शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

Sindhudurg: तुम्हीच सांगा साहेब जगावे की मरावे?, हत्तीबाधित शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:37 IST

हत्तींचा कळप लोकवस्तीत

वैभव साळकरदोडामार्ग : एक तपाहून अधिक काळ हत्तींचा उपद्रव सहन करणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आता मरणयातना शिल्लक राहिल्या आहेत. हत्तींचा हा उपद्रव कायमचा दूर व्हावा यासाठी हत्तीपकड मोहीम राबविण्याची मागणी वनविभागाकडे करूनसुद्धा त्याकडे शासनदरबारी दुर्लक्षच झाल्याने हत्तींच्या उपद्रवामुळे नामोहरम झालेल्या शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे असा प्रश्न उभा ठाकला आहे. जिवाचे रान करून बागायती फुलवायच्या आणि हत्तींनी त्या पायदळी तुडवायच्या हे चित्र आता नेहमीचेच झाल्याने इथल्या बळीराजाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानीची मिळणारी भरपाईही तुटपुंजी असल्याने आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था त्यांची झाली आहे.

दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही वर्षात हत्तींचे संकट खूपच गडद झाले आहे. एक तपाहून अधिक काळ हत्तींचा उपद्रव इथला शेतकरी सहन करत आहे. आज ना उद्या यावर तोडगा निघेल या आशेने आजतोवर हत्तींचे अस्मानी संकट तो झेलत आला आहे; पण आता हे सारे सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे. कारण दरदिवशी हत्तींकडून होणारी हानी ही एका पिढीकडून भरून येणारी निश्चितच नसते.परिणामी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा या विवंचनेत तो जगत आहे. तालुक्यातील कुडासे, परमे, घोटगे, घोटगेवाडी, केर, मोर्ले, तिलारी खोऱ्यातील हेवाळे, बांबर्डे, मुळस, बाबरवाडी, सोनावल, विजघर मेढे ही गावे बागायतींनी संपन्न समजली जायची. तिलारीच्या पाण्यावर अपार कष्ट करून इथल्या बेरोजगार युवकांनी रडत न बसता स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर केळीच्या बागा उभ्या केल्या.शासनाचे ठोस उपाययोजनांकडे दुर्लक्षनारळ, पोफळीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आणि स्वयंरोजगाराचे साधन शोधले मात्र हत्तींनी त्यांच्या साऱ्या आशा-आकांशावर पाणी फेरले. गेल्या पाच वर्षात तर या गजराजानी कहरच केला. दौलाने उभ्या असलेल्या बागा नेस्तनाबूत करून टाकल्या. कोट्यवधींचे नुकसान करून बागायतीच्या माध्यमातून स्वयं रोजगार शोधणाऱ्या इथल्या युवकांना नाउमेद करून सोडले. एवढे सारे आक्रीत घडत असताना मायबाप सरकार मात्र आले दिवस पुढे ढकलून ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी च तिलारी खोऱ्यातील शेतकरी संतापाने एकवटला आणि थेट वनविभागाच्या कार्यालयावरच मोर्चा नेला. त्यावेळी सफेद कॉलरवाल्या राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासनांचे गाजर दाखविले. मात्र त्यांनी केलेल्या घोषणा केवळ बोलाचा भात आणि बोलाचीच कढी ठरल्या. त्यामुळेच तर ऐन काजूच्या हंगामात हत्तींचा उपद्रव आणखीनच वाढला असून काजू बागायतदारांना त्यांनी नामोहरम केले आहे.हत्तींचा कळप लोकवस्तीतसध्या दिवसाढवळ्या हत्तीचा कळप बिनधास्तपणे लोकवस्ती आणि काजू बागेत फिरत असल्याने शेतकऱ्यांनी बागायतीत जाणेच सोडून दिले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पोटचा घास मात्र हत्तींच्या दहशतीमुळे हिरावला आहे. काजू बीचा घसरलेला दर आणि त्यात उभे ठाकलेले हत्तींचे संकट यामुळे काजू बागायतदारांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना असल्यागत झाली आहे, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असताना मायबाप सरकार मात्र या हत्तीप्रश्नावर मूग गिळून गप्प बसल्याने राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर दाद कुणाकडे मागावी, असा सवाल तालुक्यातील शेतकरी विचारू लागला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग