शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

हत्ती प्रश्नावरून दोडामार्गमधील शेतकरी आक्रमक; पोलिस-शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक 

By अनंत खं.जाधव | Updated: August 10, 2023 18:31 IST

अखेर मंत्री केसरकर यांच्याकडून मध्यस्थी

सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यात बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला अधिकार द्या, अशी संतप्त मागणी करत गुरूवारी सावंतवाडीत आलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे म्हणत वनविभाग कार्यालया समोर ठिय्या मांडला. अखेर सायंकाळी मंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बैठक लावण्याचे आश्वासन घेत तसे लेखी पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.दोडामार्ग तालुक्यातील तब्बल दहा गावच्या ग्रामस्थांनी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे म्हणत सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथील वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी वनविभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपवनसंरक्षक एस.एन. रेड्डी यांनी ग्रामस्थांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते.गेली २२ वर्षे हत्तींचा प्रश्न कायम आहे. आमच्या शेती बागायतींचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आश्वासने नको, हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, तुम्हाला जमत नसेल तर आमचे संरक्षण आम्ही करू, अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले होते. त्यातच पोलिस आणि शेतकरी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. अखेर पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांनी मध्यस्थी करत यावेळी शेतकऱ्यांना शांत केले.माजी आमदार राजन तेली यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी शिंदे गटाचे पदाधिकारी ही तेथे आले आणि आपल्या दोघांनाही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यातच राजू निंबाळकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला. मंत्री केसरकर यांनी येत्या पंधरा दिवसांत बैठक लावली जाणार असून हत्ती हटाव मोहीम राबविण्यासाठी आसाम येथील पथक दोडामार्ग येथे येईल असे आश्वासन दिले व तसे पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, निता कविटकर, एकनाथ नाडकर्णी, प्रमोनंद देसाई, सुधीर दळवी, पंकज गवस, विष्णू देसाई, रामकृष्ण मिरीकर, आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.वनविभागाला पोलिस छावणीचे स्वरूप शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वनविभागाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर सायंकाळी राज्य राखीव पोलिस दलाची कुमक बोलविण्यात आली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागFarmerशेतकरीPoliceपोलिस