शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Sindhudurg: तुम्हीच सांगा साहेब जगावे की मरावे?, हत्तीबाधित शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:37 IST

हत्तींचा कळप लोकवस्तीत

वैभव साळकरदोडामार्ग : एक तपाहून अधिक काळ हत्तींचा उपद्रव सहन करणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आता मरणयातना शिल्लक राहिल्या आहेत. हत्तींचा हा उपद्रव कायमचा दूर व्हावा यासाठी हत्तीपकड मोहीम राबविण्याची मागणी वनविभागाकडे करूनसुद्धा त्याकडे शासनदरबारी दुर्लक्षच झाल्याने हत्तींच्या उपद्रवामुळे नामोहरम झालेल्या शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे असा प्रश्न उभा ठाकला आहे. जिवाचे रान करून बागायती फुलवायच्या आणि हत्तींनी त्या पायदळी तुडवायच्या हे चित्र आता नेहमीचेच झाल्याने इथल्या बळीराजाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानीची मिळणारी भरपाईही तुटपुंजी असल्याने आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था त्यांची झाली आहे.

दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही वर्षात हत्तींचे संकट खूपच गडद झाले आहे. एक तपाहून अधिक काळ हत्तींचा उपद्रव इथला शेतकरी सहन करत आहे. आज ना उद्या यावर तोडगा निघेल या आशेने आजतोवर हत्तींचे अस्मानी संकट तो झेलत आला आहे; पण आता हे सारे सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे. कारण दरदिवशी हत्तींकडून होणारी हानी ही एका पिढीकडून भरून येणारी निश्चितच नसते.परिणामी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा या विवंचनेत तो जगत आहे. तालुक्यातील कुडासे, परमे, घोटगे, घोटगेवाडी, केर, मोर्ले, तिलारी खोऱ्यातील हेवाळे, बांबर्डे, मुळस, बाबरवाडी, सोनावल, विजघर मेढे ही गावे बागायतींनी संपन्न समजली जायची. तिलारीच्या पाण्यावर अपार कष्ट करून इथल्या बेरोजगार युवकांनी रडत न बसता स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर केळीच्या बागा उभ्या केल्या.शासनाचे ठोस उपाययोजनांकडे दुर्लक्षनारळ, पोफळीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आणि स्वयंरोजगाराचे साधन शोधले मात्र हत्तींनी त्यांच्या साऱ्या आशा-आकांशावर पाणी फेरले. गेल्या पाच वर्षात तर या गजराजानी कहरच केला. दौलाने उभ्या असलेल्या बागा नेस्तनाबूत करून टाकल्या. कोट्यवधींचे नुकसान करून बागायतीच्या माध्यमातून स्वयं रोजगार शोधणाऱ्या इथल्या युवकांना नाउमेद करून सोडले. एवढे सारे आक्रीत घडत असताना मायबाप सरकार मात्र आले दिवस पुढे ढकलून ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी च तिलारी खोऱ्यातील शेतकरी संतापाने एकवटला आणि थेट वनविभागाच्या कार्यालयावरच मोर्चा नेला. त्यावेळी सफेद कॉलरवाल्या राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासनांचे गाजर दाखविले. मात्र त्यांनी केलेल्या घोषणा केवळ बोलाचा भात आणि बोलाचीच कढी ठरल्या. त्यामुळेच तर ऐन काजूच्या हंगामात हत्तींचा उपद्रव आणखीनच वाढला असून काजू बागायतदारांना त्यांनी नामोहरम केले आहे.हत्तींचा कळप लोकवस्तीतसध्या दिवसाढवळ्या हत्तीचा कळप बिनधास्तपणे लोकवस्ती आणि काजू बागेत फिरत असल्याने शेतकऱ्यांनी बागायतीत जाणेच सोडून दिले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पोटचा घास मात्र हत्तींच्या दहशतीमुळे हिरावला आहे. काजू बीचा घसरलेला दर आणि त्यात उभे ठाकलेले हत्तींचे संकट यामुळे काजू बागायतदारांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना असल्यागत झाली आहे, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असताना मायबाप सरकार मात्र या हत्तीप्रश्नावर मूग गिळून गप्प बसल्याने राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर दाद कुणाकडे मागावी, असा सवाल तालुक्यातील शेतकरी विचारू लागला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग