शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

खावटी कर्जमाफी रक्कम मिळणार कधी...?,जाहीर करून उलटले अनेक महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:29 IST

शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर करून व त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करून अनेक महिने उलटले तरी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एक रुपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देखावटी कर्जमाफी रक्कम मिळणार कधी...?,जाहीर करून उलटले अनेक महिनेसिंधुदुर्ग जिल्ह्यात ९६९४ शेतकरी लाभास पात्र

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर केली आहे.त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ हजार ६९४ शेतकरी पात्र ठरले असून त्यांनी ऑनलाईन अर्ज शासनाला सादर केलेले आहेत.

प्रत्यक्षात शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर करून व त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करून अनेक महिने उलटले तरी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एक रुपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.महाराष्ट्र शासनाने २०१७ मध्ये मोठ्या स्वरूपाची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती. त्यातही परतफेड करणारे जास्त होते. मात्र, शेतीपूरक छोट्या व्यवसायासाठी खावटी कर्ज घेणारे शेतकरी या जिल्ह्यात जास्त आहेत.

हे कर्ज जिल्हा बँकेने पतसंस्थानच्या माध्यमातून जिल्हा बँकेने पुरविले होते. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शासनाने खावटी कर्ज माफ करावे, अशी मागणी लावून धरली होती.त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासनाने काही महिने अगोदर सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यासाठी खावटी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानुसार खावटी कर्जदार शेतकरी यांच्याकडून ऑनलाईन अर्ज शासनाने मागवून घेतले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाप्रकारे कर्ज घेतलेले शेतकरी १० हजार ५२१ आहेत. त्यासाठी १६ कोटी २२ लाख ७८ हजार एवढा निधी लागणार होता. तर २२६ पतसंस्थानी हे कर्ज पुरविले होते. मात्र, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या तपासणीत १९२ पतसंस्था कर्जमाफिस पात्र ठरल्या आहेत. या पतसंस्थानी पुरविलेल्या खावटी कर्जातील ९ हजार ६९४ शेतकरी लाभास पात्र ठरले असून त्यासाठी १३ कोटी ३७ लाख एवढी रक्कम अपेक्षित आहे.

या सर्व शेतकरी बंधूनी लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यानंतर अनेक महिन्याचा कालावधी लोटला. लोकसभा निवडणूक आचार संहितेनंतर हि रक्कम खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप शासनाकडून याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे नेमकी खावटी कर्जमाफी मिळणार कि नाही ? असा संभ्रम संबंधित लाभार्थी शेतकरी यांच्यात निर्माण झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग