शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडझडीचे सत्र सुरुच; काही गावे अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:38 IST

पाच तालुक्यात शंभरी पार पाऊस: नागरिकांना मोठा फटका, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पावसाचा जोर कायम होता. वारा आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र कायम असून दिवसभर मुसळधार पावसाची संततधार कायम होती. करूळ घाटात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. मात्र, त्यानंतर दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. जिल्ह्यातील ऑरेंज अलर्ट कायम असून शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या  २४ तासात ९९.५ च्या सरासरीने ७९६  मिलिमीटर पाऊस पडला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी इमारत, गोठे, संरक्षक भिंत, दुकान आदींची पडझड होत आहे. करूळ, गगनबावडा, आंबोली या घाटात दरड कोसळल्याने  काही वेळ वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडला आहे. पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून घाट वाहतुकीस सुरळीत केले आहेत.मुसळधार पावसामुळे काही भागात खंडित झालेली वीज अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्या त्याठिकाणी महावितरणमार्फत प्रयत्न केले जात आहेत. हवामान खात्याने इशारा दिल्यानुसार जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी  कोसळत आहेत. वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक पाऊसशुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या  २४ तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १६७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्या पाठोपाठ कुडाळ आणि कणकवली तालुक्यात पाऊस झाला आहे.

पाच तालुक्यात शंभरी पार पाऊसमालवण, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुका वगळता अन्य पाच तालुक्यात  शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे.

कणकवली - आचरा रस्ता बंदकणकवली : कणकवली ते  आचरा मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ, कुंभारवाडीमार्गे वाहनचालकांना जावे लागणार आहे. त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील नदीवरील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता. गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. वरवडे पूल अपूर्ण असल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस