शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

CoronaVirus Lockdown : देवगड तालुक्याची आर्थिक नाडी लॉकडाऊनच्या जाळ्यात, मत्स्य व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:17 IST

देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेला मत्स्य व्यवसाय सुरुवातीच्या काळात वादळाने व अखेरच्या काळात कोरोनाने कोलमडला आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या या मत्स्य व्यावसायिकांना शासनाने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देदेवगड तालुक्याची आर्थिक नाडी लॉकडाऊनच्या जाळ्यात, मत्स्य व्यवसाय संकटात सुरुवातीच्या काळात वादळ, त्यानंतर कोरोनामुळे मच्छिमारांच्या चेहऱ्यावर निराशा

देवगड : देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेला मत्स्य व्यवसाय सुरुवातीच्या काळात वादळाने व अखेरच्या काळात कोरोनाने कोलमडला आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या या मत्स्य व्यावसायिकांना शासनाने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे.देवगड तालुक्याची अर्थव्यवस्था मत्स्य व आंबा व्यवसायांवर अवलंबून आहे. यातील मत्स्य व्यवसाय नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुरुवातीच्या काळातच बहरतो. मात्र, याच कालावधीत मच्छिमारांना अनेक वादळांना सामोरे जावे लागल्याने मासळी व्यवसाय नुकसानीत गेला. वादळसदृश परिस्थितीतून बाहेर पडत असतानाच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले. याचा गंभीर परिणाम मत्स्य व्यवसायावर झाला.मार्च, एप्रिल व मे महिन्यात गोवा व इतर राज्यांतून देवगड तालुक्यातील महागड्या मासळीला मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी याच कालावधीत लॉकडाऊन झाल्याने संपूर्ण मत्स्य व्यवसायावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले. कोरोनाचा फटका मच्छिमारी व्यवसायाला जास्त बसला.लॉकडाऊनच्या काळात देवगडमधील सुमारे २२२ खलाशी रत्नागिरी जिल्ह्यातील तुळसुंदे या ठिकाणी अडकल्याने २० ते २५ नौका बंद स्थितीत होत्या. त्यात इतर नौकांवरीलही खलाशांचा समावेश असल्याने त्या नौकांनाही कमी खलाशी घेऊन व्यवसाय करताना कसरत करावी लागली.एकामागोमाग एक अशी येणारी छोटी-मोठी वादळे, मासळी मिळण्याचे प्रमाण कमी व अंतिम टप्प्यातील कोरोनाचे संकट यामुळे मच्छिमारी व्यवसायावर या हंगामात अखेरपर्यंत संक्रांतच आली. एप्रिल व मे महिन्याचा पहिला पंधरवडा हा मच्छिमारी हंगामासाठी महत्त्वाचा काळ समजला जातो. या हंगामात मोठ्या प्रमाणात मासळी मिळते. तसेच याच हंगामात मुंबईकर चाकरमानी येत असल्याने मासळीला स्थानिक बाजारपेठेत दरदेखील चांगला मिळत असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर परिणाम झाला.

छोट्या नौकांना तर हा हंगाम तोट्यातच गेला. त्यातच १ जूनपासून मच्छिमारी व्यवसाय बंद झाल्याने नौकामालकांनाही नौका किनाऱ्यावर घ्याव्या लागल्या आहेत. दरवर्षी उत्साहाने नौका समुद्रकिनारी घेऊन त्या शाकारण्यासाठी मच्छिमार बांधव गुंतलेले असतात. मात्र यावर्षी अनेक वादळे, कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याने उत्साहाऐवजी निराशाच मच्छिमारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.खोल समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय बंद झाला असून खाडीतील पारंपरिक मच्छिमारीला वेग येणार आहे. मात्र, पावसाने अद्याप मोठ्या प्रमाणात हजेरी न लावल्याने पारंपरिक मच्छिमारीही अद्याप सुरू झाली नाही. पारंपरिक मासळी व्यवसायाला यावर्षी निसर्गाने साथ दिली तर त्यांना चालना मिळेल. कारण यावर्षी मुंबईकर चाकरमानी हजारोंच्या संख्येने कोरोना विषाणूमुळे गावागावात दाखल झाले आहे. पावसाळ्यामध्ये मासळीकडे त्यांचाही कल असणार आहे.पारंपरिक खाडीकिनारी होणारी मासेमारी उभारी मिळवून देण्याची आशादेवगड तालुक्यातील मुणगे गावापासून विजयदुर्गपर्यंत समुद्रकिनारा लाभला आहे. यामध्ये मुणगे, मोर्वे, तांबळडेग, मिठबांव, कातवण, कुणकेश्वर, तारामुंबरी, मिठमुंबरी, देवगड, फणसे, पडवणे, कळंबई, हुर्शी, गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग ही गावे किनाऱ्यालगत आहेत.तालुक्यातील काही गावांना खाडीकिनारा लाभला आहे. यामध्ये मोंड, वानिवडे, वाडातर, वाघोटण, मणचे, मुटाट, तिर्लोट, टेंबवली, कालवी, तळवडे, गढीताम्हाणे, धालवली या गावांचा समावेश आहे. येथे मोठ्या प्रमाणात पारंपरिक मच्छिमारी केली जाते. या मच्छिमारीवर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. यामुळे पारंपरिक मच्छिमारी व्यवसाय यावर्षी खाडीकिनारी असलेल्या कुटुंबांना कोरोना संकटात उभारी मिळवून देईल अशी आशा व्यक्त होत आहे.देवगड किनारपट्टीवर मागील सहा महिन्यांपासून बहुतांशी काळात मच्छिमारी करणाऱ्या बोटी नांगरून ठेवल्या जात होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग