शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

उद्योग बंद पडणे संपूर्ण समाजाला घातक : अर्थतज्ज्ञ उदय बोडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:23 IST

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आणि सरकारवर नैतिक दबाव आणण्यासाठी कामगारांची एकजूट आणि प्रसिद्धी माध्यमांचा आवाज महत्वाचा आहे असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांनी येथे केले.

ठळक मुद्दे उद्योग बंद पडणे संपूर्ण समाजाला घातक : अर्थतज्ज्ञ उदय बोडसकामगार दिन : कणकवलीत प्रतिपादन

कणकवली : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आणि सरकारवर नैतिक दबाव आणण्यासाठी कामगारांची एकजूट आणि प्रसिद्धी माध्यमांचा आवाज महत्वाचा आहे असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांनी येथे केले.ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांचे हॉटेल गोकुळधामच्या सभागृहात व्याख्यान झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे कामगार प्रतिनिधी संतोष रानडे, सुरेंद्र दळवी, एस.टी.कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष रवींद्र भिसे, एलआयसी कामगार प्रतिनिधी सुनील राऊत आदी उपस्थित होते. विविध कामगार संघटनांच्यावतीने हा कार्यक्रम झाला.यावेळी उदय बोडस म्हणाले, सरकार बीएसएनएल मोडीत काढायला निघाले आहे. यात ५४ हजार कर्मचारी घरी बसणार आहे. २९ मे रोजी जी व्यक्ती पंतप्रधानपदाची शपथ घेईल. त्या व्यक्तीच्या निर्णयावर बीएसएनएलसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बीएसएनएल जर मोडीत निघाली तर नेटवर्क कोलडमणार आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका, एलआयसी आणि इतर संस्था बंद पडणार आहेत.सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच उद्योग बंद करायचे आहेत. त्यासाठीच निवृत्तीची मर्यादा ५० वर्षावर आणण्याचा घाट घातला जात आहे. तसेच सर्वच क्षेत्रात खासगीकरण आणून कामगार चळवळ मोडीत काढली जात आहे. याविरोधात संघटित क्षेत्रातील कामगार वर्ग आवाज उठवतोय. पण जनतेमधून त्याला पाठिंबा मिळत नाही. संप केला तर त्यालाही प्रतिसाद मिळत नाही . अशी स्थिती आहे.

सरकारच्या या कामगार विरोधी धोरणाविरोधात जिथे संधी मिळेल तेथे आवाज उठवायला हवा. विशेषतः युवा वर्गाला कामगार विरोधी धोरणे आणि पुढील बेरोजगारीचे धोके समजावून सांगायला हवेत. सर्वच घटकांतून चळवळ उभी राहिली तरच सरकारला जाग येईल. अन्यथा कामगारवर्ग रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही अशीही भीती उदय बोडस यांनी यावेळी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले, ग्राहक संघटनांनी ग्राहकांच्या हक्काचे विषय मोठ्या प्रमाणात हाती घ्यायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी जिथे व्यासपीठ मिळेल तिथे जनतेत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच स्थानिक पातळीवर दबाव गट निर्माण झाले तर कामगार हिता बरोबरच अन्य महत्वपूर्ण निर्णय होऊ शकतील. त्यामुळे सामान्य जनतेचाही फायदा होईल.असेही उदय बोडस यांनी यावेळी सांगितले.माध्यमांनी जागल्याची भूमिका बजावावी !कामगार विरोधी धोरणाविरोधात तसेच देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींविषयी प्रसिद्धी माध्यमांनी जागल्याची भूमिका बजावावी.असे जर झाले तर मोठ्या प्रमाणात जनतेत जागृती होईल आणि काही प्रमाणात तरी परिस्थितीत सुधारणा होईल. असेही उदय बोडस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनsindhudurgसिंधुदुर्ग