शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय, शेतकरी सुखावला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 20, 2024 16:34 IST

खोळंबलेली भात लावणीची कामे सुरू होणार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुसलेला मान्सून अखेर आजपासून (गुरूवार ) पुन्हा सक्रिय झाला असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. मात्र त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. पहिल्या पावसात भात पेरणी केल्यानंतर शेतकऱ्याला भात लावणीसाठी मोठ्या पावसाची गरज असते. पावसाने दडी मारल्याने भात लावणीची कामे खोळंबली होती. आता संतदार पाऊस कोसळू लागल्याने भात लावणीच्या कामांनाही वेग येणार आहे. जून महिन्याचा दुसरा आठवडा संपून गेला तरी पाऊस पडत नसल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवत होता. आता आज, गुरुवारी सकाळपासून संततदार पावसाने सुरुवात केल्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत.जून महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो गतवर्षी मात्र तो पडला नव्हता. त्यामुळे जिल्ह्याची सरासरी सुद्धा भरली नव्हती. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याचा अंदाज हवामान खात्याने अगोदरच वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान होते.महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून सक्रिय झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र तो हवा तसा पडला नसल्यामुळे चिंता पसरली होती. परंतु आता जूनच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस आपली राहिलेली सरासरी भरून काढेल असा अंदाज वर्तवण्यास काही हरकत नाही.आज, सकाळपासूनच मेघगर्जनेसह दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे आता आगामी दोन दिवस संततदार पाऊस कोसळेल असे वातावरण आहे. नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पर्यटनात्मकदृष्ट्या सिंधुदुर्ग मधील सर्व धबधबे दोन दिवस पाऊस पडल्यास तुडुंब भरून वाहणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती