली ४.६ लाख टनाची क्षमता धुळीस मिळाली. यामुळे दीड दशकाच्या आधीपासूनच मत्स्य दुष्काळाच्या संकटाने घेरले आहे. कोकणचा ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, ३ हजार २०० किलोमीटर लांबीच्या नद्या आणि ३.१ लाख हेक्टर क्षेत्रात तळी व जलाशय यामध्ये मत्स्योत्पादन होते. सागरी मत्स्य उत्पादनाची क्षमता ४.६ लाख टन, तर गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन २५ हजार टनांच्या आसपास आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा मासळीच्या जाती महाराष्ट्रातच असल्याचे सांगितले जाते. याचमुळे की काय परराज्यातील ट्रॉलर बोटींचा धिंगाणा इकडे सुरु असतो. येथील पापलेट, बोंबिल, सुरमई, कोळंबी यासह अनेक छोटे मासेही चविष्ठ आणि दूरदेशींच्या खवय्यांसाठी आपलंस करणारे ठरले आहेत. १९८३ च्या गणनेनुसार १३ हजार मासेमार बोटी होत्या. यापैकी ६ हजार ५९१ बोटी १ टनापेक्षा अधिक मत्स्य क्षमतेच्या होत्या. यांत्रिकी नौकांची संख्या ४ हजार ६३५ होती. गत तीन दशकात प्रगत व अतीप्रगत बोटींच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यातच गाळाने होरलेल्या खाड्या समुद्रकिनारे, रासायनिक सांडपाणी सोडून मत्स्योत्पादनाची अपरिमित हानी करणारे कारखाने, पर्ससिननेट या व अशा कारणांनी मत्स्य जीवनावर संकट ओढवले आहे. दुर्मीळ मत्स्य संपदा ज्या खाड्यातून वाढते, मत्स्यजीवांचे जिथे प्रजनन होते, त्याच ठिकाणी घातक रसायनांचे सांडपाणी सोडण्यात आल्याने अनेक मत्स्यजाती कायमस्वरुपी संपुष्टात आल्या आहेत. तर दुसरीकडे मासे चवीच्या दृष्टीनेही आपल्या लौकिकापासून दूर जात आहेत. एकीकडे कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना कोकणचे कोकणत्वही अबाधित ठेवता आलेले नाही. हेच सत्य यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. १९८३ च्या गणनेनुसार मासेमारी बोटींची संख्या घटण्याचे कारण व प्रगत आणि अतिप्रगत तंत्राची पध्दती वापरात आणली जात असल्यानंतरचा प्रश्न कायमच आहे. आक्रमण थोपवावे लागेल...कोकणचा किनारा ७२० किलोमीटरचा. ३ हजार २०० किलोमीटर लांबीच्या नद्या. मत्स्य उत्पादनाची क्षमता घटत असल्याचे चित्र. परराज्यातील ट्रॉलर्स बोटींचा कोकण किनारपट्टीवर धिंगाणा सुरू असल्याचा दावा. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मासळीच्या जाती महाराष्ट्रातच अधिक असल्याची माहिती.