शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

ऊर्जानिर्मिती कागदावरच

By admin | Updated: May 19, 2015 00:29 IST

खारलँड : घोडे अडले निर्मितीसाठीच्या उपकरणांच्या खर्चापाशी

रत्नागिरी : तालुक्यातील दोन खारलँड बंधाऱ्यांवर अपारंपारिक ऊर्जा तयार करण्याचा खारलँड विभागाचा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. या अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी येणारा खर्च कोण करणार, असा प्रश्न या विभागाला सतावत आहे.जिल्ह्यात कोयना, रत्नागिरी गॅस, जिंदाल, फिनोलेक्स असे वीज तयार करणारे मोठे प्रकल्प आहेत. तरीही राज्याला विजेची कमतरता भासते. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येते. त्यानंतर आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येत आहे.जिल्ह्यात १७१ खारलँड बंधारे बांधण्यात येणार असून आतापर्यंत ६९ खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत़ समुद्राच्या लाटांच्या माध्यमातून अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये प्रयत्न करण्यात आला होता. तो अयशस्वी झाल्यानंतर खारलँड विभागानेही अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे व चाफेरी कासारी या गावांतील खारलँड बंधाऱ्यांची निवड केलेली आहे.या बंधाऱ्यांमध्ये समुद्राचे पाणी वेगात आतमध्ये शिरत असल्याने त्याचा फायदा घेण्यात येणार आहे. गावडेआंबेरे खारलँडबंधाऱ्याला ६५ झडपे तर चाफेरी कासारी खारलँड बंधाऱ्याला २२ झडपे आहेत. या दोन्ही खारलँड बंधाऱ्यांच्या प्रत्येकी दोन झडपांचा वापर अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. दिवसातून २ वेळा भरती व २ वेळा ओहोटीच्या फायदा घेऊन ४ किलोवॅट ऊर्जा तयार करण्यात येणार आहे.ऊर्जानिर्मितीपूर्वी या बंधाऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार होते. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मेढाकडे पाठविण्यात येणार होता. त्याची तयारीही सुरु झाली होती. मात्र, ही तयारी करीत असतानाच ही ऊर्जानिर्मितीसाठी सुरुवातीला त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तो खर्च खारलँड विभागाला परवडणारा नाही. त्यामुळे हा खर्च कुठून करावा, असा प्रश्न खारलँड विभागासमोर उभा राहिला आहे. एवढा खटाटोप करेपर्यंत खर्चाचा प्रश्न खारलँड विभागाने विचारातच घेतला नव्हता. मात्र प्रत्यक्ष खर्च करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र हा विभाग अडचणीत आला. त्यामुळे ऊर्जा तयार करण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (शहर वार्ताहर)वीज फायदेशीर पण...खारलँड विभागाने निवडलेल्या दोन बंधाऱ्यांवर ४ किलोवॅट अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यात येणार होती. त्यामुळे भविष्यात छोट्या गावांसाठी ही ऊर्जानिर्मिती फायद्याची ठरली असती. मात्र, खारलँडकडे त्यासाठी तरतूद नसल्याने हे प्रस्ताव बारगळलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी खारे पाणी घुसते, त्या त्या ठिकाणी खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ही वीज फायदेशर होती.