शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग बंद पडणे संपूर्ण समाजाला घातक : अर्थतज्ज्ञ उदय बोडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:23 IST

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आणि सरकारवर नैतिक दबाव आणण्यासाठी कामगारांची एकजूट आणि प्रसिद्धी माध्यमांचा आवाज महत्वाचा आहे असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांनी येथे केले.

ठळक मुद्दे उद्योग बंद पडणे संपूर्ण समाजाला घातक : अर्थतज्ज्ञ उदय बोडसकामगार दिन : कणकवलीत प्रतिपादन

कणकवली : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आणि सरकारवर नैतिक दबाव आणण्यासाठी कामगारांची एकजूट आणि प्रसिद्धी माध्यमांचा आवाज महत्वाचा आहे असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांनी येथे केले.ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांचे हॉटेल गोकुळधामच्या सभागृहात व्याख्यान झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे कामगार प्रतिनिधी संतोष रानडे, सुरेंद्र दळवी, एस.टी.कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष रवींद्र भिसे, एलआयसी कामगार प्रतिनिधी सुनील राऊत आदी उपस्थित होते. विविध कामगार संघटनांच्यावतीने हा कार्यक्रम झाला.यावेळी उदय बोडस म्हणाले, सरकार बीएसएनएल मोडीत काढायला निघाले आहे. यात ५४ हजार कर्मचारी घरी बसणार आहे. २९ मे रोजी जी व्यक्ती पंतप्रधानपदाची शपथ घेईल. त्या व्यक्तीच्या निर्णयावर बीएसएनएलसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बीएसएनएल जर मोडीत निघाली तर नेटवर्क कोलडमणार आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका, एलआयसी आणि इतर संस्था बंद पडणार आहेत.सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच उद्योग बंद करायचे आहेत. त्यासाठीच निवृत्तीची मर्यादा ५० वर्षावर आणण्याचा घाट घातला जात आहे. तसेच सर्वच क्षेत्रात खासगीकरण आणून कामगार चळवळ मोडीत काढली जात आहे. याविरोधात संघटित क्षेत्रातील कामगार वर्ग आवाज उठवतोय. पण जनतेमधून त्याला पाठिंबा मिळत नाही. संप केला तर त्यालाही प्रतिसाद मिळत नाही . अशी स्थिती आहे.

सरकारच्या या कामगार विरोधी धोरणाविरोधात जिथे संधी मिळेल तेथे आवाज उठवायला हवा. विशेषतः युवा वर्गाला कामगार विरोधी धोरणे आणि पुढील बेरोजगारीचे धोके समजावून सांगायला हवेत. सर्वच घटकांतून चळवळ उभी राहिली तरच सरकारला जाग येईल. अन्यथा कामगारवर्ग रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही अशीही भीती उदय बोडस यांनी यावेळी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले, ग्राहक संघटनांनी ग्राहकांच्या हक्काचे विषय मोठ्या प्रमाणात हाती घ्यायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी जिथे व्यासपीठ मिळेल तिथे जनतेत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच स्थानिक पातळीवर दबाव गट निर्माण झाले तर कामगार हिता बरोबरच अन्य महत्वपूर्ण निर्णय होऊ शकतील. त्यामुळे सामान्य जनतेचाही फायदा होईल.असेही उदय बोडस यांनी यावेळी सांगितले.माध्यमांनी जागल्याची भूमिका बजावावी !कामगार विरोधी धोरणाविरोधात तसेच देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींविषयी प्रसिद्धी माध्यमांनी जागल्याची भूमिका बजावावी.असे जर झाले तर मोठ्या प्रमाणात जनतेत जागृती होईल आणि काही प्रमाणात तरी परिस्थितीत सुधारणा होईल. असेही उदय बोडस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनsindhudurgसिंधुदुर्ग