शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नंदकुमार घाटेंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 15:54 IST

देवगड तालुक्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील ९८ गावांपैकी ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नंदकुमार घाटेंची मागणी तातडीने पंचनामे करावेत, भातशेतीचे नुकसान

देवगड : तालुक्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील ९८ गावांपैकी ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली.

दरम्यान, तालुक्यात शेतीची दोन प्रकारात नुकसानी झाली असून त्याप्रमाणे नुकसानीचा सर्व्हे करावा अशी सूचना सभापती सुनील पारकर यांनी केली. तर तत्काळ नुकसानीची पाहणी करून, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी केली.पंचायत समिती देवगडच्या सभापती दालनामध्ये तालुक्यातील भातशेती नुकसानीबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती सुनील पारकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, प्रभारी तालुका कृषी अधिकारी उल्पे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंंजवडेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, शरद शिंंदे आदी उपस्थित होते.तालुक्यात ४५०० हेक्टर क्षेत्रात भातशेती केली आहे. यावर्षी भातशेतीचे ५०० हेक्टर क्षेत्र वाढले आहे. कृषी सहाय्यकांमार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात भातशेती नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल घेतला असून ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार घाटे यांनी केली. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग