शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

हत्ती प्रश्नावरून दोडामार्गमधील शेतकरी आक्रमक; पोलिस-शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक 

By अनंत खं.जाधव | Updated: August 10, 2023 18:31 IST

अखेर मंत्री केसरकर यांच्याकडून मध्यस्थी

सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यात बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला अधिकार द्या, अशी संतप्त मागणी करत गुरूवारी सावंतवाडीत आलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे म्हणत वनविभाग कार्यालया समोर ठिय्या मांडला. अखेर सायंकाळी मंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बैठक लावण्याचे आश्वासन घेत तसे लेखी पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.दोडामार्ग तालुक्यातील तब्बल दहा गावच्या ग्रामस्थांनी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे म्हणत सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथील वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी वनविभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपवनसंरक्षक एस.एन. रेड्डी यांनी ग्रामस्थांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते.गेली २२ वर्षे हत्तींचा प्रश्न कायम आहे. आमच्या शेती बागायतींचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आश्वासने नको, हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, तुम्हाला जमत नसेल तर आमचे संरक्षण आम्ही करू, अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले होते. त्यातच पोलिस आणि शेतकरी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. अखेर पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांनी मध्यस्थी करत यावेळी शेतकऱ्यांना शांत केले.माजी आमदार राजन तेली यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी शिंदे गटाचे पदाधिकारी ही तेथे आले आणि आपल्या दोघांनाही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यातच राजू निंबाळकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला. मंत्री केसरकर यांनी येत्या पंधरा दिवसांत बैठक लावली जाणार असून हत्ती हटाव मोहीम राबविण्यासाठी आसाम येथील पथक दोडामार्ग येथे येईल असे आश्वासन दिले व तसे पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, निता कविटकर, एकनाथ नाडकर्णी, प्रमोनंद देसाई, सुधीर दळवी, पंकज गवस, विष्णू देसाई, रामकृष्ण मिरीकर, आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.वनविभागाला पोलिस छावणीचे स्वरूप शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वनविभागाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर सायंकाळी राज्य राखीव पोलिस दलाची कुमक बोलविण्यात आली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागFarmerशेतकरीPoliceपोलिस