शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

हत्ती प्रश्नावरून दोडामार्गमधील शेतकरी आक्रमक; पोलिस-शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक 

By अनंत खं.जाधव | Updated: August 10, 2023 18:31 IST

अखेर मंत्री केसरकर यांच्याकडून मध्यस्थी

सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यात बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला अधिकार द्या, अशी संतप्त मागणी करत गुरूवारी सावंतवाडीत आलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे म्हणत वनविभाग कार्यालया समोर ठिय्या मांडला. अखेर सायंकाळी मंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बैठक लावण्याचे आश्वासन घेत तसे लेखी पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.दोडामार्ग तालुक्यातील तब्बल दहा गावच्या ग्रामस्थांनी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे म्हणत सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथील वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी वनविभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपवनसंरक्षक एस.एन. रेड्डी यांनी ग्रामस्थांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते.गेली २२ वर्षे हत्तींचा प्रश्न कायम आहे. आमच्या शेती बागायतींचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आश्वासने नको, हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, तुम्हाला जमत नसेल तर आमचे संरक्षण आम्ही करू, अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले होते. त्यातच पोलिस आणि शेतकरी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. अखेर पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांनी मध्यस्थी करत यावेळी शेतकऱ्यांना शांत केले.माजी आमदार राजन तेली यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी शिंदे गटाचे पदाधिकारी ही तेथे आले आणि आपल्या दोघांनाही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यातच राजू निंबाळकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला. मंत्री केसरकर यांनी येत्या पंधरा दिवसांत बैठक लावली जाणार असून हत्ती हटाव मोहीम राबविण्यासाठी आसाम येथील पथक दोडामार्ग येथे येईल असे आश्वासन दिले व तसे पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, निता कविटकर, एकनाथ नाडकर्णी, प्रमोनंद देसाई, सुधीर दळवी, पंकज गवस, विष्णू देसाई, रामकृष्ण मिरीकर, आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.वनविभागाला पोलिस छावणीचे स्वरूप शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वनविभागाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर सायंकाळी राज्य राखीव पोलिस दलाची कुमक बोलविण्यात आली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागFarmerशेतकरीPoliceपोलिस