शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

माजी नगराध्यक्षांवर निशाणा

By admin | Updated: November 7, 2015 22:40 IST

कणकवली नगरपंचायत बैठक : राजकीय बदलाचे उमटले पडसाद

कणकवली : नगरपंचायतमधील बदलेल्या समीकरणामागील राजकारणाचे पडसाद अपेक्षेप्रमाणे शनिवारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत उमटले. विविध मुद्यांवरून माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांना विरोधकांकडून लक्ष्य करण्यात आले. नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बदलल्यानंतर ही पहिलीच सभा होती. या सभेत रस्त्यांच्या कामांवरून अ‍ॅड. खोत यांना लक्ष्य करण्यात आले. अ‍ॅड. खोत यांनी रस्त्याची कामे जाणीवपूर्वक अडवून ठेवल्याचा आरोप अभि मुसळे, समीर नलावडे यांनी केला. तर अ‍ॅड. खोत यांनी ई-टेंडरिंग प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव रस्त्यांची कामे रखडल्याचे सांगितले. नव्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी रस्ते अनुदानपोटी जमा झालेला निधी प्रामाणिकपणे खर्च करा व शहरनिष्ठा दाखवा, असे समीर नलावडे यांनी सांगितले. सेवकाची भूमिका असेल तर सहकार्य करू, वैयक्तिक छबी उजळण्याचा प्रयत्न केल्यास कामे होणार नाहीत, असे बंडु हर्णे म्हणाले. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही गट पाडण्यात यशस्वी झालात, असा आरोप अ‍ॅड. खोत यांनी बंडू हर्णे यांच्यावर केला असता त्यामुळेच तुमच्या इच्छेप्रमाणे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडले गेल्याचा टोला हाणला. खडाजंगीमध्ये बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर यांनी असभ्य शब्द वापरल्याबद्दल विरोधकांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली. लिंगायत स्मशानभूमीचा आराखडा ५६ लाखावरून २८ लाखांवर आला. या आराखड्यात कोणते बदल करण्यात आले ते सांगावे, अशी मागणी अभि मुसळे यांनी केली. शहरात लावण्यात येत असलेल्या होर्डिंग्जचे शुल्क आकारण्याबाबत धोरण ठरवले जावे. फलक लावणाऱ्यांकडूनच ते काढले जावेत, अन्यथा नगरपंचायतीचे मनुष्यबळ वापरले जाते, अशी समीर नलावडे यांनी सूचना केली. विकासकामांची ई निविदा प्रक्रिया करून एजन्सी नेमण्याबाबत चर्चा करताना याबाबत निकष कोणते आहेत. एजन्सीची परिभाषा कोणती? असे प्रश्न अभि मुसळे यांनी उपस्थित केले. पथदीप व दुभाजक यांचे रंगकाम करण्यात येणार आहे. मात्र, महामार्गाचे काम लवकरच होणार असेल तर रंगकाम केले जाऊ नये, अशी सूचना बंडु हर्णे यांनी मांडली. तर यापूर्वी करण्यात आलेले रंगकाम पंधरा दिवसांतच वाया गेल्याचे अ‍ॅड. खोत यांनी सांगितले. मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यावरून अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी कमान उभारली जाणार आहे. यासंदर्भात बॅँकांना कमान उभारण्यास सांगण्यात आले असल्याचे अ‍ॅड. खोत म्हणाल्या. तर संबंधित खात्याकडून हे काम करून घेतल्यास नगरपंचायतीचा निधी वाचेल, असे किशोर राणे यांनी सूचना केली. कमान कोणी केली नाही तर नगरपंचायत उभारेल, असे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर म्हणाले. आरोग्य विभागासाठी ग्रास कटर मशिन व फोगिंग मशिन देखभालीचा खर्च जास्त येत असल्याने खरेदी करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी सूचना अ‍ॅड. खोत यांनी केली. तर शहरासाठी ही खरेदी आवश्यकच असल्याचे अभि मुसळे, समीर नलावडे यांनी सांगितले. अंध व अपंग निधीतून शिल्लक निधी राहतो. त्यामुळे अंध-अपंगांची यादी करून शिल्लक निधीतून प्रतिवर्षी मानधन दिले जावे, अशी सूचना बंडु हर्णे यांनी केली. शहरात प्लास्टिकबंदी करण्याबाबत जनजागृती केली जाईल. तसेच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कारवाईचे धोरण निश्चित केले जाईल, असे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला जावा. वेंगुर्ले नगरपरिषदेप्रमाणे कठोर कारवाई करून शहरात स्वच्छता राखण्याचा प्रयत्न व्हावा, अशी सूचना राजश्री धुमाळे यांनी केली. त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. (प्रतिनिधी)  

राजकारणाची खिचडी : भाजी मार्केट पूर्ण जागेत व्हावे ४नगरपंचायतीमध्ये बदललेल्या समीकरणाने राजकारणाची खिचडी झाल्याचे पहावयास मिळत आहे. कॉँग्रेसचे काही नगरसेवक विरोधी बाकावर तर काही सत्ताधारी बाकावर आहेत. समीर नलावडे यांनी उपनगराध्यक्ष पारकर यांना तुम्ही पद मिळण्यापूर्वी माजी नगराध्यक्षांबाबत आरोप करत होता, अशी टीका केली. मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात शहरवासीयांना स्वप्ने दाखवण्यात आली, ही नार्वेकर यांनी केलेली टीका आता त्यांच्यासोबत असलेल्या अ‍ॅड.खोत यांच्यावरच असल्याचा टोला बंडु हर्णे यांनी लावला. तर राजश्री धुमाळे यांनी गैरकारभार दिसल्यास विरोधात राहणार असल्याचे ठणकावले. ४आरक्षण क्रमांक ५ मध्ये भाजी मार्केट इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या ताब्यात असलेल्या ७ गुंठे जागेत विकास केल्यास खाजगी जमीन मालकांची ३४ गुंठे जागा फुकट जाणार आहे. त्यापेक्षा सर्व जागा ताब्यात घेऊन मच्छिमार्केट विकास करावा, अशी सूचना बंडु हर्णे यांनी केली.