शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

कुडाळातील काथ्या प्रकल्प युनिटला आग, सुमारे २५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:22 IST

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील महाराष्ट्र लघुविकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या काथ्या उद्योग कंपनीतील प्रकल्प युनिटला शनिवारी दुपारी भीषण आग ...

ठळक मुद्देशॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाजलगतच्या काजू बागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील महाराष्ट्र लघुविकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या काथ्या उद्योग कंपनीतील प्रकल्प युनिटला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत काथ्या व मशिनरी जळून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

कामगारांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्यामुळे जीवितहानी टळली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र लघुविकास महामंडळातर्फे कुडाळ एमआयडीसी येथे तीन वर्षांपूर्वी काथ्या निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. या कंपनीत नारळाच्या सोडणापासून काथ्या तसेच काथ्यापासून विविध वस्तू तयार केले जातात. तसेच जिल्ह्यातील बचतगट, नवउद्योजकांना प्रशिक्षण दिले जाते.शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कंपनीतील काथ्या प्रक्रिया विभागात काथ्या तयार करण्याचे काम काही कर्मचारी करीत होते. यावेळी अचानक तेथील काथ्यामधून धूर येऊ लागला व काही क्षणात आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या काथ्याने पेट घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.या आगीत काथ्या तयार करणारी मशीन, कन्व्हेअर, ३० फुटी बेल्ट व इलेक्ट्रॉनिक मोटर, १० ते १२ टन कोकोपीट, १४ टन काथ्या, सुंभ दोरी, ठिबक सिंचन पाईप लाईन, इलेक्ट्रॉनिक पॅनल स्वीच तसेच इतर साहित्य मिळून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आग अनेक तास धुमसत असल्याने अग्निशमन दलाला वारंवार गाडीमध्ये पाणी भरावे लागले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी उशिरा आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली.काथ्या प्रकल्प युनिटला लागलेली आग काही वेळातच कंपनीनजीकच्या जमिनीत असलेल्या धोंड यांच्या काजूच्या बागेत पसरली त्यामुळे काजू कलमे व बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती धोंड यांनी दिली.अग्निशमन उपाययोजनांकडे दुर्लक्षही काथ्या प्रकल्प कंपनी शासकीय असून कंपनीत सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून आले. प्रत्येक कंपनी, कारखान्यात अग्निशामक यंत्रणा असणे बंधनकारक आहे. असे असूनही याकडे दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. काथ्या सुकलेल्या अवस्थेत असल्याने अशा घटना केव्हाही घडू शकतात. मात्र, या ठिकाणी तशी कोणतीच दक्षता घेतलेली दिसून येत नाही.आग लागली की लावली?काथ्या तयार करणारी मशीन सुरू असताना त्याच्या इलेक्ट्रॉनिक मोटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती तेथील एका कामगाराने दिली. दरम्यान, ही आग लागली की लावण्यात आली, अशी शंका येथील काही ग्रामस्थ आणि उद्योजकांतून उपस्थित करण्यात आला.

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग