शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

उद्योग बंद पडणे संपूर्ण समाजाला घातक : अर्थतज्ज्ञ उदय बोडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:23 IST

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आणि सरकारवर नैतिक दबाव आणण्यासाठी कामगारांची एकजूट आणि प्रसिद्धी माध्यमांचा आवाज महत्वाचा आहे असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांनी येथे केले.

ठळक मुद्दे उद्योग बंद पडणे संपूर्ण समाजाला घातक : अर्थतज्ज्ञ उदय बोडसकामगार दिन : कणकवलीत प्रतिपादन

कणकवली : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आणि सरकारवर नैतिक दबाव आणण्यासाठी कामगारांची एकजूट आणि प्रसिद्धी माध्यमांचा आवाज महत्वाचा आहे असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांनी येथे केले.ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांचे हॉटेल गोकुळधामच्या सभागृहात व्याख्यान झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे कामगार प्रतिनिधी संतोष रानडे, सुरेंद्र दळवी, एस.टी.कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष रवींद्र भिसे, एलआयसी कामगार प्रतिनिधी सुनील राऊत आदी उपस्थित होते. विविध कामगार संघटनांच्यावतीने हा कार्यक्रम झाला.यावेळी उदय बोडस म्हणाले, सरकार बीएसएनएल मोडीत काढायला निघाले आहे. यात ५४ हजार कर्मचारी घरी बसणार आहे. २९ मे रोजी जी व्यक्ती पंतप्रधानपदाची शपथ घेईल. त्या व्यक्तीच्या निर्णयावर बीएसएनएलसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बीएसएनएल जर मोडीत निघाली तर नेटवर्क कोलडमणार आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका, एलआयसी आणि इतर संस्था बंद पडणार आहेत.सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच उद्योग बंद करायचे आहेत. त्यासाठीच निवृत्तीची मर्यादा ५० वर्षावर आणण्याचा घाट घातला जात आहे. तसेच सर्वच क्षेत्रात खासगीकरण आणून कामगार चळवळ मोडीत काढली जात आहे. याविरोधात संघटित क्षेत्रातील कामगार वर्ग आवाज उठवतोय. पण जनतेमधून त्याला पाठिंबा मिळत नाही. संप केला तर त्यालाही प्रतिसाद मिळत नाही . अशी स्थिती आहे.

सरकारच्या या कामगार विरोधी धोरणाविरोधात जिथे संधी मिळेल तेथे आवाज उठवायला हवा. विशेषतः युवा वर्गाला कामगार विरोधी धोरणे आणि पुढील बेरोजगारीचे धोके समजावून सांगायला हवेत. सर्वच घटकांतून चळवळ उभी राहिली तरच सरकारला जाग येईल. अन्यथा कामगारवर्ग रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही अशीही भीती उदय बोडस यांनी यावेळी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले, ग्राहक संघटनांनी ग्राहकांच्या हक्काचे विषय मोठ्या प्रमाणात हाती घ्यायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी जिथे व्यासपीठ मिळेल तिथे जनतेत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच स्थानिक पातळीवर दबाव गट निर्माण झाले तर कामगार हिता बरोबरच अन्य महत्वपूर्ण निर्णय होऊ शकतील. त्यामुळे सामान्य जनतेचाही फायदा होईल.असेही उदय बोडस यांनी यावेळी सांगितले.माध्यमांनी जागल्याची भूमिका बजावावी !कामगार विरोधी धोरणाविरोधात तसेच देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींविषयी प्रसिद्धी माध्यमांनी जागल्याची भूमिका बजावावी.असे जर झाले तर मोठ्या प्रमाणात जनतेत जागृती होईल आणि काही प्रमाणात तरी परिस्थितीत सुधारणा होईल. असेही उदय बोडस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनsindhudurgसिंधुदुर्ग