शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जानिर्मिती कागदावरच

By admin | Updated: May 19, 2015 00:29 IST

खारलँड : घोडे अडले निर्मितीसाठीच्या उपकरणांच्या खर्चापाशी

रत्नागिरी : तालुक्यातील दोन खारलँड बंधाऱ्यांवर अपारंपारिक ऊर्जा तयार करण्याचा खारलँड विभागाचा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. या अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी येणारा खर्च कोण करणार, असा प्रश्न या विभागाला सतावत आहे.जिल्ह्यात कोयना, रत्नागिरी गॅस, जिंदाल, फिनोलेक्स असे वीज तयार करणारे मोठे प्रकल्प आहेत. तरीही राज्याला विजेची कमतरता भासते. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येते. त्यानंतर आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येत आहे.जिल्ह्यात १७१ खारलँड बंधारे बांधण्यात येणार असून आतापर्यंत ६९ खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत़ समुद्राच्या लाटांच्या माध्यमातून अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये प्रयत्न करण्यात आला होता. तो अयशस्वी झाल्यानंतर खारलँड विभागानेही अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे व चाफेरी कासारी या गावांतील खारलँड बंधाऱ्यांची निवड केलेली आहे.या बंधाऱ्यांमध्ये समुद्राचे पाणी वेगात आतमध्ये शिरत असल्याने त्याचा फायदा घेण्यात येणार आहे. गावडेआंबेरे खारलँडबंधाऱ्याला ६५ झडपे तर चाफेरी कासारी खारलँड बंधाऱ्याला २२ झडपे आहेत. या दोन्ही खारलँड बंधाऱ्यांच्या प्रत्येकी दोन झडपांचा वापर अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. दिवसातून २ वेळा भरती व २ वेळा ओहोटीच्या फायदा घेऊन ४ किलोवॅट ऊर्जा तयार करण्यात येणार आहे.ऊर्जानिर्मितीपूर्वी या बंधाऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार होते. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मेढाकडे पाठविण्यात येणार होता. त्याची तयारीही सुरु झाली होती. मात्र, ही तयारी करीत असतानाच ही ऊर्जानिर्मितीसाठी सुरुवातीला त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तो खर्च खारलँड विभागाला परवडणारा नाही. त्यामुळे हा खर्च कुठून करावा, असा प्रश्न खारलँड विभागासमोर उभा राहिला आहे. एवढा खटाटोप करेपर्यंत खर्चाचा प्रश्न खारलँड विभागाने विचारातच घेतला नव्हता. मात्र प्रत्यक्ष खर्च करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र हा विभाग अडचणीत आला. त्यामुळे ऊर्जा तयार करण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (शहर वार्ताहर)वीज फायदेशीर पण...खारलँड विभागाने निवडलेल्या दोन बंधाऱ्यांवर ४ किलोवॅट अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यात येणार होती. त्यामुळे भविष्यात छोट्या गावांसाठी ही ऊर्जानिर्मिती फायद्याची ठरली असती. मात्र, खारलँडकडे त्यासाठी तरतूद नसल्याने हे प्रस्ताव बारगळलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी खारे पाणी घुसते, त्या त्या ठिकाणी खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ही वीज फायदेशर होती.