शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीच्या नुकसानीने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 17:18 IST

Parshuram Upkar, Farmar, Sindhdurugnews राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, परतीच्या पावसाने भातशेती व फळबागा यांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरपाई देण्याची ही घोषणा फक्त दिशाभूल करण्यासाठीच असल्याचे लक्षात येईल, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देभातशेतीच्या नुकसानीने शेतकरी अडचणीत शासनाची आश्वासने फक्त दिशाभूल करण्यासाठी, परशुराम उपरकर यांची टीका 

कणकवली : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, परतीच्या पावसाने भातशेती व फळबागा यांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरपाई देण्याची ही घोषणा फक्त दिशाभूल करण्यासाठीच असल्याचे लक्षात येईल, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भातशेती धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई ही गुंठ्याला १०० रुपयेच असल्याने शेतकरी पूर्णतः अडचणीत आला आहे.शासनाने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकरिता विविध सामग्री घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन शेती करण्यासाठी भाग पाडले. यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने अडचणीत आला आहे. एकीकडे बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत तर दुसरीकडे शेतीतून उत्पन्नही मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अपुरी असून किमान गुंठ्याला अडीच हजार व हेक्टरी २५ हजार रुपये तरी देण्याची गरज होती. त्यामुळे त्यातून शेतकऱ्याला सहाय्य मिळाले असते.जे शेतकरी अवकाळी पावसावर व भातशेतीवर अवलंबून असतात ते सर्व शेतकरी आता अडचणीत आले आहेत. शासनाची मदत मिळेल की नाही ? हे सांगता येत नाही. यापूर्वीही अशाप्रकारच्या अवकाळी पाऊस किंवा वादळामुळे झालेली नुकसान भरपाई देणार अशी शासनाने घोषणा करूनही ती अनेकांना अद्याप मिळालेली नाही.

मच्छिमारांना नुकसानीबाबत ६५ कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२ कोटी देण्याच्या घोषणा आमदार, खासदारांनी केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्या योजनेकरिता मच्छिमारांना अटी घालण्यात आल्या आहेत. त्या अटींमुळे मच्छिमारांना कोणतीही मदत मिळणार नसून ते मदतीपासून वंचित राहणार आहेत.मदत जाहीर करायची पण ती अपुरीच मदत द्यायची आणि ज्या अटी घालायच्या त्या शेतकरी किंवा मच्छिमार पूर्ण करू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होणार नाही. अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. दरम्यान, मागच्या वर्षी जूनपर्यंत कर्जमुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाकी आहे. यामुळे जनतेने जागृत होण्याची गरज आहे.सामाजिक प्रश्न म्हणून लक्ष देण्याची गरजदारू, मटका, जुगार हे अवैध धंदे बंद करण्यात यावेत. त्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. देवगड तालुक्यात दारुला पैसे न दिल्याने पत्नीला पेटवून देण्यापर्यंत पतीची मजल गेली आहे. यामुळे पोलिसांनी सामाजिक प्रश्न म्हणून या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. जुगार अड्डे उद्ध्वस्त झाले असे पोलिसांकडून सांगितले जात असताना बेळणे येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत पोलीस काही करणार आहेत की नाही ? असा प्रश्न परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी