शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:36 IST

Tauktae Cyclone Sindhudurg : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. कोरोनाच्या फटक्याने अनेक ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच वादळाने झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत.

ठळक मुद्देसंसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले ! कणकवली तालुक्यात तौक्ते वादळाने मोठे नुकसान

सुधीर राणेकणकवली : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. कोरोनाच्या फटक्याने अनेक ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच वादळाने झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत.तौक्ते वादळाने कणकवली तालुक्यात धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वानाच हैराण करून सोडले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. सह्याद्री पट्ट्यातील गावांमधिल अनेक घरांची छपरे पत्याप्रमाणे उडून गेली. नारळ, आंबा, काजू यांची झाडे उन्मळून पडली तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. हापूस आंब्याचेही नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या चक्रीवादळात फळ बागांचे नुकसान झाल्याने हिरावून घेतला गेला आहे.घरांच्या छपरांची कौले, सिमेंटचे व लोखंडी पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गुरांच्या गोठयांचीही हानी झाली आहे. विजेच्या खांबांवर झाडे तुटून पडल्याने अनेक खांब मोडून पडले होते. तर अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याने वीज प्रवाह खंडीत झाला होता. अकरा दिवसांच्या विशेष प्रयत्नातून महावितरणला वीज प्रवाह सुरळीत करण्यात यश आले आहे.या वादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान झालेल्याना भरघोस भरपाई देण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी लावून धरली आहे. ग्रामसेवक, तलाठी , कोतवाल, पोलीस पाटील , मंडळ अधिकारी आदी महसुलचे कर्मचारी यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी करून पंचयादी घातली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे.खासदार, आमदार, पालकमंत्री व अन्य नेत्यांनी तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मात्र, शासनाकडून जाहीर झालेली नुकसान भरपाई प्रत्यक्षात कधी मिळणार ? याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकसान भरपाईची ते अगदी चातका प्रमाणे वाट बघत असल्याचे सध्याचे चित्र आहे.घरांची डागडुजी करण्यासाठी अनेकाना आर्थिक मदतीची गरज असून आता कर्जासाठी बँकांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे काही नुकसानग्रस्तांनी सांगितले. सरकारची मदत मिळेपर्यंत आमचे घर नादुरुस्त स्थितीत ठेवू शकत नाही. पावसाळा जवळ आल्याने त्याची त्वरित डागडुजी करणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले.निसर्गाच्या या दणक्याने शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. कणकवली तालुक्‍यातील नुकसानीचा आकडा तीन कोटींच्या घरात पोहचला आहे. मात्र, सरकारकडून नुकसान भरपाई मिळताना शेतकऱ्यांना अनेक प्रशासकीय अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्या सोबत जमिनीचा सातबारा व अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.त्यामुळे ते चिंतीत आहेत. तालुक्यातील साकेडी, कलमठ, भिरवंडे,नाटळ, नरडवे,वाघेरी,फोंडाघाट आदी परिसरात झालेल्या नुकसानीमुळे ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तराळत आहेत.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग