शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तिलारी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:24 IST

तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊन ४१ वर्षे पूर्ण झाली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. याबाबत आजच्या सभेत उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी सुचनाही सभेत केली.

ठळक मुद्देतिलारी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंतस्वच्छता समिती सभा : अधिकाऱ्यांवर नाराजीचे सूर

सिंधुदुर्गनगरी : तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊन ४१ वर्षे पूर्ण झाली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. याबाबत आजच्या सभेत उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी सुचनाही सभेत केली.जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, समिती सभापती जेरोन फर्नांडिस, डॉ. अनीषा दळवी, अंकुश जाधव, पल्लवी राऊळ, सदस्य सावी लोके, श्वेता कोरगावकर, संजय आंग्रे, उत्तम पांढरे, सरोज परब, निमंत्रित सदस्य प्रमोद कामत, विकास कुडाळकर, अधिकारी आदी उपस्थित होते.बांदा तुळसाण पूल येथे बंधारा बांधल्यास या ठिकाणी पाण्याचा साठा होऊन येथील परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा होणे शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही गेली ३ वर्षे बंधारा व्हावा यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र बंधाऱ्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने सदस्या श्वेता कोरगावकर आणि प्रमोद कामत यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर यावर संबधित क्षेत्र हे तिलारी प्रकल्प क्षेत्रात येत असल्याने त्या ठिकाणी बंधारा घेऊ शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी उत्तर देताना स्पष्ट केले. यावर आपणही तिलारीचे पाणी जिल्हावासीयांना मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळत नाही.

येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मात्र पाणी गोवा राज्याला मिळते. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊन आज ४१ वर्षे पूर्ण झाली तरी जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळत नाही, असा आरोप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केला. तसेच तिलारी प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.देवगड तालुक्यातील मिठबाव ही २ कोटी खर्चाची योजना दोन वर्षे बंद आहे. तेथील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत. अनेक वेळा हा विषय चर्चेत आणला. बैठका झाल्या तरी ही योजना मार्गी लागली नाही त्यामुळे या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे सदस्या सावी लोके यांनी सांगितले. याची दखल घेत आठ दिवसांत नळयोजनेचे आवश्यक ती कामे करून पाणी पुरवठा सुरळीत करा असे आदेश नाईक यांनी सभेत दिले.पंधरा दिवसांत सर्व्हे करा : समिधा नाईकमालवण तालुक्यातील मिर्याबांद, सर्जेकोट, महान या गावांना पाण्याचा पुरवठा होण्याच्यादृष्टीने तेथील शिवकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तीन गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत या शिवकालीन बंधाऱ्यांचा सर्व्हे करून अहवाल द्या, असे आदेश ही जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी सभेत दिले.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग